शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

साखर उद्योगावरील जीएसटी हटवा -भानुदास मुरकुटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 15:25 IST

संकटातील साखर उद्योगाला सावरण्यासाठी केंद्राने जाहीर केलेल्या साडे आठ हजार कोटी रूपयांच्या पॅकेजचे आपण स्वागत करतो. मात्र, एवढे करून भागणार नाही, तर वस्तू व सेवा करातून (जीएसटी) या उद्योगाला वगळायला हवे, असे मत आॅल इंडिया डिस्टिलर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष भानुदास मुरकुटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

शिवाजी पवारश्रीरामपूर : संकटातील साखर उद्योगाला सावरण्यासाठी केंद्राने जाहीर केलेल्या साडे आठ हजार कोटी रूपयांच्या पॅकेजचे आपण स्वागत करतो. मात्र, एवढे करून भागणार नाही, तर वस्तू व सेवा करातून (जीएसटी) या उद्योगाला वगळायला हवे, असे मत आॅल इंडिया डिस्टिलर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष भानुदास मुरकुटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.काही गोष्टी पदरात पडल्याने सरकारचा हा निर्णय स्वागतार्ह आहे. कर रूपाने सरकारी तिजोरीत भर घालणारा तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या हजारोंच्या हाताला रोजगार देणाऱ्या या उद्योगाला सरकारने तारले पाहिजे. बाजारातील साखरेचे पडलेले दर रोखण्यासाठी किलोमागे २९ रूपये दर ठरवून दिला आहे. प्रत्येक कारखान्याची साखर विक्री मर्यादा निश्चित केली गेली. भाव स्थिर ठेवण्यासाठी विक्रीवर नियंत्रण आणले. निर्यातीला चालना देण्याचे धोरण व टनामागे ५५ रूपये अनुदान शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णयदेखील योग्य असल्याचे ते म्हणाले. पर्यावरणपूरक इंधन असलेल्या इथेनॉलच्या निर्मितीसाठी कारखान्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जुन्या प्रकल्पांच्या विस्तारीकरणालादेखील चालना मिळणार आहे. हे कर्ज सवलतीच्या व्याजदरात आहे. पूर्वी इथेनॉलला प्रति लिटर ४० रुपये ८५ पैैसे असे दर होते. त्यात २ रुपये ८५ पैैशांनी वाढ केली आहे. इथेनॉलच्या मिश्रणाने परकीय चलनाची बचत होत प्रदूषणदेखील रोखले जाणार आहे. त्याचा सर्वांनाच लाभ होणार आहे. इथेनॉलची वाहतूक व त्यावरील जीएसटीचा भार सरकार उचलणार असल्याचे त्यांनी सांगितले. साखर धंद्याला जीएसटीतून वगळल्यास त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल. ग्रामीण अर्थव्यवस्थेला सहकारी कारखानदारीने मोठा हातभार लावला. त्यामुळे जीएसटीबाबत निर्णय घेतला जावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.जुन्या कर्जांची पुनर्रचना करावी

साखर कारखान्यांवर असलेल्या जुन्या कर्जांची पुनर्रचना करायला हवी. दीर्घ मुदतीच्या कर्जाच्या परतफेडीचा कालावधी वाढवण्याचा निर्णय सरकारने घ्यावा. साखरेचे आगार असलेल्या पश्चिमी उत्तर प्रदेशातील कैराना लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपला फटका बसला. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकºयांमधील भावना लक्षात घेऊनच अखेर हे पॅकेज दिले असावे, असेही मुरकुटे म्हणाले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूर