शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

काकडी, कैरी, भेंडी, लिंबुला मागणी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:20 IST

अहमदनगर : उन्हाळा सुरू झाल्याने भाज्यांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे भाज्यांचे भाव वाढले आहेत. आवक वाढल्याने पालेभाज्यांच्या दरात ...

अहमदनगर : उन्हाळा सुरू झाल्याने भाज्यांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे भाज्यांचे भाव वाढले आहेत. आवक वाढल्याने पालेभाज्यांच्या दरात मात्र घसरण झाली आहे. काकडी, कैरी, लिंबू, भेंडी, कारले, दोडके,गवारीला मागणी वाढल्याने त्यांचे दरही कडाडले आहेत. उन्हाळा सुरू झाल्याने सरबतासाठी लिंबाला मागणी वाढली आहे, तर कांद्यात कमालीची घसरण झाली आहे.

रविवारी नगर येथील बाजार समितीमध्ये भाज्यांची आवक घटल्याचे दिसले. उन्हाळ्याची तीव्रता सुरू झाल्याने भाज्यांची आवकही आता कमी कमी होत जाणार आहे. त्याची सुरूवात बाजारात दिसून आली आहे. गवारीने सर्वात जास्त भाव खाल्ला आहे. रविवारी बाजारात असलेले भाज्यांचे दर असे होते. (रुपये प्रति क्विंटल)- टोमॉटो (८००),वांगी (१०००), फ्लावर (२०००),कोबी (५००), काकडी (२०००), गवार (८०००), घोसाळे (३०००), दोडका(३०००), कारले (३०००), कैरी (३०००), भेंडी (३५००), वाल (२५००), घेवडा (२०००), बटाटे (१२००), लसूण (७०००), हिरवी मिरची (३५००), शेवगा (२०००), लिंबू (४५००),गाजर (१२००), भोपळा (१०००), वटाणा (३२००), कांदा (१७००).

----------

पालेभाज्यांमध्ये घसरण (दर रुपये प्रति शंभर गड्डी)

मेथी (५००), कोथंबीर (५००), पालक (५००), शेपू (६००), मुळे (७००), हरभरा (८००),

-------

डाळिंबाचे भाव वाढले

बाजारात पुन्हा एकदा डाळिंबाचे भाव वाढले आहेत. सफरचंदला १२ हजार रुपये प्रतिक्विंटल तर डाळिंबाला १५ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. त्यामुळे फळात डाळिंब हेच सर्वात महागडे फळ झाले आहे. मोसंबी (७०००), संत्रा (६५००), पपई (१५००), रामफळ (३०००), चिकू (१८००), द्राक्षे (४०००), अंजिर (६०००),कलिंगड (१०००) खरबूज (२०००) असे प्रति क्विंटल दर आहेत.

-----------