शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
4
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
5
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
6
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
7
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
8
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
9
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
10
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
11
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
12
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
13
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
14
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
15
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
16
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
17
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
18
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
19
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
20
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

साडेतीन हजार हेक्टरसाठीच पाण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी यंदाच्या रब्बी हंगामात पाटबंधारे विभागाकडे ३ हजार ५८० हेक्टरसाठीच पाण्याची मागणी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी यंदाच्या रब्बी हंगामात पाटबंधारे विभागाकडे ३ हजार ५८० हेक्टरसाठीच पाण्याची मागणी केली आहे. गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत ही सर्वात कमी मागणी असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.

गोदावरीच्या कालव्याद्वारे शेतीला, पिण्याला पाणी देण्यासाठी नांदूर मधमेश्वर धरणातून डाव्या व उजव्या कालव्यांद्वारे कोपरगाव, राहाता तालुक्यांत पाणी आणले जाते. त्यावेळी डाव्या कालव्यावरील १७ हजार ५४० हेक्टर क्षेत्र तर उजव्या कालव्यावरील २३ हजार ३६५ हेक्टर क्षेत्र असे एकूण ४० हजार ९०५ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली होते; परंतु गेल्या अनेक वर्षांत ७ क्रमांकाचे अर्ज भरण्याचे प्रमाण कमी होऊ लागले. त्यामुळे सातत्याने पाण्याची मागणी कमी होऊ लागली. शिल्लक पाण्यावर पिण्याच्या पाण्याचे आरक्षण पडू लागले. यंदा १० डिसेंबर २०२० पर्यंत ७ नंबर अर्ज भरण्यासाठी मुदत होती. याकालावधीत डाव्या कालव्यावर ७ नंबर अर्जावर ९३० हेक्टर व पाणी वापर संस्थांचे ८५० हेक्टर असे मिळून १ हजार ७८० हेक्टर व उजव्या कालव्यावर फक्त मागणी अर्जावर १ हजार ८०० हेक्टर असे ३ हजार ५८० हेक्टरसाठी पाण्याची मागणी झाली आहे.

...........

कारखाने पुढाकार का घेत नाहीत ?

कोपरगाव तालुक्यातील साखर कारखान्यांचा कारभार हाकणारी नेतेमंडळी अगदीच तालुक्यातील नवीन मतदार नोंदणीपासून सोसायटी, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद तर थेट आमदारकीच्या निवडणुकीत अर्ज भरण्यासाठी कारखानाच्या कामगारांची यंत्रणा वापरतात. मग शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा असलेल्या पाट पाण्याचे मागणी अर्ज भरण्यासाठी ही यंत्रणा का वापरत नाहीत. निव्वळ अर्ज भरण्याचे पोकळ आवाहन करण्यासाठी मात्र, ही नेतेमंडळी पुढाकार घेतात, अशी तालुक्यातील शेतकरी वर्गात चर्चा सुरू आहे.

...........

फक्त उन्हाळी हंगामातील आवर्तनासाठी सभासदांचे ७ नंबर अर्ज कारखान्यामार्फत भरून शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून पाणीपट्टीची रक्कम वजा करून पाटबंधारे विभागास ही रक्कम भरण्यात येते.

- शिवाजीराव दिवटे, सरव्यवस्थापक, सहकार महर्षी कोल्हे साखर कारखाना, कोपरगाव.

............

शेतकऱ्यांना पाटबंधारे विभागातील ७ नंबर अर्ज भरण्यासाठी कोणत्याही हंगामात कारखान्यामार्फत कोणतीही मदत केली जात नाही.

- गिरीश जगताप, कार्यकारी संचालक, कर्मवीर काळे साखर कारखाना, कोळपेवाडी.