शहरं
Join us  
Trending Stories
1
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
2
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
3
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
4
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
5
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
6
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
7
Video - "मी तुमच्या मुलीवर उपचार करणार नाही..."; डॉक्टरची रुग्णाच्या वडिलांना मारहाण
8
Vastu Shastra: वास्तु शास्त्रानुसार घराच्या 'या' भागात ठेवा मोरपीस, आयुष्यात भरतील नवे रंग!
9
मायक्रोसॉफ्टने नोकियानंतर या कंपनीवर तगडा पैसा लावला; Ai च्या इतिहासातील सर्वात मोठी डील, फळणार का?
10
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
11
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
12
पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठ्ठा राडा !! मोहम्मद रिझवान पाक क्रिकेट बोर्डाला नडला... काय घडलं?
13
किरकोळ तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; सेन्सेक्स ८५,००० अंकांच्या आणि निफ्टी २६,००० अंकांच्या जवळ
14
PPF ला साधं समजू नका! पती-पत्नी मिळून बनवू शकता ₹१.३३ कोटींचा फंड, तोही टॅक्स फ्री
15
'तो' प्रवास ठरला शेवटचा! कुटुंबीयांसमोरच वडील आणि मुलीचा होरपळून मृत्यू; १० जण जखमी
16
ब्राझीलमध्ये रेड कमांडोविरोधात युद्ध सुरु; रिओमध्ये मोठ्या अड्ड्यावर हेलिकॉप्टरद्वारे हल्ला, माफियांकडून ड्रोन हल्ल्याने प्रत्यूत्तर
17
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
18
बदल्याची आग! मोबाईल डेटा, हार्ड ड्राइव्ह, अश्लील...; २० वर्षीय मुलीने का केली पार्टनरची हत्या?
19
आजचे राशीभविष्य, २९ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ, पण गुंतवणूक करताना सावधान; शुभ दिवस
20
शोधत होते दारू, सापडले एक कोटी रुपये; तपासणी नाक्यावर खाजगी बसमध्ये आढळली अवैध रक्कम

दूषित पाण्यातून होतोय जीवघेणा वाळू उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:21 IST

रोहित टेके लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : शहरालगत असलेल्या गोदावरी नदीत कोपरगाव नगर परिषदेने सोडलेल्या मैलामिश्रीत हानिकारक घटक असलेल्या ...

रोहित टेके

लोकमत न्यूज नेटवर्क

कोपरगाव : शहरालगत असलेल्या गोदावरी नदीत कोपरगाव नगर परिषदेने सोडलेल्या मैलामिश्रीत हानिकारक घटक असलेल्या सांडपाण्यामुळे नदी प्रदूषित झाली आहे. याच नदीच्या प्रदूषित पात्रातील पाण्यात उतरून माणसाद्वारे जीव धोक्यात घालून राजरोस वाळूचा उपसा करण्यात येत आहे. या दूषित पाण्यातून दुर्घटनादेखील होऊ शकते; मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

कोपरगाव शहरातील गटारीद्वारे गोदावरी नदीत मैलामिश्रीत हानिकारक रासायनिक घटक असलेले सांडपाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे शहरालगत असलेल्या नदीपात्रात मोठ्या प्रमाणात दूषित पाणी साठलेले असून, त्यास दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे रोगराई पसरण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. सद्यस्थितीत याच दूषित पाण्यात माणसे उतरून प्रसंगी पाण्यात डुबकी मारून पाटीपाटी वाळू काढून तिचे ढिगारे घातले जात आहेत. नंतर हीच वाळू शहरातील विविध ठिकाणी बांधकामासाठी गाढवांद्वारे वाहतूक केली जात आहे. या कामाला दररोज पहाटे सुरुवात करण्यात येते. यात अल्पवयीन मुलांचादेखील समावेश आहे.

ज्यावेळी हे दूषित पाणी गटारीद्वारे नदीत वाहत येते, त्यावेळी त्यातील ऑक्सिजनचे प्रमाण पूर्णतः नष्ट झालेले असते. याउलट हे पाणी साचून राहिल्यास त्यातून मिथेन नावाच्या घातक वायूची निर्मिती होते. अनेक प्रकारच्या जीवजंतूची निर्मितीदेखील होते. अशा पाण्यातून निघणारा मिथेन हा वायू निसर्गासह मनुष्याच्या जीविताला अत्यंत हानिकारक आहे. या वायूच्या जास्त संपर्कात आल्यास जीवितास धोकादेखील होऊ शकतो, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

.......

प्रशासन का करतेय दुर्लक्ष?

कोपरगाव शहरालगत होणाऱ्या या जीवघेण्या वाळू उपशाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का होत आहे? हा उपसा प्रशासनाची परवानगी काढून होतो का? आणि तसे असल्यास सर्व दुष्परिणाम माहीत असतानादेखील अशा जीवघेण्या वाळू उपशाला परवानगी आहे? जर विनापरवानगी हा उपसा सुरू असेल तर प्रशासन डोळे मिटून गप्प का बसलेले आहे, असा सवाल व्यक्त होत आहे?

...............

अशा पद्धतीने वाळू उपसा करणाऱ्याविरुद्ध वारंवार कारवाई केली आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांची गाढवं जप्त केली आहेत. यापुढेही कारवाई करण्यात येईल.

-योगश चंद्रे, तहसीलदार, कोपरगाव.

...............

कोपरगाव शहरालगत नदीत संपूर्ण नदीचे सांडपाणी साचलेले आहे. ते पूर्णतः दूषित झाल्याने त्यातून मिथेन या जीवघेण्या वायुची तसेच जीवजंतूची निर्मिती होते. या पाण्यात माणूस उतरल्यानंतर त्याचा अचानक या वायूशी संपर्क आल्यास चक्कर येऊन पाण्यात पडून दुर्घटना घडू शकते. अशा पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर त्वचेचे आजार जडू शकतात.

-डॉ. कृष्णा फुलसौंदर, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, कोपरगाव.

.................

फोटोओळी –

कोपरगाव शहरालगत असलेल्या गोदावरी नदीच्या दूषित पाण्यात उतरून माणसांद्वारे जीवघेणा वाळू उपसा केला जात आहे.