शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

बंधारे तुडुंब भरल्याने देवकौठे झाले पाणीदार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 11:01 IST

तळेगाव दिघे : संगमनेर तालुक्याच्या सरहद्दीवर असणाऱ्या देवकौठे गावांमध्ये अकरा सिमेंट बंधारे बांधले. भोजापूर धरणाच्या चारीचे पाणी व पावसाचे पाणी एकत्रित आल्याने देवकौठे येथील सर्व बंधारे तुडुंब भरल्याने सर्व शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

तळेगाव दिघे : संगमनेर तालुक्याच्या सरहद्दीवर असणाऱ्या देवकौठे गावांमध्ये अकरा सिमेंट बंधारे बांधले. भोजापूर धरणाच्या चारीचे पाणी व पावसाचे पाणी एकत्रित आल्याने देवकौठे येथील सर्व बंधारे तुडुंब भरल्याने सर्व शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

 तळेगाव दिघे पट्ट्यातील देवकौठे हे गाव टोकावर असून या गावांमध्ये कुक्कुटपालन व दुग्ध व्यवसायातून मोठी आर्थिक क्रांती झाली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी याठिकाणी अनेक विकासाच्या योजना राबवल्या आहेत. त्यामुळे तालुक्यात एक आदर्श गाव म्हणून देवकौठे गावाचा उल्लेख होतो. शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक सुबत्ता आलेल्या या गावांमध्ये नामदार बाळासाहेब थोरात यांच्या निधीतून अकरा सिमेंट बंधारे बांधण्यात आले. याचबरोबर नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या निधीतून दोन बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली. सध्या तळेगाव भागात चांगला पाऊस झाल्याने शेतकरी समाधानी आहे. निसर्गाच्या कृपेने यावर्षी या भागात खूप चांगला पाऊस झाला.

थोरात साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांच्या सततच्या पाठपुराव्यातून भोजापूर धरण पूरचारीचे पाणीही पिंपळे तलावामार्गे देवकौठे पर्यंत पोहोचले. पावसाचे पाणी व भोजापूर चारीचे पाणी एकत्रित आल्याने देवकौठे मधील सर्व बंधारे तुडुंब भरले आहेत. तसेच सुमारे १४ वर्षांनी देवी नदीही वाहती झाली, त्यामुळे परिसरात आनंदाचे वातावरण आहे. मागील वर्षीही मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली भोजापूर चारीचे पाणी देवकौठे पर्यंत आले होते. याही वर्षी हे पाणी आणण्यासाठी मार्केट कमिटीचे संचालक भारत मुंगसे, तालुका युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष इंजि. सुभाषराव सांगळे, भागवतराव आरोटे, एकनाथ मुंगसे, राजेंद्र कहांडळ, अशोक मुंगसे, ज्ञानेश्वर मुंगसे, अण्णासाहेब शेवकर, नामदेव कहांडळ यांच्यासह कार्यकर्त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.

थोरात कारखान्याच्या वतीने भोजापूर चारीचे पाणी तळेगाव पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू असून दमदार पावसामुळे देवकौठेत आलेल्या मुबलक पाण्याने तुडुंब भरलेल्या बंधाऱ्यांमुळे सर्वत्र हिरवाई पसरली असून विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.फोटो : संगमनेर तालुक्यातील देवकौठे येथील पाण्याने तुडुंब भरलेला बंधारा दिसत आहे. 

 

  
टॅग्स :AhmednagarअहमदनगरDamधरण