शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
4
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
5
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
6
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
7
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
8
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
9
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
10
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
11
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
12
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
13
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
14
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
15
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
16
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
17
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
18
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
19
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
20
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?

मन करारे प्रसन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 13:44 IST

आयुष्यात,समाजात व विश्वात घडणा-या चांगल्या-वाईट घटना केवळ मनामुळेच घडतात हे आपण सर्वजण जाणतो. हे सगळं करण्यासाठी ‘मन’या इंद्रियाकडे लक्ष केंद्रित कराव लागेल.

अध्यात्म विशेष / आयुष्यात,समाजात व विश्वात घडणा-या चांगल्या-वाईट घटना केवळ मनामुळेच घडतात हे आपण सर्वजण जाणतो. हे सगळं करण्यासाठी ‘मन’या इंद्रियाकडे लक्ष केंद्रित कराव लागेल. आपणास प्रश्न पडेल मन हे इंद्रिय आहे का ? हो पाच ज्ञान इंद्रिय पाच कर्मेंद्रिय व अकराव मन आहे. मन हे न दिसणार परंतु वायूपेक्षा अफाट वेग असलेल इंद्रिय आहे. आपल्या  म्हणूनच आपण सहजच म्हणतो त्यांची मन:स्थिती ठीक नाही. मन उदास आहे मन प्रसन्न वाटत वगैरे. मध्यंतरी आंध्रप्रदेशात डॉक्टर मुलीवर घडलेल्या अमानुष बलात्काराची घटना असो की निर्भयाची. अशा घटना देश विदेशात सातत्याने घडतात. निषेध, मोर्चे निघतात. आपण हळहळतो. विविध यंत्रणेला दोष देतो. मन खिन्न होते. असे प्रसंग आपल्या वाट्याला नकोत अशी काळजी मनात निर्माण होते. तर कधी सर्जिकल स्ट्राईक सारख्या  बातम्या ऐकल्या की आपल्या सैनिकाप्रती किंवा त्यामागे असणाºया खंबिर मनाच्या नेतृत्वाप्रती आभिमानाने ऊर भरुन येतो. दोन्हीही घटना या मनातील कुविचार व सामर्थ्यशाली विचारामुळे घडतात हे आपल्या लक्षात येईल. कुविचारी प्रवृत्तीला सुसंस्कृत करावे लागेलच. परंतु कुप्रवृत्तीकडुन अचानक होणाºा अन्यायाविरुध्द प्रतिकार करणाºया दुबळ्यामनोवृत्तीला खंबिर पणाचे संस्कार करावे लागतील. हा विषय केवळ विद्यार्थ्यांसाठी नसून प्रत्येक वयोगटातील स्त्री पुरुषांना लागु पडेल. या विश्वातील प्रत्येकाची धडपड आनंदासाठी, यशासाठी असते. प्रत्येक आई-वडिलांना अपेक्षा  असते की सर्वात गुणवंत यशस्वी मुले आमची असावीत. समाज हे मोठे विद्यापीठ आहे. आपण ज्या समाजात वावरतो तेथील लोकांच्या वागण्या-बोलण्यातून एकमेकांच्या मनावर न कळत संस्कार होत असतात. मग ते शिक्षक असो, मित्र असो की आई वडील. समाजातील आदर्श व्यक्ती, उपासना, पंथ आदी मनावर संस्कार घडवितात.  -राधेश्याम कुलकर्णी, अहमदनगर.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAdhyatmikआध्यात्मिक