शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
2
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
3
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
4
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
6
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
7
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
8
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
9
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
10
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
11
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
12
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
13
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
14
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
15
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
16
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
17
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
19
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
20
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'

संगमनेरातील कोविड केंद्र पुन्हा सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:19 IST

गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने भीतिदायक वातावरण तयार झाले होते. त्यानंतर, रुग्णसंख्या वाढत असताना स्थानिकांना संगमनेरातच उपचार ...

गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने भीतिदायक वातावरण तयार झाले होते. त्यानंतर, रुग्णसंख्या वाढत असताना स्थानिकांना संगमनेरातच उपचार मिळावेत, याकरिता संगमनेरचे प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कचेरिया आदींच्या प्रयत्नांतून ग्रामीण रुग्णालयात विशेष कोविड-१९ आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले. त्यासाठी अनेकांनी भरीव मदतदेखील केली. औषधोपचार, कृत्रिम श्वासोच्छ्वास व इतरही वैद्यकीय सुविधा रुग्णांना येथे मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. कोरोनाची लागण झालेल्या हजारो रुग्णांवर येथे उपचार होऊन ते कोरोनामुक्त झाले. मात्र, कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने हे केंद्र बंद करण्यात आले.

परंतु, आता संगमनेर तालुक्यात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. घुलेवाडीतील केंद्र बंद झाल्याने कोरोनाची लागण झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना खासगी रुग्णालयात उपचारांशिवाय कुठला पर्याय नाही. खासगी रुग्णालयांचे बिल सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात असून उपचारांनंतर बिल भरण्यासाठी कुटुंबांतील सदस्यांची दमछाक होते आहे. तरी, पुन्हा कोरोना केंद्र सुरू करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.