शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

पहिलीच्या पटसंख्येत तीन हजारांची घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 11:26 IST

जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या घटीचे सत्र सुरूच असून,चालूवर्षी पहिल्याच्या वर्गातील पटसंख्येत तीन हजारांनी घट झाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे शिक्षक यंदाही अतिरिक्त ठरणार असल्याचे उघड झाले आहे.

अहमदनगर : जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या घटीचे सत्र सुरूच असून,चालूवर्षी पहिल्याच्या वर्गातील पटसंख्येत तीन हजारांनी घट झाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे शिक्षक यंदाही अतिरिक्त ठरणार असल्याचे उघड झाले आहे.जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढावी, यासाठी शिक्षण समितीकडून विशेष प्रयत्न करण्यात आले. शिष्यवृत्ती परीक्षेचे शुल्क जिल्हा परिषदेने भरले. याशिवाय अनेक उपक्रम वर्षभरात राबविण्यात आले. त्यामुळे यंदा जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या स्थिर राहिल, अशी अपेक्षा शिक्षण समितीला होती. मात्र शिक्षण विभागाच्या अहवालानुसार पहिलीच्या वर्गातील पटसंख्या मागील वर्षीच्या तुलनेत घटली आहे. मागीलवर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्याच्या वर्गात ३ हजार ३४१ एवढे कमी प्रवेश झाले़ गेल्या २०१०पासून पटसंख्या घटीचे सत्र सुरू आहे. ते अद्याप पाट सोडायला तयार नाही़ फरक एवढाच की पूर्वीची घट ही ५ ते १० हजारांच्या घरात असे़. ती आता ३ ते ४ हजारांवर आली आहे. याचाच अर्थ पटसंख्या स्थिर ठेवण्यात जिल्हा परिषदेला अद्याप यश आलेले नाही.जिल्हा परिषद शिक्षकांनी गावोगावच्या शाळेत दाखल पात्र असलेल्या मुलांचे सर्वेक्षण केले. सर्वेक्षण शाळा सुरू होण्याआधीच केले होते. सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील सहा वर्षांहून अधिक वय असलेली ४१ हजार ३३९ मुले होती़ प्रत्यक्षात शाळा सुरू झाल्यानंतर यापेक्षा अधिक मुलांनी पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतला आहे. तसा अहवाल शिक्षण विभागाने समितीला सादर केला आहे. सर्वेक्षण करताना सहा वर्षे वय असणाऱ्या मुलांचेच सर्वेक्षण करण्यात आले, पण, शाळा सुरू झाल्यानंतर ५ वर्षे आणि ८ महिने पूर्ण असलेल्या मुलांना प्रवेश देण्याचा आदेश आला. त्यामुळे ही पटसंख्या वाढली असल्याचे शिक्षण विभागाचे म्हणने आहे.अशी घटली पटसंख्याअकोले-९२, संगमनेर-७८, कोपरगाव-९३, श्रीरामपूर-२५, राहाता-३०, राहुरी-४०, नेवासा-६४९, शेवगाव-३२, पाथर्डी-३५, जामखेड-६८, कर्जत-४६, श्रीगोंदा-५७, पारनेर-५०, नगर-५८सर्वेक्षणावर प्रश्नचिन्हशाळा सुरू होण्याआधी शिक्षकांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात दाखलपात्र मुलांची संख्या ४१ हजार ३३९ आहे. यंदा पहिलीच्या वर्गात घेतलेल्या मुलांची संख्या ४४ हजार ३३४ एवढी आहे.  चालूवर्षी एकही मुलगा खासगी शाळेत गेला नाही का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत असून, सर्वेक्षणावरच प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar zpअहमदनगर जिल्हा परिषद