शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवसाचे दिग्दर्शक झालात तर...; अक्षय कुमारच्या प्रश्नावर CM फडणवीसांचं दमदार उत्तर, टाळ्यांचा कडकडाट
2
जशास तसे उत्तर! जरांगेंचा एल्गार, १९९४ च्या ओबीसी आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणार
3
योगी बुलडोजर चालवत आहेत तर...? बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकील राकेश किशोर यांचा CJI बीआर गवईंना थेट सवाल
4
कर्ज फेडण्यासाठी अदानी घेणार २,२०० कोटींचं लोन; जगातील ४ मोठ्या बँका करणार मदत, शेअर्समध्ये तेजी
5
मोठी चूक! 'डेलॉइट' कंपनीला AI मुळे कोट्यवधींचा फटका; चुकीच्या रिपोर्टसाठी ऑस्ट्रेलियन सरकारला परत करावे लागणार पैसे
6
बिहारमध्ये भाजपाच्या अडचणी वाढणार, चिराग पासवान-प्रशांत किशोर यांना टाळी देण्याच्या तयारीत?
7
"मला निवडणूक लढवण्याची इच्छा"; मैथिली ठाकूरने सांगितली दोन मतदारसंघांची नावे
8
जखमींना हॉस्पिटलला पोहचवा, २५ हजार ते १ लाख मिळवा; योगी सरकारनं आणली जबरदस्त योजना
9
VIRAL : तो नवरा आहे गं, महिषासुर नाही... करवा चौथची पूजा करण्यासाठी महिलेनं काय केलं, Video बघाच!
10
"आम्हाला दोघांनाही एकमेकांशी लग्न करायचं नव्हतं...", रेणुका शहाणेंचा मोठा खुलासा, म्हणाल्या...
11
'या' एका निर्णयाने फिरलं वातावरण! ग्राहक जोडणीत BSNL ने Airtel ला टाकले मागे; जिओची काय स्थिती?
12
Cough Syrup : "पप्पा, घरी जाऊया...", कफ सिरपमुळे मुलीने गमावला जीव; १६ डायलिसिस, २२ दिवस मृत्यूशी झुंज
13
कतरिना कैफचं झालं बेबी शॉवर, 'या' फोटोमुळे मिळाली हिंट; ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
14
धक्कादायक! विरारमध्ये दोन विद्यार्थ्यांची १२ व्या मजल्यावरून उडी; दोघांचाही मृत्यू
15
“गेम करण्याएवढी ताकद नाही, आम्ही भांडी घासायला बसलोय का”; ओबीसी नेत्यांचे जरांगेंना उत्तर
16
Australia Squad Against India : टीम इंडियाच्या २ कॅप्टनसमोर ऑस्ट्रेलियाकडून मार्श दाखवणार ताकद
17
म्हणे, कसलाही पश्चात्ताप नाही... दैवी शक्तीनं सांगितलं!; सरन्यायाधीश हल्ला प्रकरणात 'त्या' वकिलाचं विधान
18
VIDEO: रस्त्याखाली काम, रस्त्यावर 'जॅम'! मेट्रो सुरू झाली, पण कार अजूनही ट्रॅफिकमध्येच; वरळी नाक्याजवळची कोंडी कधी फुटणार?
19
Video - राईड संपल्यानंतर 'ती' रॅपिडोवाल्याशी भिडली, पैसे मागताच डोळ्यात फेकली मिरची फूड
20
१५ राण्या, ३० मुलं अन् १०० नोकरांसह दुबईला पोहोचला 'या' देशाचा राजा; शेख पाहत राहिले...

मागील वर्षीच्या तुलनेत धरणसाठे निम्म्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 18:55 IST

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कमी पाऊस झाल्याने धरणसाठे निम्म्यावर आले आहेत. भंडारदरा, मुळा, निळवंडे ही मोठी धरणे १५ आॅगस्टच्या आसपास भरण्याच्या उंबरठ्यावर असतात.

अहमदनगर : मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कमी पाऊस झाल्याने धरणसाठे निम्म्यावर आले आहेत. भंडारदरा, मुळा, निळवंडे ही मोठी धरणे १५ आॅगस्टच्या आसपास भरण्याच्या उंबरठ्यावर असतात, मात्रसध्या या धरणांत ४० टक्केही पाणीसाठा नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह सर्वच स्थिती चिंताजनक बनली आहे.मागील वर्षी जुलैअखेर सरासरी ४३ टक्के पाऊस झाला होता. यातही पाणलोटात चांगला पाऊस असल्याने भंडारदरा, मुळा, निळवंडे या धरणांत झपाट्याने पाण्याची आवक झाली. मागील वर्षी २५ जुलैला भंडारदऱ्यात ८४ टक्के पाणीसाठा होता. यंदा तो केवळ ४५ टक्के आहे. तसेच मुळा धरणात मागील वर्षी ५६ टक्के व निळवंडेत ६५ टक्के असलेला साठा यंदा अनुक्रमे ३२ व २० टक्क््यांवर खाली घसरला आहे.भंडारदरा धरण दरवर्षी १५ आॅगस्टपर्यंत भरते. मागील वर्षीही ते भरले होते. परंतु यंदा मात्र ते १५ आॅगस्टपर्यंत भरेल अशी स्थिती नाही. अकोले तालुक्यात पुढील २० दिवस सलग पाऊस झाला तर धरण भरण्याच्या आशा आहेत. अन्यथा १५ आॅगस्टची ही परंपरा मोडण्याची शक्यता आहे. मुळा धरणात मागील वर्षी १५ आॅगस्टपर्यंत मुबलक पाणीसाठा झाला होता. मात्र उर्वरित जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्याने भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. धरणांतील पाण्यानेच संपूर्ण जिल्ह्याची तहान भागवली.अजूनही मागील वर्षीच्या पाण्यावरच सातशेहून अधिक टँकर जिल्ह्यात सुरू आहेत.मात्र यंदा धरणांच्या पाणलोटक्षेत्रातही समाधानकारक पाऊस नाही. सध्या तो सुरू असला तरी त्याला अपेक्षित वेग नाही. त्यामुळे पाण्याची आवक मंद गतीने होत आहे. पावसाळ्याचे दोन महिने संपत आले तरी धरणसाठे निम्म्यापेक्षा खाली असल्याने चिंतेचे ढग पसरले आहेत.दुसरीकडे जिल्ह्यात सुमारे २ लाख हेक्टर (५० टक्के) खरीप पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत. मागील आठवड्यात दोन दिवस झालेल्या पावसाने या पिकांना सध्या तरी संजीवनी मिळाली आहे. परंतु जमिनीतील पाणीपातळी वाढेल असा सलग पाऊस अद्याप झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्येही अस्वस्थता आहे.मागील वर्षी २५ जुलैपर्यंत सरासरी २१३ मिमी (४३ टक्के) पाऊस झाला होता. यंदाही तो ४३ टक्के आहे. मात्र पाणलोटात कमी आहे. यंदा श्रीरामपूर, नेवासा, राहाता, शेवगाव, पाथर्डी, कर्जत, जामखेड या सहा तालुक्यांत ३० टक्क्यापेक्षा कमी पाऊस आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी