शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
4
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
5
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
6
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
7
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
8
Stock Market Today: शेअर बाजाराचं फ्लॅट ओपनिंग, १११ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; फार्मा-रियल्टी शेअर्स आपटले
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
10
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
11
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
12
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
13
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
14
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
15
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
16
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
17
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
18
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
19
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
20
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला

आघाडीला सत्तेतून हटवा

By admin | Updated: October 6, 2014 23:56 IST

जामखेड/करंजी/अकोले : दरोडेखोर आघाडीतील नेत्यांच्या हाती पुन्हा सत्ता देऊ नका, असे आवाहन आ़ पंकजा मुंडे-पालवे यांनी केले़

जामखेड/करंजी/अकोले : काँगे्रस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली असून, उद्योगधंदे रसातळाला गेले़ महिला असुरक्षित असून, ५० हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या़ अशा दरोडेखोर आघाडीतील नेत्यांच्या हाती पुन्हा सत्ता देऊ नका, असे आवाहन आ़ पंकजा मुंडे-पालवे यांनी केले़पांढरीपूल येथे भाजपाचे उमेदवार शिवाजी कर्डिले व बाळासाहेब मुरकुटे तसेच जामखेड येथे प्रा़ राम शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलताना मुंडे यांनी राष्ट्रवादी-काँगे्रसवर जोरदार टीका केली़ मुंडे म्हणाल्या, दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांनी सामान्य माणसाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी लढा दिला़ त्यांचीच प्रेरणा घेऊन मी सामान्य माणसांसाठी काम करीत आहे़ राष्ट्रवादी-काँगे्रस सरकारच्या काळात भ्रष्टाचार वाढला़ राष्ट्रवादीने ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा केला, असा आरोप मुंडे यांनी केला़ राज्यातील उद्योगधंदे मेटाकुटीला आलेले असतानाही आघाडी सरकार राज्य नंबर वन असल्याची जाहिरातबाजी करीत आहे़ गेल्या १५ वर्षात राज्यात गुन्हेगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असून, महिला असुरक्षित आहेत़ गोपीनाथ मुंडे यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडविण्यासाठी आणि ग्रामीण महिलांचे अश्रू पुसण्यासाठी मी राज्यभर सभा घेत असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले़ पांढरीपूल येथील सभेस बबनराव पाचपुते, चंद्रशेखर कदम, विठ्ठलराव चाटे, अभय आव्हाड, मिर्झा मनियार, बाजीराव गवारे, विक्रम तांबे, नानासाहेब गागरे, विठ्ठल बिडकर, बाळासाहेब जठार, उदय पाटील आदी उपस्थित होते़ तर जामखेड येथील सभेस नामदेव राऊत, राजेंद्र देशमुख, सूर्यकांत भोंदे, डॉ़ भगवान मुरुमकर, विठ्ठलराव राऊत, रिपाइं जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, भाजपा तालुकाध्यक्ष रवी सुरवसे, विलास मोरे, मनोज राजगुरु, डॉ़ ज्ञानेश्वर झेंडे, बाजीराव गोपाळघरे, फिरोज पठाण, अर्चना राळेभात, सुवर्णा पाचपुते, सचिन बागवान, सुधाकर काळे, नारायण जाधव, जयेश जाधव, आजिनाथ नन्नवरे, बबनराव पवार आदी उपस्थित होते़ (तालुका प्रतिनिधी)