शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
2
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
3
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
6
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
7
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
8
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
9
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
10
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
11
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
12
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
13
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
14
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
15
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
16
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
17
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
18
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
19
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
20
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?

कोरोनाबाधितांची दैनंदिन संख्या निम्म्यावर घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:33 IST

अहमदनगर : जिल्ह्यात दैनंदिन रुग्णसंख्या आतापर्यंत चार हजारांच्या वर जात होती. मात्र, प्रथमच ही संख्या निम्म्यापर्यंत कमी झाली आहे. ...

अहमदनगर : जिल्ह्यात दैनंदिन रुग्णसंख्या आतापर्यंत चार हजारांच्या वर जात होती. मात्र, प्रथमच ही संख्या निम्म्यापर्यंत कमी झाली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसह नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. सोमवारी २१२३ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याहून जास्त म्हणजे ३३८८ रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत.

जिल्ह्याच्या रुग्णसंख्येत सोमवारी २ हजार १२३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २२ हजार ३९० इतकी झाली आहे. सोमवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ८४०, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ८७५ आणि अँटिजन चाचणीत ४०८ रुग्ण बाधित आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर शहर ४४, अकोले २६२, जामखेड ७, कर्जत ८५, नगर ग्रामीण ६०, नेवासा २०, पारनेर ५९, पाथर्डी ६९, राहता २, राहुरी ३, संगमनेर ५०, शेवगाव १०६, श्रीगोंदा ४, श्रीरामपूर ४६, कँटोन्मेंट बोर्ड १८, मिलिटरी हॉस्पिटल १ आणि इतर जिल्हा ४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर शहर ३५२, अकोले ४, जामखेड ६, कर्जत १३, कोपरगाव १३, नगर ग्रामीण १३२, नेवासा २१, पारनेर २३, पाथर्डी १०, राहाता ११०, राहुरी २४, संगमनेर २९, शेवगाव १९, श्रीगोंदा २२, श्रीरामपूर ६०, कँटोन्मेंट बोर्ड १५ आणि इतर जिल्हा १९ आणि इतर राज्य ३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटिजन चाचणीत आज ४०८ जण बाधित आढळून आले. नगर शहर ३०, अकोले १, जामखेड २, कर्जत ३, कोपरगाव ६६, नगर ग्रामीण ५, नेवासा ३४, पारनेर ५२, पाथर्डी १७, राहाता ९, राहुरी ८६, संगमनेर २५, शेवगाव २, श्रीगोंदा ५८, श्रीरामपूर १० आणि इतर जिल्हा ८ अशा रुग्णांचा समावेश आहे.

------------

कोरोना स्थिती

बरे झालेली रुग्णसंख्या : १,६०,६८६

उपचार सुरू असलेले रुग्ण : २२३९०

मृत्यू :२१२८

एकूण रुग्णसंख्या :१,८५,२०४

-------------

पोर्टलवर ५७ मृत्यूची नोंद

जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या पोर्टलवर सोमवारी ५७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. रविवारच्या अहवालात एकूण मृत्यूची संख्या २०७१ इतकी नमूद करण्यात आली होती. सोमवारी त्यात वाढ होऊन एकूण मृत्यूची संख्या २१२८ इतकी दाखविण्यात आल्याने ५७ जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट होते. मात्र, ५७ मृत्यू हे दोन-तीन दिवसांमधील एकूण मृत्यू असल्याचे आरोग्य यंत्रणेच्या सूत्रांनी सांगितले.