शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
2
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
3
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
4
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
5
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
7
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
8
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...
9
४०% पार्ट्स होणार स्वस्त! सर्व्हिसिंगच्या बिलातही दिलासा; GST कपातीनंतर सोपा होणार कार-बाईकचा मेंटेनन्स
10
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
11
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
12
शुक्र गोचर २०२५: शुक्रादित्य राजयोग; 'या' ६ राशी हात लावतील तिथे सोनं करतील!
13
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
14
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
15
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
16
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
17
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
18
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
19
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
20
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?

साडेतीन हजार हेक्टरसाठीच पाण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी यंदाच्या रब्बी हंगामात पाटबंधारे विभागाकडे ३ हजार ५८० हेक्टरसाठीच पाण्याची मागणी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी यंदाच्या रब्बी हंगामात पाटबंधारे विभागाकडे ३ हजार ५८० हेक्टरसाठीच पाण्याची मागणी केली आहे. गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत ही सर्वात कमी मागणी असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.

गोदावरीच्या कालव्याद्वारे शेतीला, पिण्याला पाणी देण्यासाठी नांदूर मधमेश्वर धरणातून डाव्या व उजव्या कालव्यांद्वारे कोपरगाव, राहाता तालुक्यांत पाणी आणले जाते. त्यावेळी डाव्या कालव्यावरील १७ हजार ५४० हेक्टर क्षेत्र तर उजव्या कालव्यावरील २३ हजार ३६५ हेक्टर क्षेत्र असे एकूण ४० हजार ९०५ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली होते; परंतु गेल्या अनेक वर्षांत ७ क्रमांकाचे अर्ज भरण्याचे प्रमाण कमी होऊ लागले. त्यामुळे सातत्याने पाण्याची मागणी कमी होऊ लागली. शिल्लक पाण्यावर पिण्याच्या पाण्याचे आरक्षण पडू लागले. यंदा १० डिसेंबर २०२० पर्यंत ७ नंबर अर्ज भरण्यासाठी मुदत होती. याकालावधीत डाव्या कालव्यावर ७ नंबर अर्जावर ९३० हेक्टर व पाणी वापर संस्थांचे ८५० हेक्टर असे मिळून १ हजार ७८० हेक्टर व उजव्या कालव्यावर फक्त मागणी अर्जावर १ हजार ८०० हेक्टर असे ३ हजार ५८० हेक्टरसाठी पाण्याची मागणी झाली आहे.

...........

कारखाने पुढाकार का घेत नाहीत ?

कोपरगाव तालुक्यातील साखर कारखान्यांचा कारभार हाकणारी नेतेमंडळी अगदीच तालुक्यातील नवीन मतदार नोंदणीपासून सोसायटी, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद तर थेट आमदारकीच्या निवडणुकीत अर्ज भरण्यासाठी कारखानाच्या कामगारांची यंत्रणा वापरतात. मग शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा असलेल्या पाट पाण्याचे मागणी अर्ज भरण्यासाठी ही यंत्रणा का वापरत नाहीत. निव्वळ अर्ज भरण्याचे पोकळ आवाहन करण्यासाठी मात्र, ही नेतेमंडळी पुढाकार घेतात, अशी तालुक्यातील शेतकरी वर्गात चर्चा सुरू आहे.

...........

फक्त उन्हाळी हंगामातील आवर्तनासाठी सभासदांचे ७ नंबर अर्ज कारखान्यामार्फत भरून शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून पाणीपट्टीची रक्कम वजा करून पाटबंधारे विभागास ही रक्कम भरण्यात येते.

- शिवाजीराव दिवटे, सरव्यवस्थापक, सहकार महर्षी कोल्हे साखर कारखाना, कोपरगाव.

............

शेतकऱ्यांना पाटबंधारे विभागातील ७ नंबर अर्ज भरण्यासाठी कोणत्याही हंगामात कारखान्यामार्फत कोणतीही मदत केली जात नाही.

- गिरीश जगताप, कार्यकारी संचालक, कर्मवीर काळे साखर कारखाना, कोळपेवाडी.