शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

हिरण हत्याकांडाचा तपास अद्यापही गुलदस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:20 IST

श्रीरामपूर : बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांच्या अपहरण आणि हत्याकांडाचा घटनाक्रम अजूनही पूर्णत: उजेडात आलेला नाही. आरोपींनी हिरण ...

श्रीरामपूर : बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांच्या अपहरण आणि हत्याकांडाचा घटनाक्रम अजूनही पूर्णत: उजेडात आलेला नाही. आरोपींनी हिरण यांची हत्या कशी व कुठे केली? मृतदेह एमआयडीसी परिसरात कधी आला? यावर पोलिसांनी समाधानकारक उत्तर दिलेले नाही. त्यामुळे गुन्ह्याच्या तपासाकडे अजूनही लक्ष लागलेले आहे.

व्यापारी हिरण यांचे अपहरण १ मार्च रोजी करण्यात आले होते. त्यानंतर तब्बल सात दिवसानंतर येथील वाकडी रस्त्यावर रेल्वेमार्गानजीक त्यांचा मृतदेह मिळाला होता. पोलिसांनी प्रारंभी सागर गंगावणे व बिट्टू वायकर यांना अटक केली होती. मात्र, त्यांच्याविरोधात पुरावे मिळाले नाही. त्यामुळे त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. आता नव्याने अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. त्यांना शनिवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.

सिन्नर येथून अटक केलेल्या आरोपींमध्ये अजय चव्हाण, नवनाथ निकम, आकाश खाडे, संदीप हांडे, जुनेद शेख यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून अपहरण करण्यासाठी वापरण्यात आलेले वाहन जप्त करण्यात आले. हिरण यांचा मोबाईल फोन, बँकेचे चेकबूक, पावत्या मिळून आल्या. बेलापूर व उक्कलगाव येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणामुळे पोलिसांना वाहनाचा शोध लागला.

आरोपींनी हिरण यांची हत्या अपहरणावेळी केली तसेच त्यांचा मृतदेह एमआयडीसी येथे आणून टाकला असे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, सात दिवस मृतदेह तेथे नजरेस पडला नाही, याची शक्यता खूप कमी आहे. हा परिसर मोठ्या वर्दळीचा आहे. तेथे रेल्वे चौकीदेखील आहे. सात दिवस मृतदेह सहजासहजी दिसून आला असता. आरोपींकडून त्यावर अधिक प्रकाश पडणार आहे.

व्यापारी हिरण यांचा जुना कामगार असलेल्या आकाश खाडे हा कटाचा मुख्य सूत्रधार आहे. पैशांच्या लुटीच्या उद्देशाने आरोपींनी हे कृत्य केले. खाडे याने आपली दुचाकी बंद पडल्याचा बहाणा करून हिरण यांची मदत मागितली. तो हिरण यांच्या दुचाकीवरून लुटीसाठी सज्ज असलेल्या साथीदारांपर्यंत गेला. त्यामुळे खाडे याने ओळख लपविण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. त्यामुळे हत्येचे उद्दिष्ट अद्यापही स्पष्ट होऊ शकलेले नाही.