शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

पहिलीच्या पटसंख्येत तीन हजारांची घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 11:26 IST

जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या घटीचे सत्र सुरूच असून,चालूवर्षी पहिल्याच्या वर्गातील पटसंख्येत तीन हजारांनी घट झाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे शिक्षक यंदाही अतिरिक्त ठरणार असल्याचे उघड झाले आहे.

अहमदनगर : जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या घटीचे सत्र सुरूच असून,चालूवर्षी पहिल्याच्या वर्गातील पटसंख्येत तीन हजारांनी घट झाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे शिक्षक यंदाही अतिरिक्त ठरणार असल्याचे उघड झाले आहे.जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढावी, यासाठी शिक्षण समितीकडून विशेष प्रयत्न करण्यात आले. शिष्यवृत्ती परीक्षेचे शुल्क जिल्हा परिषदेने भरले. याशिवाय अनेक उपक्रम वर्षभरात राबविण्यात आले. त्यामुळे यंदा जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या स्थिर राहिल, अशी अपेक्षा शिक्षण समितीला होती. मात्र शिक्षण विभागाच्या अहवालानुसार पहिलीच्या वर्गातील पटसंख्या मागील वर्षीच्या तुलनेत घटली आहे. मागीलवर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्याच्या वर्गात ३ हजार ३४१ एवढे कमी प्रवेश झाले़ गेल्या २०१०पासून पटसंख्या घटीचे सत्र सुरू आहे. ते अद्याप पाट सोडायला तयार नाही़ फरक एवढाच की पूर्वीची घट ही ५ ते १० हजारांच्या घरात असे़. ती आता ३ ते ४ हजारांवर आली आहे. याचाच अर्थ पटसंख्या स्थिर ठेवण्यात जिल्हा परिषदेला अद्याप यश आलेले नाही.जिल्हा परिषद शिक्षकांनी गावोगावच्या शाळेत दाखल पात्र असलेल्या मुलांचे सर्वेक्षण केले. सर्वेक्षण शाळा सुरू होण्याआधीच केले होते. सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील सहा वर्षांहून अधिक वय असलेली ४१ हजार ३३९ मुले होती़ प्रत्यक्षात शाळा सुरू झाल्यानंतर यापेक्षा अधिक मुलांनी पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतला आहे. तसा अहवाल शिक्षण विभागाने समितीला सादर केला आहे. सर्वेक्षण करताना सहा वर्षे वय असणाऱ्या मुलांचेच सर्वेक्षण करण्यात आले, पण, शाळा सुरू झाल्यानंतर ५ वर्षे आणि ८ महिने पूर्ण असलेल्या मुलांना प्रवेश देण्याचा आदेश आला. त्यामुळे ही पटसंख्या वाढली असल्याचे शिक्षण विभागाचे म्हणने आहे.अशी घटली पटसंख्याअकोले-९२, संगमनेर-७८, कोपरगाव-९३, श्रीरामपूर-२५, राहाता-३०, राहुरी-४०, नेवासा-६४९, शेवगाव-३२, पाथर्डी-३५, जामखेड-६८, कर्जत-४६, श्रीगोंदा-५७, पारनेर-५०, नगर-५८सर्वेक्षणावर प्रश्नचिन्हशाळा सुरू होण्याआधी शिक्षकांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात दाखलपात्र मुलांची संख्या ४१ हजार ३३९ आहे. यंदा पहिलीच्या वर्गात घेतलेल्या मुलांची संख्या ४४ हजार ३३४ एवढी आहे.  चालूवर्षी एकही मुलगा खासगी शाळेत गेला नाही का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत असून, सर्वेक्षणावरच प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar zpअहमदनगर जिल्हा परिषद