शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

आदिवासीच्या मृत्यूप्रकरणी नगरचे पोलीस अधीक्षक, पालकमंत्र्यांच्या कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 16:09 IST

आदिवासी समाजाच्या शेतक-याच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी व्हावी, तसेच आरोपींना तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी आदिवासी समाजाने जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच पालकमंत्री राम शिंदे यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला.

अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील कळसपिंप्री येथील शासकीय जमिनीत शेती करुन उपजिविका करणाऱ्या आदिवासी समाजाच्या शेतक-याच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी व्हावी, तसेच आरोपींना तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी आदिवासी समाजाने जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच पालकमंत्री राम शिंदे यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला.पालकमंत्री शिंदे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, कळसपिंप्री येथे सुमारे २५ कुटुंब आदिवासी समाजातील आहेत़ या कुटुंबातील मयत कंस लक्ष्मण पवार हे शासकीय जमिनीत शेती करीत होते. त्यांमुळे गावातील काही गुंडांनी त्यांची राहती घरे जाळून बेदम मारहाण केली़ मयत पवार यांचा मृत्यूही गावातील गुंड लोकांनीच घडवून आणला आहे. सदर घटना ही मॉब लिचिंग प्रकारात मोडत असून, आरोपींना कडक शिक्षा व्हावी, ज्येष्ठ विधिज्ज्ञ अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची या खटल्यात सरकारी वकील म्हणून नियुक्ती व्हावी अशा विविध मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस