शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
4
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
5
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
6
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
7
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
8
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
9
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
10
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
11
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
12
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
13
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
14
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
15
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
16
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
17
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
18
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
19
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
20
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...

बदल्यांमधील त्रुटी दूर करण्याचा निर्णय

By admin | Updated: June 10, 2016 23:38 IST

अहमदनगर : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांसह अन्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये त्रुटी आढळून आल्यास अशा सर्व बदल्या विभागीय महसूल आयुक्त यांच्या मार्फत दुरूस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अहमदनगर : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांसह अन्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये त्रुटी आढळून आल्यास अशा सर्व बदल्या विभागीय महसूल आयुक्त यांच्या मार्फत दुरूस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शुक्रवारी जि.प. पदाधिकारी, विभागीय महसूल उपायुक्त (आस्थापना) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यात बैठक झाली. यावेळी पदाधिकारी-सदस्य आणि प्रशासन यांच्यात झालेले समज गैरसमजावर पडदा टाकण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत काही सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यपध्दती विषयी उपायुक्तांकडे तक्रार केली. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेनंतर शिक्षकांच्या बदल्यांवरून प्रशासन विरोधात पदाधिकारी-सदस्य असा संघर्ष पहावयास मिळाला. मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे यांच्यावर दबाब तंत्राचा वापर करूनही ते बदल्यांमध्ये बदल करत नसल्याने काही सदस्य संतप्त होते. अखेर या वादात विभागीय उपायुक्त सुखदेव बनकर यांची मध्यस्ती महत्वाची ठरली आहे. सर्वसाधारण सभेच्या दुसऱ्या दिवशी बनकर श्रीगोंदा दौऱ्यावर होते. त्या ठिकाणी बदल्यांमुळे निर्माण झालेल्या असंतोषाची माहिती त्यांच्या कानावर गेली. त्यानंतर या वादातून मार्ग काढण्यासाठी त्यांना गळ घालण्यात आली. यापूर्वी दोनदा उपायुक्त बनकर यांच्या उपस्थित बैठक बोलावण्यात आली होती. प्रत्यक्षात बनकर यांच्या गैरहजेरीमुळे ही बैठक झाली नव्हती. शुक्रवारी बनकर यांच्या उपस्थितीत नगरला बैठक झाली. यावेळी अध्यक्षा मंजुषा गुंड, उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, मुख्य कार्यकारी अधिकारी बिनवडे, सभापती बाबासाहेब दिघे, शरद नवले, राजेंद्र फाळके, बाळासाहेब हराळ, सुजित झावरे उपस्थित होते. सुरूवातीला सदस्यांनी बदल्यांमधील त्रुटी मांडल्या. कधी कर्मचाऱ्यांची पदोन्नती करून बदल्या केल्या असत्या तर कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला नसता, असा सूर आळवण्यात आला. उपायुक्त बनकर यांनी सर्व ऐकून घेतल्यावर ज्या ज्या कर्मचाऱ्यांवर बदल्यात अन्याय झाला आहे, अशा कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. याला मुख्य कार्यकारी अधिकारी बिनवडे आणि उपाध्यक्ष शेलार यांनी दुजोराही दिला. पदाधिकारी आणि प्रशासन वादावर पडदा पडल्याचे सांगण्यात आले. पुढे अवघे सहा महिने असून प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांनी हातात-हात घालून काम करणार असल्याचा दावा यावेळी करण्यात आला. (प्रतिनिधी)शिक्षक संवर्गाची बिंदू नामावली तयार करण्याचे काम सुरू आहे. ते पूर्ण झाल्यावर रिक्त असणाऱ्या जागा पाहून आंतरजिल्हा बदली पात्र शिक्षकांचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी बिनवडे यांनी स्पष्ट केले. तर उपाध्यक्ष शेलार यांनी पदोन्नतीनंतर रिक्त होणाऱ्या जागा आणि बिंदूनामावली दोन्ही एकत्र करून रिक्त होणाऱ्या सर्व जागांवर आंतरजिल्हा बदली पात्र शिक्षकांना सामावून घेणार असल्याचे सांगितले. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेनंतर समानिकरणात काही शिक्षक आणि मुख्याध्यापक यांची गैरसोय झालेली आहे. हा प्रश्न कसा सोडवता येईल, यासंदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयाकडून मार्गदर्शन मागवलेले आहे. त्यासंदर्भात अद्याप काहीही पत्र आलेले नसल्याचे बिनवडे यांनी सांगितले. लवकरच तहकूब सर्वसाधारण सभेची तारीख घेऊन ही सभा घेण्यात येणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.