शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

चार वर्षांत आठपटींनी वाढले सायबर क्राइम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : खून, दरोडा, मारहाण, जबरी चोरी, अत्याचार आदी गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांचा हातखंडा आहे. मात्र, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : खून, दरोडा, मारहाण, जबरी चोरी, अत्याचार आदी गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांचा हातखंडा आहे. मात्र, डिजिटल युगात हायटेक पद्धतीने घडणारे सायबर क्राइम पोलिसांसाठी आव्हान ठरत आहेत. जिल्ह्यात गेल्या वर्षभरात सायबर क्राइमसंदर्भात तब्बल १,९२८ तक्रारी व २३ गुन्हे दाखल झाले आहेत. गेल्या चार वर्षांत हे प्रमाण तब्बल आठ पटींनी वाढल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे.

अनोळखी व्यक्तीला ओटीपी क्रमांक सांगणे, तक्रारीसाठी कस्टमर केअरला फोन करणे, इंटरनेटवरील साइटवर जॉब सर्च करणे, ऑनलाइन वाहन खरेदी या माध्यमांतून ग्राहकांची सर्वाधिक आर्थिक फसवणूक झाली आहे. ई-मेल, व्हाॅटस्ॲप, इंस्टाग्राम, फेसबुक, ऑनलाइन बँकिंग आणि इतर व्यवहारांसाठी इंटरनेटचा वापर करणाऱ्या उपभोक्त्यांना सायबर गुन्हेगार लक्ष्य करीत आहेत. स्वस्तात वाहन गिफ्ट, तात्काळ कर्ज, लॉटरी, पैशांच्या बक्षिसाचे आमिष दाखवून, तर कधी प्रेमाच्या मोहात पाडून सायबर गुन्हेगारांनी गेल्या चार वर्षांत जिल्ह्यातील हजारो नागरिकांचे ऑनलाइन पद्धतीने करोडे रुपये लुटले आहेत. सायबर गुन्हेगार देशात कुठेतरी बसून अशा स्वरूपाचे गुन्हे करतात. त्यामुळे भौगोलिक मर्यादा आणि तांत्रिक अडचणींमुळे तपासाला मर्यादा पडतात. त्यामुळे इतर गुन्ह्यांच्या तुलनेत सायबर गुन्ह्यांची उकल होण्याचे प्रमाण खूपच कमी आहे.

चार वर्षांत दाखल तक्रारी

२०१७- २५०

२०१८- ५५३

२०१९- ८८५

२०२०- १,९२८

.......................

१,३०० तक्रारींचा तपास पूर्ण

१२ डिसेंबर २०२० अखेरपर्यंत येथील सायबर पोलीस ठाण्यात १,९२८ तक्रारी दाखल झाल्या. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलीस उपनिरीक्षक प्रतीक कोळी यांच्यासह हेड कॉन्स्टेबल योगेश गोसावी, पोलीस नाईक उमेश खेडकर, दिगंबर कारखेले, मल्लिकार्जुन बनकर, राहुल गुंडू, अभिजित अरकल यांच्यासह सर्व टीमने १,३०० तक्रारींचा तपास पूर्ण केला, तर सध्या ६२८ तक्रारी प्रलंबित आहेत.

....................

केवळ ११ गुन्ह्यांची उकल

येथील सायबर पोलीस ठाण्यात २०१७ ते २०२० या कालावधित एकूण २४ गुन्हे दाखल झाले. यातील ११ गुन्ह्यांची उकल करीत पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे, तर १५ गुन्हे प्रलंबित आहेत.

...............

परप्रांतीय टोळ्यांचे कृत्य

ऑनलाइनच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक करणारे गुन्हेगार हे परप्रांतीय आहेत. दिल्ली, नोएडा, झारखंड, मध्यप्रदेश आदी ठिकाणी या सायबर टोळ्या कार्यरत असल्याचे सायबर पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. या टोळीतील सदस्य हे उच्चशिक्षित आणि आधुनिकत तंत्रज्ञानाची माहिती असणारे आहेत.

................

...अशी घ्यावी काळजी

ऑनलाइन व्यवहार करताना आणि डिजिटल तंत्रज्ञान वापरताना नागरिकांनी दक्षता घेतली, तर या गुन्ह्यांचे प्रमाण कमी होईल. नागरिकांनी ऑनलाइनवर येणाऱ्या कुठल्याही आमिषाला बळी पडू नये, आपली वैयक्तिक अथवा बँक खात्याशी संबंधित माहिती अनोळखी व्यक्तीला देऊ नये, असे आवाहन सायबर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक प्रतीक कोळी यांनी केले आहे.