शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

अकोले आगाराचा ‘मुलींच्या’ शिक्षणाला खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोतूळ : अकोले बस आगाराच्या मनमानी कारभाराचा फटका कोतूळ परिसरातील विद्यार्थ्यांना बसला आहे. शालेय वेळेत अकोले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोतूळ : अकोले बस आगाराच्या मनमानी कारभाराचा फटका कोतूळ परिसरातील विद्यार्थ्यांना बसला आहे. शालेय वेळेत अकोले येथे पोहोचणाऱ्या व परत येणाऱ्या बस महामंडळाने बंद केल्याने पंचवीस महाविद्यालयीन मुलींना शिक्षणाला मुकावे लागले आहे.

अकोले तालुक्यातील राजकीय अनास्था आणि मुजोर प्रशासकीय यंत्रणेचा आणखी एक नमुना समोर आला आहे.

कोतूळ शहरालगत सात गावातील कला, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यावसायिक प्रशिक्षण तसेच कनिष्ठ महाविद्यालय व माध्यमिक शाळेत कोतूळ ते अकोले, संगमनेर येथे जाण्यासाठी दोनशेपेक्षा जास्त विद्यार्थी आहेत. महाविद्यालये भरण्याची वेळ सकाळी साडेसात व सुटण्याची दुपारी अकरा ते बारा दरम्यान आहे. मात्र गेल्या तीन महिन्यापासून अकोले आगाराने कोतूळ येथून सकाळी साडेसहा ते सात दरम्यान सुटणाऱ्या दोन बस बंद केल्या. यापैकी एक याच वेळेस बस धामणगावपाट येथून सुरू केली. तर महाविद्यालय सुटल्यावर बारा ते दीड दरम्यानच्या बस बंद केल्याने मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. विशेष म्हणजे या वेळेत खासगी अवैध वाहतूक जोमात चालत आहे. कोतूळ व परिसरातील विद्यार्थ्यांना सध्या कोतूळातून पहाटे साडेपाच वाजता धामणगावपाट येथे बस मिळण्यासाठी पायपीट करावी लागते. तर आसपासच्या खेड्यापाड्यातील पालक मुलींना दुचाकीने पोहाेचवतात. परंतु बसच नसल्याने अनेक अल्पवयीन मुलांच्या हाती पालकांना दुचाकी द्यावी लागत आहे. किमान पंचवीस विद्यार्थिनींना पहाटेचा प्रवास करावा लागतो. साडेसात वाजता मुली महाविद्यालयात पोहोचतात. तोपर्यंत किमान दोन तास संपलेले असतात. त्यामुळे अनेकांना एसटीच्या भरवशावर शिक्षणाला मुकावे लागते आहे.

....

कोतूळ-अकोले सकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यानच्या नाशिक व बदगी अकोले बस बंद आहेत. धामणगावपाट येथून सकाळी साडेसहाला अकोले बस जाते. त्यामुळे मुलींना पहाटे साडेपाचला दुचाकीने आम्ही पालक धामणगावपाटला जातो. बस जाईपर्यंत थांबावे लागते. काहींना सोय नसल्याने शाळेत जाता येत नाही, हे धोक्याचे आहे. तरी कोतूळातून पूर्वीप्रमाणे बस सेवा सुरु करावी.

-

दिगंबर जाधव, पालक, कोतूळ.

...

सध्या शाळा व्यवस्थापनाची वेळापत्रके सतत बदलत आहेत. विद्यार्थ्यांनी एसटी पास देखील कमी प्रमाणात घेतल्याने कोणत्या ठिकाणी किती विद्यार्थी आहेत हे लक्षात येत नाही. शाळेच्या वेळा निश्चित नाहीत. कोतूळ मोठे गाव असल्याने लवकरच विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करू.

-ज्ञानेश्वर आव्हाड, आगार प्रमुख, अकोले.