शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

दूषित पाण्यातून होतोय जीवघेणा वाळू उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:21 IST

रोहित टेके लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : शहरालगत असलेल्या गोदावरी नदीत कोपरगाव नगर परिषदेने सोडलेल्या मैलामिश्रीत हानिकारक घटक असलेल्या ...

रोहित टेके

लोकमत न्यूज नेटवर्क

कोपरगाव : शहरालगत असलेल्या गोदावरी नदीत कोपरगाव नगर परिषदेने सोडलेल्या मैलामिश्रीत हानिकारक घटक असलेल्या सांडपाण्यामुळे नदी प्रदूषित झाली आहे. याच नदीच्या प्रदूषित पात्रातील पाण्यात उतरून माणसाद्वारे जीव धोक्यात घालून राजरोस वाळूचा उपसा करण्यात येत आहे. या दूषित पाण्यातून दुर्घटनादेखील होऊ शकते; मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

कोपरगाव शहरातील गटारीद्वारे गोदावरी नदीत मैलामिश्रीत हानिकारक रासायनिक घटक असलेले सांडपाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे शहरालगत असलेल्या नदीपात्रात मोठ्या प्रमाणात दूषित पाणी साठलेले असून, त्यास दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे रोगराई पसरण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. सद्यस्थितीत याच दूषित पाण्यात माणसे उतरून प्रसंगी पाण्यात डुबकी मारून पाटीपाटी वाळू काढून तिचे ढिगारे घातले जात आहेत. नंतर हीच वाळू शहरातील विविध ठिकाणी बांधकामासाठी गाढवांद्वारे वाहतूक केली जात आहे. या कामाला दररोज पहाटे सुरुवात करण्यात येते. यात अल्पवयीन मुलांचादेखील समावेश आहे.

ज्यावेळी हे दूषित पाणी गटारीद्वारे नदीत वाहत येते, त्यावेळी त्यातील ऑक्सिजनचे प्रमाण पूर्णतः नष्ट झालेले असते. याउलट हे पाणी साचून राहिल्यास त्यातून मिथेन नावाच्या घातक वायूची निर्मिती होते. अनेक प्रकारच्या जीवजंतूची निर्मितीदेखील होते. अशा पाण्यातून निघणारा मिथेन हा वायू निसर्गासह मनुष्याच्या जीविताला अत्यंत हानिकारक आहे. या वायूच्या जास्त संपर्कात आल्यास जीवितास धोकादेखील होऊ शकतो, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

.......

प्रशासन का करतेय दुर्लक्ष?

कोपरगाव शहरालगत होणाऱ्या या जीवघेण्या वाळू उपशाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का होत आहे? हा उपसा प्रशासनाची परवानगी काढून होतो का? आणि तसे असल्यास सर्व दुष्परिणाम माहीत असतानादेखील अशा जीवघेण्या वाळू उपशाला परवानगी आहे? जर विनापरवानगी हा उपसा सुरू असेल तर प्रशासन डोळे मिटून गप्प का बसलेले आहे, असा सवाल व्यक्त होत आहे?

...............

अशा पद्धतीने वाळू उपसा करणाऱ्याविरुद्ध वारंवार कारवाई केली आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांची गाढवं जप्त केली आहेत. यापुढेही कारवाई करण्यात येईल.

-योगश चंद्रे, तहसीलदार, कोपरगाव.

...............

कोपरगाव शहरालगत नदीत संपूर्ण नदीचे सांडपाणी साचलेले आहे. ते पूर्णतः दूषित झाल्याने त्यातून मिथेन या जीवघेण्या वायुची तसेच जीवजंतूची निर्मिती होते. या पाण्यात माणूस उतरल्यानंतर त्याचा अचानक या वायूशी संपर्क आल्यास चक्कर येऊन पाण्यात पडून दुर्घटना घडू शकते. अशा पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर त्वचेचे आजार जडू शकतात.

-डॉ. कृष्णा फुलसौंदर, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, कोपरगाव.

.................

फोटोओळी –

कोपरगाव शहरालगत असलेल्या गोदावरी नदीच्या दूषित पाण्यात उतरून माणसांद्वारे जीवघेणा वाळू उपसा केला जात आहे.