शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

दारूनिर्मिती न करण्याचा निर्णय दूरदृष्टीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:19 IST

संगमनेर : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी कारखान्यातून दारूनिर्मिती न करण्याचा निर्णय दूरदृष्टीने घेतला. हीच परंपरा व आदर्श तत्त्वे साखर ...

संगमनेर : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी कारखान्यातून दारूनिर्मिती न करण्याचा निर्णय दूरदृष्टीने घेतला. हीच परंपरा व आदर्श तत्त्वे साखर कारखाना व अमृत उद्योगसमूहाने जपत देशात लौकिक प्राप्त केला आहे. आर्थिक शिस्त, काटकसर, पारदर्शक या वाटचालीवर मार्गक्रमण करत असलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची वाटचाल गौरवास्पद आहे, असे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

कारखान्याच्या ४० हजार लिटर क्षमतेच्या नवीन इथेनॉल प्रकल्पासह सीपीयू युनिट व लिप्टचा शुभारंभ रविवारी (दि. १४) करण्यात आला. यावेळी मंत्री थोरात बोलत होते. यावेळी अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर, आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, महानंदाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. माधवराव कानवडे, अमृतवाहिनी बँकेचे अध्यक्ष अमित पंडित, कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, उपाध्यक्ष संतोष हासे, जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे, पंचायत समितीच्या सभापती सुनंदा जोर्वेकर, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी उपस्थित होते.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी घालून दिलेल्या आदर्श तत्त्वांवर कारखान्याची वाटचाल सुरू आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मार्गक्रमण करत संगमनेर तालुका प्रगतिपथावर पोहोचला आहे. कारखान्याने नव्याने पाच हजार पाचशे मेट्रिक टन क्षमतेसह ३० मेगावॉट वीजनिर्मिती प्रकल्प हाती घेतला. हा सर्वांसाठी दिशादर्शक ठरला. याचबरोबर डिस्टलरी प्रकल्पाचे नूतनीकरण करताना चाळीस हजार लिटर क्षमतेच्या नवीन इथेनॉल प्रकल्प सुरू झाला. वीजनिर्मिती व इथेनॉल प्रकल्पातून कारखान्याला मदत होणार आहे. असेही मंत्री थोरात म्हणाले.

कारखान्याचे संचालक चंद्रकांत कडलग, मीनानाथ वर्पे, रोहिदास पवार, रमेश गुंजाळ, माणिक यादव, अनिल काळे, संपतराव गोडगे, गणपतराव सांगळे, भाऊसाहेब शिंदे, डॉ. तुषार दिघे, दादासाहेब कुटे, आर.बी. रहाणे, मंदा वाघ, विनोद हासे, अभिजित ढोले, भास्करराव आरोटे, हौशीराम सोनवणे, सोमेश्वर दिवटे, निखिल पापडेजा, गौरव डोंगरे, भारत मुंगसे, किशोर टोकसे, राजेंद्र गुंजाळ, मीरा वर्पे, किरण कानवडे, भारत देशमुख आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी, तर सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले.