शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

पिकांवरील औषध फवारणीमुळे पक्ष्यांची घटतेय संख्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 14:01 IST

माळा, गोफण, दगड, हाकारे असे  पूर्वीसारखे उभ्या पिकांचे राखण करतांना  शेतकरी दिसत नाही. कारण शेतावरील पक्ष्यांची संख्याच कमी झाली आहे.  गावातील उष्ट्या- खरकट्यावर ते आपली  गुजराण करु लागले आहेत.  तणनाशक आणि कीटकनाशक रासायनिक फवारणीमुळे  पक्ष्यांची संख्या कमी झाली आहे.

पुंडलिक  नवघरे। कोळपेवाडी : माळा, गोफण, दगड, हाकारे असे  पूर्वीसारखे उभ्या पिकांचे राखण करतांना  शेतकरी दिसत नाही. कारण शेतावरील पक्ष्यांची संख्याच कमी झाली आहे.  गावातील उष्ट्या- खरकट्यावर ते आपली  गुजराण करु लागले आहेत.  तणनाशक आणि कीटकनाशक रासायनिक फवारणीमुळे  पक्ष्यांची संख्या कमी झाली आहे. कमी होण्यासाठी अनेक कारणे आहेत. मात्र शेतकरी आणि पक्षीमित्रांशी चर्चा केली असता अनेक धक्कादायक माहिती समोर येते.   खरीप हंगामात कावळे, चिमण्या, साळुंक्या, ब्राम्हणीमैना आदी पक्षी रानात दिसायचे. या दिवसांत पिकांबरोबर रानात विविध गवतांची वाढ होत असते. त्यावर अळ्या, कीटक, फुलपाखरे जमा होतात. हेच पक्ष्यांचे आवडते खाद्य असल्याने पाखरं रानाकडे धाव घ्यायची. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. आधुनिक शेतीच्या नावाखाली शेतक-यांनी बांधावरील झाडे झुडपे तोडली. त्यामुळे पक्षांची आश्रयस्थाने नष्ट झाली. धान्य, गवतावरील अळ्या, कीटक खाऊन गुजराण करीत असतांना काही दिवसांनी गवत सुकून जाते. त्याच वेळेस उभ्या धाटांमध्ये धान्य भरु लागते व पक्षी कणसातील धान्याकडे वळतात. हे पक्षांचे अन्नचक्र आहे. बाजरी हे पक्ष्यांना खाण्यालायक धान्य. परंतु काळानुरुप त्यात बदल होत गेला. मका, सोयाबीन अशी पिके शेतकरी घेऊ लागले व पक्षांचे अन्न कमी झाले. गवत नाहीसे करण्यासाठी शेतक-यांनी आता  रासायनिक औषध फवारणीस सुरवात केली. त्यामुळे अळ्या कीटकांनी उभ्या पिकांचा फडशा पाडण्यास सुरवात केली. त्यावरचा उपाय म्हणून शेतक-यांनी पिकांवर औषध फवारणीला सुरवात केली. यामुळे पक्षांचे अन्न नाहीसे झाले. पर्यायाने पक्षांनी आता लोकवस्तींचा आश्रय घ्यायला सुरवात केली आहे.                      आहारातही आता बदल झाला आहे. टाकून दिलेले उष्टे-खरकटे अन्न हे पक्षी खाऊ लागले आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रजनन क्रियेवर विपरित परिणाम झाला आहे. पिल्ले कमजोर पैदा होत आहेत. त्यांचे मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे.  घरातील शिळे अन्न अंगणातील झाडाझुडपांना खत म्हणून टाकावे. अंगणात जमा होणाºया पक्ष्यांना जाड धान्य न टाकता भरड धान्य टाकावे म्हणजे त्यांना ते गिळण्यास त्रास होणार नाही, कोळपेवाडी येथील पक्षीमित्र चंद्रकांत लकडे यांनी सांगितले.शेतीच्या बांधावर नारळासारखी उंच झाडे लावावी म्हणजे पीक घेण्यास त्यांचा त्रास होणार नाही. पक्ष्यांची आश्रयस्थानेही नष्ट होणार नाहीत, असे सुरेगाव येथील शेतकरी रवी देवकर यांनी सांगितले.         

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्यAhmednagarअहमदनगर