शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

कोरोनाबाधितांची दैनंदिन संख्या निम्म्यावर घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:33 IST

अहमदनगर : जिल्ह्यात दैनंदिन रुग्णसंख्या आतापर्यंत चार हजारांच्या वर जात होती. मात्र, प्रथमच ही संख्या निम्म्यापर्यंत कमी झाली आहे. ...

अहमदनगर : जिल्ह्यात दैनंदिन रुग्णसंख्या आतापर्यंत चार हजारांच्या वर जात होती. मात्र, प्रथमच ही संख्या निम्म्यापर्यंत कमी झाली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसह नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. सोमवारी २१२३ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याहून जास्त म्हणजे ३३८८ रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत.

जिल्ह्याच्या रुग्णसंख्येत सोमवारी २ हजार १२३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २२ हजार ३९० इतकी झाली आहे. सोमवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ८४०, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ८७५ आणि अँटिजन चाचणीत ४०८ रुग्ण बाधित आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर शहर ४४, अकोले २६२, जामखेड ७, कर्जत ८५, नगर ग्रामीण ६०, नेवासा २०, पारनेर ५९, पाथर्डी ६९, राहता २, राहुरी ३, संगमनेर ५०, शेवगाव १०६, श्रीगोंदा ४, श्रीरामपूर ४६, कँटोन्मेंट बोर्ड १८, मिलिटरी हॉस्पिटल १ आणि इतर जिल्हा ४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर शहर ३५२, अकोले ४, जामखेड ६, कर्जत १३, कोपरगाव १३, नगर ग्रामीण १३२, नेवासा २१, पारनेर २३, पाथर्डी १०, राहाता ११०, राहुरी २४, संगमनेर २९, शेवगाव १९, श्रीगोंदा २२, श्रीरामपूर ६०, कँटोन्मेंट बोर्ड १५ आणि इतर जिल्हा १९ आणि इतर राज्य ३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटिजन चाचणीत आज ४०८ जण बाधित आढळून आले. नगर शहर ३०, अकोले १, जामखेड २, कर्जत ३, कोपरगाव ६६, नगर ग्रामीण ५, नेवासा ३४, पारनेर ५२, पाथर्डी १७, राहाता ९, राहुरी ८६, संगमनेर २५, शेवगाव २, श्रीगोंदा ५८, श्रीरामपूर १० आणि इतर जिल्हा ८ अशा रुग्णांचा समावेश आहे.

------------

कोरोना स्थिती

बरे झालेली रुग्णसंख्या : १,६०,६८६

उपचार सुरू असलेले रुग्ण : २२३९०

मृत्यू :२१२८

एकूण रुग्णसंख्या :१,८५,२०४

-------------

पोर्टलवर ५७ मृत्यूची नोंद

जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या पोर्टलवर सोमवारी ५७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. रविवारच्या अहवालात एकूण मृत्यूची संख्या २०७१ इतकी नमूद करण्यात आली होती. सोमवारी त्यात वाढ होऊन एकूण मृत्यूची संख्या २१२८ इतकी दाखविण्यात आल्याने ५७ जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट होते. मात्र, ५७ मृत्यू हे दोन-तीन दिवसांमधील एकूण मृत्यू असल्याचे आरोग्य यंत्रणेच्या सूत्रांनी सांगितले.