शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

"इतरांच्या घरी मुलगा झाला तरी त्यात आमचा हात आहे असं म्हणू नका"

By साहेबराव नरसाळे | Updated: May 26, 2023 14:03 IST

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला सुनावले

अहमदनगर : महाविकास आघाडीत छोटा भाऊ-मोठा भाऊ यावरून वाद सुरू आहेत. हे वाद भाजपद्वारे लावले जात आहेत, असा आरोप केला जात आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले, राज्यात काहीही घडलं तरी त्यात आमचाच हात आहे असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. आता इतरांच्या घरी मुलगा झाला तरी त्यात आमचाच हात आहे असा कृपया आरोप करू नका, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला सुनावले.

देवेंद्र फडणवीस शुक्रवारी अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर आलेले आहेत. फडणवीस यांच्या हस्ते शासकीय विश्रामगृहाच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन समारंभ झाला. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. या आढावा बैठकीनंतर फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे व भाजप आमदार राम शिंदे यांच्यामधील वादावर बोलताना फडणवीस म्हणाले, दोघांमधील वाद एका पेल्यातील वाद आहे. तो आता थांबलेला आहे. तो किरकोळ वाद होता. मी दोघांमध्ये मध्यस्थी घडवून आणली आहे. त्यामुळे तो वाद पूर्णपणे मिटलेला आहे. नाना पटोले, संजय राऊत हे बोलघेवडे लोक आहेत. त्यांना काही काम नाही. आम्हाला भरपूर काम आहेत. त्यांच्या आरोपांना मी उत्तर देत नाही. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. शिवसेना व भाजप या दोघांमध्ये कोणतेही वाद नाहीत. आमच्यामध्ये पूर्ण समन्वय आहे. लोकसभेच्या जागा वाटपाबाबत आम्ही दोघं बसून निर्णय घेऊ. नगर जिल्ह्यातील जलजीवन घोटाळ्याबाबत मला पूर्ण माहिती नाही. तरीपण आम्ही त्याची माहिती घेऊन चौकशी करू, असे फडणवीस यांनी सांगितले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीSanjay Rautसंजय राऊत