शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

दहिगावने ते शेवगाव बससेवा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:22 IST

दहिगावने : लॉकडाऊनचे नियम शिथिल झाले. कोरोनाचा प्रादुर्भावही कमी झाला. त्यामुळे जनजीवन सुरळीत होत आहे. लग्नसोहळ्यासह इतर कार्यक्रमांची रेलचेल ...

दहिगावने : लॉकडाऊनचे नियम शिथिल झाले. कोरोनाचा प्रादुर्भावही कमी झाला. त्यामुळे जनजीवन सुरळीत होत आहे. लग्नसोहळ्यासह इतर कार्यक्रमांची रेलचेल वाढली. आता शाळा सुरू झाल्याने विद्यार्थी पासेसची संख्याही वाढली. त्यामुळे दहिगावने ते शेवगाव या भागात बसेसच्या दिवसाला दोन फेऱ्या सुरू केल्या असल्याची माहिती शेवगावचे आगारप्रमुख वासुदेव देवराज यांनी दिली.

ही बससेवा सुरू व्हावी, याबाबत ‘लोकमत’नेही वेळोवेळी वृत्त प्रकाशित केले होते.

संचारबंदीचे नियम शिथिल होऊन गावागावांत भरणारे आठवडे बाजार गर्दीने फुलले आहेत. छोटे-मोठे व्यापारी व जनतेची उलाढाल वाढल्याने दळणवळणात वाढ झाली आहे. मात्र, मागील दहा महिन्यांपासून ग्रामीण भागात बससेवा बंद होती. याचा दळणवळणाची सुविधा नसलेल्या नागरिकांना चांगलाच फटका बसला. त्यामुळे दहिगावने ते शेवगाव बससेवा सुरू करावी, अशी मागणी जनतेकडून वारंवार होत होती. मात्र, आर्थिक गणित जुळत नसल्याने बसच्या फेऱ्या सुरू करणे शक्य होत नव्हते. आता शाळा सुरू होऊन विद्यार्थी पासेसची संख्या वाढल्याने ग्रामीण भागातील फेऱ्या सुरू केल्या आहेत. या निर्णयामुळे शालेय विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.

----

ग्रामीण भागात बसेसच्या फेऱ्या सुरू करण्यासाठी कर्मचारी संख्या व आर्थिक गणित जुळणे गरजेचे होते. त्यात शाळा सुरू झाल्याने तालुक्यातील १ हजार ५२६ विद्यार्थ्यांना आजपर्यंत पासेस दिले आहेत. त्यामुळे राणेगाव, कांबी, दहिगावने, धनगरवाडी, नागलवाडी, वाघोली आदी भागांतील बसेसच्या काही फेऱ्या सुरू केल्या आहेत. गरजेनुसार यात वाढ केली जाईल.

- वासुदेव देवराज,

आगार व्यवस्थापक, शेवगाव