शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
4
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
5
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
6
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
7
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
8
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
9
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
10
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
11
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
12
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
13
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
14
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
15
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
16
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
17
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
18
टीम इंडियाच्या ' या ' स्टार क्रिकेटरसोबत केलेला 'वन नाईट स्टँड'; बॉबी डार्लिंगचा खुलासा
19
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
20
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात

कर्जमाफीची मागणी म्हणजे शिवसेनेचे उशिराचे शहाणपण

By admin | Updated: May 5, 2016 00:02 IST

शिर्डी : केंद्र आणि राज्य सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर करावी, ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मागणी म्हणजे उशीरा सुचलेले शहाणपण असल्याची

राधाकृष्ण विखे : मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीसाठी बैठक बोलवावीशिर्डी : केंद्र आणि राज्य सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर करावी, ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मागणी म्हणजे उशीरा सुचलेले शहाणपण असल्याची प्रतिक्रिया विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केली.शेतकरी कर्जमाफी संदर्भात उद्धव ठाकरे यांनी लातूरमध्ये केलेल्या मागणीबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना शिर्डीत विखे म्हणाले, कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस मागील तीन अधिवेशनापासून सातत्याने कर्जमाफीची मागणी करीत आहेत. आता सत्ताधारी पक्षातील शिवसेना देखील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी करू लागली आहे. त्यामुळे कर्जमाफीसंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवावी. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचेही त्यांनी सांगितले.मागील चारही अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कॉँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली. कॉँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलनेही केली. तेव्हा मात्र शिवसेना गप्प बसली होती. आता अचानक शिवसेनेला शेतकरी कर्जमाफीची आठवण कशी झाली, हेच मोठे आश्चर्य आहे. शेतकरी कर्जमाफीची मागणी आमच्यासाठी राजकारणाचा विषय नाही. त्यामुळे शिवसेना कर्जमाफीच्या मागणीवर ठाम असेल तर त्यांनी सरकारवर यासंदर्भात तातडीने सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यासाठी दबाव आणावा. राज्य सरकारची इच्छाशक्ती असेल तर १५ दिवसात कर्जमाफीची घोषणा करता येऊ शकेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.राज्यात दुष्काळाची दाहकता वाढत असताना आवश्यक त्या उपाययोजना करण्यात सरकारला अपयश आलेले आहे. प्रशासकीय यंत्रणेवर सरकारचे कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही. सरकारच्या दुष्काळ उपाययोजना केवळ कागदोपत्रीच राहिल्या आहेत. त्यामुळेच दुष्काळासंदर्भात न्यायालये देखील सरकारला फटकारू लागली आहेत. भीषण दुष्काळाला सामूहिकपणे सामोरे जाण्याची गरज असताना सरकारमधील दोन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोड्या करण्यात व्यस्त आहेत. त्यांच्या अंतर्गत राजकारणामुळे राज्यातील जनतेचा मात्र नाहक बळी जात असल्याची टीकाही राधाकृष्ण विखे यांनी केली. (तालुका प्रतिनिधी)