शहरं
Join us  
Trending Stories
1
हाँगकाँगमध्ये हाहाकार! २,००० फ्लॅट्सचे गगनचुंबी टॉवर एकाचवेळी पेटले, १३ जणांचा मृत्यू...
2
"प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकण्याची धमकी, न्यूड फोटोने ब्लॅकमेलिंग, इतर पुरुषांसोबत...!"; सेलिना जेटलीचे पतीवर 7 गंभीर आरोप
3
'या' स्मॉलकॅप कंपनीत रोहित शर्माची मोठी गुंतवणूक, खरेदी केले शेअर; इंट्रा-डेमध्ये स्टॉक बनला रॉकेट
4
राम मंदिर ध्वजारोहणावर बोलणं पाकिस्तानला महागात पडलं, भारतानं आरसा दाखवत गप-गार केलं!
5
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
6
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
7
Travel : कोल्डड्रिंकपेक्षाही स्वस्त पेट्रोल, इतर गोष्टीही खिशाला परवडणाऱ्या; भारतीयांसाठी व्हिसा फ्री आहे 'हे' बेट!
8
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
9
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
10
२०२६ ला ५ राशींची अग्निपरीक्षा सुरू, साडेसाती तीव्र होणार; शनि प्रकोप-प्रतिकूल, अखंड सावधान!
11
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
12
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
13
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
14
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
15
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
16
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
17
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
18
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
19
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
20
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
Daily Top 2Weekly Top 5

धरणातील पाण्याचे वाद मिटणार-देवेंद्र फडणवीस; स्नेहलता कोल्हेंच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांची कोपरगावात सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 13:17 IST

नाशिक, नगर जिल्ह्यातील धरणाच्या पाण्यावरुन कायम संघर्ष होतात. यासाठी गोदावरी खो-यातील पाण्याची तूट भरुन काढण्यासाठी समुद्रात वाहून जाणारे पाणी वळविण्यात येणार आहे. यासाठीचा सर्व आराखडा तयार असून या कामाचे टेंडर लवकरच निघेल. यामुळे जायकवाडीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. यामुळे धरणातील शेती, पिण्याच्या पाण्याचे वाद कायम मिटणार आहेत, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.  

कोपरगाव : नाशिक, नगर जिल्ह्यातील धरणाच्या पाण्यावरुन कायम संघर्ष होतात. यासाठी गोदावरी खो-यातील पाण्याची तूट भरुन काढण्यासाठी समुद्रात वाहून जाणारे पाणी वळविण्यात येणार आहे. यासाठीचा सर्व आराखडा तयार असून या कामाचे टेंडर लवकरच निघेल. यामुळे जायकवाडीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. यामुळे धरणातील शेती, पिण्याच्या पाण्याचे वाद कायम मिटणार आहेत, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.  कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार आमदार स्रेहलता कोल्हे यांच्या प्रचारार्थ कोपरगाव येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. याप्रसंगी राज्याचे गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे, कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. दुष्काळ, पूर अवर्षणामुळे पिके जळतात. यातून शेतक-यांचे मोठे नुकसान होते. यासाठी शेतक-यांना शाश्वत सिंचन दिले. जलयुक्तशिवारमधून सिंचनाचे पाणी दिले. शेततळे, विहिरी दिल्या. निळवंडे धरणाच्या कालव्यासाठी पैसा दिला आहे. या कामांसाठी मंत्री विखे यांनी पाठपुरावा केला. कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सोडविला. परंतु काहींनी शेतक-यांची दिशाभूल केली. राखीव पाण्यातून कोपरगावला पाणी दिले. शेतक-याच्या कोट्यातील पाणी दिले नाही. यासाठी आमदार कोल्हे यांनी मोठा पाठपुरावा केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेस आघाडीच्या गेल्या १५ वर्षातील आणि भाजपच्या पाच वर्षाच्या काळातील कामांचा आलेख मांडला. यावेळी त्यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली.  आमदार स्नेहलता कोल्हे यावेळी म्हणाल्या, मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील ५० लाख शेतकºयांना कर्जमाफी दिली. यात कोपरगाव तालुक्यातील शेतकºयांना ३४ कोटींची कर्जमाफी मिळाली. धरणांमधील शेतीच्या पाण्याचे नियोजन केले. निळवंडे धरणातील बंद पाईपलाईनव्दारे पाणी योजनेस मंजुरी दिली. हा ऐतिहासिक आहे. यातून कोपरगाव शहराचा पिण्याच्या पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे. याशिवाय बसस्थानक, नगरपालिका, पंचायत समिती, पोलीस वसाहत, वाचनालय इमारतीसाठी निधी दिला. मतदारसंघातील प्रलंबित पाणी योजनांसाठी २६ कोटींचा निधी दिला. पुणतांब्याचा अनेक वर्षापासूनचा प्रलंबित पाणी प्रश्न मार्गी लावला. त्यासाठी १६ कोेटींचा निधी दिला. वारी पाणी योजनेला १७ कोटींचा निधी दिला. गेल्या पाच वर्षात भाजप सरकारने मुख्यमंत्र्यांनी अनेक सामाजिक प्रश्न मार्गी लावल्याचेही त्यांनी सांगितले. कोणी कितीही अमिषे दाखविली तरी त्यास मतदारांनी बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019