शहरं
Join us  
Trending Stories
1
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
2
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
3
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
4
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
5
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
6
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
7
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
8
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
9
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
10
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
11
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
12
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
13
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
14
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
15
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
16
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
17
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
18
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
19
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
20
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

राहुरीत पुतळ्याची विटंबना, नगर-मनमाड महामार्गावर रास्ता रोको; तालुका बंदची हाक

By सुदाम देशमुख | Updated: March 26, 2025 22:08 IST

माेठा पाेलिस बंदाेबस्त तैनात

राहुरी (जि. अहिल्यानगर) : शहरातील श्री बुवासिंद बाबा तालीम येथे बुधवारी दुपारच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचे समाेर आले. या घटनेमुळे शहरातील नगर-मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शहरात तणावाचे वातावरण असून माेठा बंदाेबस्त तैनात करण्यात आला आहे.गुरुवारी तालुका बंदची हाक देण्यात आली. राहुरी शहरातील कोळीवाडा परिसरात श्री बुवासिंद बाबा तालमीत बजरंग बली यांची मूर्ती आहे. शेजारीच महापुरुषांचा पुतळा होता. बुधवारी दुपारी दोन वाजेदरम्यान अज्ञात व्यक्तीने तालमीत जाऊन पुतळ्याची विटंबना केली. काही वेळाने तरुणांच्या हा प्रकार निदर्शनास आला. काही वेळातच शेकडो युवकांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा निषेध केला. जमाव आक्रमक झाला.

घटनेची माहिती मिळताच, प्रातांधिकारी किरण सावंत, तहसीलदार नामदेव पाटील, यांच्यासह उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे, पोलिस निरीक्षक संजय ठेंगे, हवालदार अशोक शिंदे, सूरज गायकवाड, प्रमोद ढाकणे, आजिनाथ पाखरे, सतीश कुऱ्हाडे, राहुल यादव, नदीम शेख आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.संतप्त शेकडो युवकांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन आरोपींचा शोध घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर युवक नगर-मनमाड महामार्गावर मल्हारवाडी चाैकात आले. तिथे रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी आमदार शिवाजी कर्डिले, बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, चाचा तनपुरे, माजी नगराध्यक्ष सत्यजीत कदम, हर्ष तनपुरे, माजी नगरसेवक नंदू तनपुरे यांनी पोलिस प्रशासनाकडे आरोपीचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली. जवळपास तासभर चाललेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे नगर-मनमाड महामार्गावर वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. या घटनेमुळे शहरातील दुकाने पटपट बंद करण्यात आली. या घटनेबाबत राहुरी नगरपालिकेचे लिपिक हरिश्चंद्र बिवल यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माेठा बंदाेबस्त तैनात

शहरात तणावपूर्ण शांतता आहे, तसेच दंगल नियंत्रण पथकास पाचारण करण्यात आले आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी संबंधित पोलिस ठाण्यास भेट देऊन घटनेची माहिती घेऊन आरोपीचा शोध घेऊन गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला.

आधी तालुका नंतर जिल्हा बंदची हाकया घटनेमुळे गुरुवारी (दि. २७) राहुरी शहर व तालुका बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे आठवडे बाजारही भरणार नाही. दाेन दिवसांत आराेपी न सापडल्यास जिल्हा बंदचा इशारा देण्यात आला आहे.मुख्यमंत्र्यांकडून घटनेची दखल

घटनेनंतर आमदार शिवाजी कर्डिले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क करून त्यांना घटनेची माहिती दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींना तत्काळ अटक करण्याचा आदेश दिला असल्याचे कर्डिले यांनी सांगितले.