शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

जामखेड तालुक्याचा भ्रमनिरास : कुकडी प्रकल्पाचा सुधारित आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 18:07 IST

कुकडी प्रकल्पातून तालुक्याला दोन टी.एम. सी. पाणी मिळावे, ही ३५ वर्षांपासूनची मागणी आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे आंदोलन झाले.

जामखेड : कुकडी प्रकल्पातून तालुक्याला दोन टी.एम. सी. पाणी मिळावे, ही ३५ वर्षांपासूनची मागणी आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे आंदोलन झाले. आघाडी सरकारच्या काळात पिण्यासाठी चौंडी येथील बंधाऱ्यात पाणी सोडण्याचा निर्णय झाला. याच मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणारे पालकमंत्री राम शिंदे यांच्या पुढाकारातून कुकडी प्रकल्पाचा तिसरा सुधारित प्रकल्प आराखडा मंजूर झाला आहे. पण त्यानुसार तालुक्यातील ८९ गावांपैकी चौंडी, जवळा या दोनच गावांचा समावेश आहे. त्यांचा अपवाद सोडल्यास संपूर्ण तालुका शेतीच्या पाण्यासाठी वंचित राहणार आहे. त्यामुळे जामखेडकरांचा भ्रमनिरास झाला आहे.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर याच प्रकल्पासाठी आमदार राम शिंदे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. २०१२-१३ मध्ये तत्कालिन विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या प्रयत्नातून रूख्मिणी खिंडीतून ओढे, नाले व सीना नदी पात्रातून पिण्याच्या पाण्यासाठी चौंडी येथील बंधाºयात कुकडीचे पाणी सोडण्यात आले. यानंतर जवळा बंधाºयात पाणी सोडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रयत्न करण्यात आला. बंधाºयापर्यंत पाणी येईपर्यंत ते बंद झाले होते. तेव्हापासून आतापर्यंत जवळा बंधाºयात पाणी आले नाही. पण मागणी मात्र कायम होती.जामखेड तालुका अवर्षण प्रवण आहे. शेजारील आष्टी, करमाळा, कर्जत तालुक्याला पाणी देताना जामखेड तालुका टाळला गेला. कुकडी प्रकल्पाच्या सुधारित पाणी वाटपात तालुक्यातील किती हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल? याबाबत पालकमंत्री राम शिंदे यांनी बोलणे त्यांनी टाळले.‘‘तालुक्याला कुकडीचे हक्काचे दोन टिएमसी पाणी मिळण्यासाठी ३५ वर्षांपासून दिवंगत नेते पांडुरंग गदादे यांनी आंदोलन केले. केले. त्यांच्याबरोबर आम्ही रास्ता रोको, उपोषण केले. आमच्या नावावर गुन्हे दाखल आहेत. सुधारित आराखड्यात तालुक्याला न्याय मिळेल, असे वाटले होते. पण पालकमंत्री राम शिंदे हे अपयशी ठरले. त्यांनी तालुक्याच्या तोंडाला पाने पुसली आहेत. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन उभारणार आहे.’’ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रा.मधुकर राळेभात यांनी मत व्यक्त केले.‘‘कायमस्वरूपी दुष्काळी जामखेड तालुक्यास सुधारित आराखड्यानुसार फक्त चौंडी व जवळा बंधाºयात पाणी येणार आहे. नवीन कालवे तसेच अस्तरीकरणामुळे पाण्याची गळती कमी होईल. त्यामुळे बचत झालेल्या पाण्यातून तालुक्याला वाढीव पाणी मिळायला पाहिजे होते. ते मिळविण्यात पालकमंत्र्यांना अपयश आले आहे. तालुक्यात किती हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार,याबाबत पालकमंत्र्यांनी आकडेवारी द्यावी.’अमोल राळेभात, कर्जत जामखेड युवक काँग्रेस अध्यक्ष.‘‘कुकडीतून तालुक्याला पाणी मिळण्याची जुनी मागणी आहे. सुधारित आराखड्यातील आकडेवारी फुगिर आहे. तालुक्याला न्याय देण्यात पालकमंत्री अपयशी ठरले. निधी कधी मिळणार? काम कधी सुरू होणार?हे अनिश्चित आहे. केवळ दिखावा आहे. आगामी निवडणुकींसाठीची ही चाल आहे.’’- दत्तात्रय वारे, जिल्हा सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस.‘‘आराखड्यानुसार तालुक्यातील जवळा, चौंडी येथील बंधाºयात पाणी येणार आहे. त्यामुळे तेथील परिसराला लाभ होईल. ही सुरूवात आहे. आगामी काळात तालुक्यातील उर्वरित भागात पाणी देण्यासाठी पालकमंत्री राम शिंदे प्रयत्नशील आहेत.’’ - रवींद्र सुरवसे, तालुकाध्यक्ष भाजप. 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेड