शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

राहुरीत पुतळ्याची विटंबना, नगर-मनमाड महामार्गावर रास्ता रोको; तालुका बंदची हाक

By सुदाम देशमुख | Updated: March 26, 2025 22:08 IST

माेठा पाेलिस बंदाेबस्त तैनात

राहुरी (जि. अहिल्यानगर) : शहरातील श्री बुवासिंद बाबा तालीम येथे बुधवारी दुपारच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचे समाेर आले. या घटनेमुळे शहरातील नगर-मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शहरात तणावाचे वातावरण असून माेठा बंदाेबस्त तैनात करण्यात आला आहे.गुरुवारी तालुका बंदची हाक देण्यात आली. राहुरी शहरातील कोळीवाडा परिसरात श्री बुवासिंद बाबा तालमीत बजरंग बली यांची मूर्ती आहे. शेजारीच महापुरुषांचा पुतळा होता. बुधवारी दुपारी दोन वाजेदरम्यान अज्ञात व्यक्तीने तालमीत जाऊन पुतळ्याची विटंबना केली. काही वेळाने तरुणांच्या हा प्रकार निदर्शनास आला. काही वेळातच शेकडो युवकांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा निषेध केला. जमाव आक्रमक झाला.

घटनेची माहिती मिळताच, प्रातांधिकारी किरण सावंत, तहसीलदार नामदेव पाटील, यांच्यासह उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे, पोलिस निरीक्षक संजय ठेंगे, हवालदार अशोक शिंदे, सूरज गायकवाड, प्रमोद ढाकणे, आजिनाथ पाखरे, सतीश कुऱ्हाडे, राहुल यादव, नदीम शेख आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.संतप्त शेकडो युवकांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन आरोपींचा शोध घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर युवक नगर-मनमाड महामार्गावर मल्हारवाडी चाैकात आले. तिथे रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी आमदार शिवाजी कर्डिले, बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, चाचा तनपुरे, माजी नगराध्यक्ष सत्यजीत कदम, हर्ष तनपुरे, माजी नगरसेवक नंदू तनपुरे यांनी पोलिस प्रशासनाकडे आरोपीचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली. जवळपास तासभर चाललेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे नगर-मनमाड महामार्गावर वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. या घटनेमुळे शहरातील दुकाने पटपट बंद करण्यात आली. या घटनेबाबत राहुरी नगरपालिकेचे लिपिक हरिश्चंद्र बिवल यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माेठा बंदाेबस्त तैनात

शहरात तणावपूर्ण शांतता आहे, तसेच दंगल नियंत्रण पथकास पाचारण करण्यात आले आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी संबंधित पोलिस ठाण्यास भेट देऊन घटनेची माहिती घेऊन आरोपीचा शोध घेऊन गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला.

आधी तालुका नंतर जिल्हा बंदची हाकया घटनेमुळे गुरुवारी (दि. २७) राहुरी शहर व तालुका बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे आठवडे बाजारही भरणार नाही. दाेन दिवसांत आराेपी न सापडल्यास जिल्हा बंदचा इशारा देण्यात आला आहे.मुख्यमंत्र्यांकडून घटनेची दखल

घटनेनंतर आमदार शिवाजी कर्डिले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क करून त्यांना घटनेची माहिती दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींना तत्काळ अटक करण्याचा आदेश दिला असल्याचे कर्डिले यांनी सांगितले.