शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

पिकांवरील औषध फवारणीमुळे पक्ष्यांची घटतेय संख्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 14:01 IST

माळा, गोफण, दगड, हाकारे असे  पूर्वीसारखे उभ्या पिकांचे राखण करतांना  शेतकरी दिसत नाही. कारण शेतावरील पक्ष्यांची संख्याच कमी झाली आहे.  गावातील उष्ट्या- खरकट्यावर ते आपली  गुजराण करु लागले आहेत.  तणनाशक आणि कीटकनाशक रासायनिक फवारणीमुळे  पक्ष्यांची संख्या कमी झाली आहे.

पुंडलिक  नवघरे। कोळपेवाडी : माळा, गोफण, दगड, हाकारे असे  पूर्वीसारखे उभ्या पिकांचे राखण करतांना  शेतकरी दिसत नाही. कारण शेतावरील पक्ष्यांची संख्याच कमी झाली आहे.  गावातील उष्ट्या- खरकट्यावर ते आपली  गुजराण करु लागले आहेत.  तणनाशक आणि कीटकनाशक रासायनिक फवारणीमुळे  पक्ष्यांची संख्या कमी झाली आहे. कमी होण्यासाठी अनेक कारणे आहेत. मात्र शेतकरी आणि पक्षीमित्रांशी चर्चा केली असता अनेक धक्कादायक माहिती समोर येते.   खरीप हंगामात कावळे, चिमण्या, साळुंक्या, ब्राम्हणीमैना आदी पक्षी रानात दिसायचे. या दिवसांत पिकांबरोबर रानात विविध गवतांची वाढ होत असते. त्यावर अळ्या, कीटक, फुलपाखरे जमा होतात. हेच पक्ष्यांचे आवडते खाद्य असल्याने पाखरं रानाकडे धाव घ्यायची. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. आधुनिक शेतीच्या नावाखाली शेतक-यांनी बांधावरील झाडे झुडपे तोडली. त्यामुळे पक्षांची आश्रयस्थाने नष्ट झाली. धान्य, गवतावरील अळ्या, कीटक खाऊन गुजराण करीत असतांना काही दिवसांनी गवत सुकून जाते. त्याच वेळेस उभ्या धाटांमध्ये धान्य भरु लागते व पक्षी कणसातील धान्याकडे वळतात. हे पक्षांचे अन्नचक्र आहे. बाजरी हे पक्ष्यांना खाण्यालायक धान्य. परंतु काळानुरुप त्यात बदल होत गेला. मका, सोयाबीन अशी पिके शेतकरी घेऊ लागले व पक्षांचे अन्न कमी झाले. गवत नाहीसे करण्यासाठी शेतक-यांनी आता  रासायनिक औषध फवारणीस सुरवात केली. त्यामुळे अळ्या कीटकांनी उभ्या पिकांचा फडशा पाडण्यास सुरवात केली. त्यावरचा उपाय म्हणून शेतक-यांनी पिकांवर औषध फवारणीला सुरवात केली. यामुळे पक्षांचे अन्न नाहीसे झाले. पर्यायाने पक्षांनी आता लोकवस्तींचा आश्रय घ्यायला सुरवात केली आहे.                      आहारातही आता बदल झाला आहे. टाकून दिलेले उष्टे-खरकटे अन्न हे पक्षी खाऊ लागले आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रजनन क्रियेवर विपरित परिणाम झाला आहे. पिल्ले कमजोर पैदा होत आहेत. त्यांचे मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे.  घरातील शिळे अन्न अंगणातील झाडाझुडपांना खत म्हणून टाकावे. अंगणात जमा होणाºया पक्ष्यांना जाड धान्य न टाकता भरड धान्य टाकावे म्हणजे त्यांना ते गिळण्यास त्रास होणार नाही, कोळपेवाडी येथील पक्षीमित्र चंद्रकांत लकडे यांनी सांगितले.शेतीच्या बांधावर नारळासारखी उंच झाडे लावावी म्हणजे पीक घेण्यास त्यांचा त्रास होणार नाही. पक्ष्यांची आश्रयस्थानेही नष्ट होणार नाहीत, असे सुरेगाव येथील शेतकरी रवी देवकर यांनी सांगितले.         

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्यAhmednagarअहमदनगर