शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

मागील वर्षीच्या तुलनेत धरणसाठे निम्म्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 18:55 IST

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कमी पाऊस झाल्याने धरणसाठे निम्म्यावर आले आहेत. भंडारदरा, मुळा, निळवंडे ही मोठी धरणे १५ आॅगस्टच्या आसपास भरण्याच्या उंबरठ्यावर असतात.

अहमदनगर : मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कमी पाऊस झाल्याने धरणसाठे निम्म्यावर आले आहेत. भंडारदरा, मुळा, निळवंडे ही मोठी धरणे १५ आॅगस्टच्या आसपास भरण्याच्या उंबरठ्यावर असतात, मात्रसध्या या धरणांत ४० टक्केही पाणीसाठा नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह सर्वच स्थिती चिंताजनक बनली आहे.मागील वर्षी जुलैअखेर सरासरी ४३ टक्के पाऊस झाला होता. यातही पाणलोटात चांगला पाऊस असल्याने भंडारदरा, मुळा, निळवंडे या धरणांत झपाट्याने पाण्याची आवक झाली. मागील वर्षी २५ जुलैला भंडारदऱ्यात ८४ टक्के पाणीसाठा होता. यंदा तो केवळ ४५ टक्के आहे. तसेच मुळा धरणात मागील वर्षी ५६ टक्के व निळवंडेत ६५ टक्के असलेला साठा यंदा अनुक्रमे ३२ व २० टक्क््यांवर खाली घसरला आहे.भंडारदरा धरण दरवर्षी १५ आॅगस्टपर्यंत भरते. मागील वर्षीही ते भरले होते. परंतु यंदा मात्र ते १५ आॅगस्टपर्यंत भरेल अशी स्थिती नाही. अकोले तालुक्यात पुढील २० दिवस सलग पाऊस झाला तर धरण भरण्याच्या आशा आहेत. अन्यथा १५ आॅगस्टची ही परंपरा मोडण्याची शक्यता आहे. मुळा धरणात मागील वर्षी १५ आॅगस्टपर्यंत मुबलक पाणीसाठा झाला होता. मात्र उर्वरित जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्याने भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. धरणांतील पाण्यानेच संपूर्ण जिल्ह्याची तहान भागवली.अजूनही मागील वर्षीच्या पाण्यावरच सातशेहून अधिक टँकर जिल्ह्यात सुरू आहेत.मात्र यंदा धरणांच्या पाणलोटक्षेत्रातही समाधानकारक पाऊस नाही. सध्या तो सुरू असला तरी त्याला अपेक्षित वेग नाही. त्यामुळे पाण्याची आवक मंद गतीने होत आहे. पावसाळ्याचे दोन महिने संपत आले तरी धरणसाठे निम्म्यापेक्षा खाली असल्याने चिंतेचे ढग पसरले आहेत.दुसरीकडे जिल्ह्यात सुमारे २ लाख हेक्टर (५० टक्के) खरीप पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत. मागील आठवड्यात दोन दिवस झालेल्या पावसाने या पिकांना सध्या तरी संजीवनी मिळाली आहे. परंतु जमिनीतील पाणीपातळी वाढेल असा सलग पाऊस अद्याप झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्येही अस्वस्थता आहे.मागील वर्षी २५ जुलैपर्यंत सरासरी २१३ मिमी (४३ टक्के) पाऊस झाला होता. यंदाही तो ४३ टक्के आहे. मात्र पाणलोटात कमी आहे. यंदा श्रीरामपूर, नेवासा, राहाता, शेवगाव, पाथर्डी, कर्जत, जामखेड या सहा तालुक्यांत ३० टक्क्यापेक्षा कमी पाऊस आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी