शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

साखर उद्योगावरील जीएसटी हटवा -भानुदास मुरकुटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 15:25 IST

संकटातील साखर उद्योगाला सावरण्यासाठी केंद्राने जाहीर केलेल्या साडे आठ हजार कोटी रूपयांच्या पॅकेजचे आपण स्वागत करतो. मात्र, एवढे करून भागणार नाही, तर वस्तू व सेवा करातून (जीएसटी) या उद्योगाला वगळायला हवे, असे मत आॅल इंडिया डिस्टिलर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष भानुदास मुरकुटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

शिवाजी पवारश्रीरामपूर : संकटातील साखर उद्योगाला सावरण्यासाठी केंद्राने जाहीर केलेल्या साडे आठ हजार कोटी रूपयांच्या पॅकेजचे आपण स्वागत करतो. मात्र, एवढे करून भागणार नाही, तर वस्तू व सेवा करातून (जीएसटी) या उद्योगाला वगळायला हवे, असे मत आॅल इंडिया डिस्टिलर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष भानुदास मुरकुटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.काही गोष्टी पदरात पडल्याने सरकारचा हा निर्णय स्वागतार्ह आहे. कर रूपाने सरकारी तिजोरीत भर घालणारा तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या हजारोंच्या हाताला रोजगार देणाऱ्या या उद्योगाला सरकारने तारले पाहिजे. बाजारातील साखरेचे पडलेले दर रोखण्यासाठी किलोमागे २९ रूपये दर ठरवून दिला आहे. प्रत्येक कारखान्याची साखर विक्री मर्यादा निश्चित केली गेली. भाव स्थिर ठेवण्यासाठी विक्रीवर नियंत्रण आणले. निर्यातीला चालना देण्याचे धोरण व टनामागे ५५ रूपये अनुदान शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णयदेखील योग्य असल्याचे ते म्हणाले. पर्यावरणपूरक इंधन असलेल्या इथेनॉलच्या निर्मितीसाठी कारखान्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जुन्या प्रकल्पांच्या विस्तारीकरणालादेखील चालना मिळणार आहे. हे कर्ज सवलतीच्या व्याजदरात आहे. पूर्वी इथेनॉलला प्रति लिटर ४० रुपये ८५ पैैसे असे दर होते. त्यात २ रुपये ८५ पैैशांनी वाढ केली आहे. इथेनॉलच्या मिश्रणाने परकीय चलनाची बचत होत प्रदूषणदेखील रोखले जाणार आहे. त्याचा सर्वांनाच लाभ होणार आहे. इथेनॉलची वाहतूक व त्यावरील जीएसटीचा भार सरकार उचलणार असल्याचे त्यांनी सांगितले. साखर धंद्याला जीएसटीतून वगळल्यास त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल. ग्रामीण अर्थव्यवस्थेला सहकारी कारखानदारीने मोठा हातभार लावला. त्यामुळे जीएसटीबाबत निर्णय घेतला जावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.जुन्या कर्जांची पुनर्रचना करावी

साखर कारखान्यांवर असलेल्या जुन्या कर्जांची पुनर्रचना करायला हवी. दीर्घ मुदतीच्या कर्जाच्या परतफेडीचा कालावधी वाढवण्याचा निर्णय सरकारने घ्यावा. साखरेचे आगार असलेल्या पश्चिमी उत्तर प्रदेशातील कैराना लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपला फटका बसला. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकºयांमधील भावना लक्षात घेऊनच अखेर हे पॅकेज दिले असावे, असेही मुरकुटे म्हणाले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूर