शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

निकष बाजूला ठेवून पूरग्रस्तांना मदत करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:24 IST

तिसगाव : ऑगस्ट अखेरीस अतिवृष्टी झाली. नद्या-नाल्यांच्या पुरामुळे अनेक गावे वाड्यावस्त्या पाण्याखाली गेल्या. घरांची पडझड झाली. जनावरे वाहून गेली. ...

तिसगाव : ऑगस्ट अखेरीस अतिवृष्टी झाली. नद्या-नाल्यांच्या पुरामुळे अनेक गावे वाड्यावस्त्या पाण्याखाली गेल्या. घरांची पडझड झाली. जनावरे वाहून गेली. घरात पाणी शिरल्याने हजारो कुटुंबांचे संसार उपयोगी साहित्य निकामी झाले. अतिवृष्टी पूरग्रस्तांना आता निकष बाजूला ठेवून सरकारने मदत करावी, अशी अपेक्षा आमदार मोनिका राजळे यांनी केली आहे.

श्रीक्षेत्र मढी (ता. पाथर्डी) येथे पूरग्रस्तांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री हसन मुश्रीफ, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आदींना निवेदन दिले आहे, असेही त्यांनी सांगितले.

राजळे म्हणाल्या, वडुले येथील मुरलीधर सागडे यांचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला. मृतांच्या कुटुंबीयांना किमान २५ लाख रुपये मदत मिळावी. त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय सेवेत सामावून घ्यावे. खरिपातील पिके मातीसह वाहून गेलीत. शेतकऱ्यांनाही हेक्टरी किमान २५ हजार रुपयांचे आर्थिक साहाय्य मिळावे. घरांची पडझड झाली. पत्र्याचे गोठे उडाले. पशुधन वाहून मृत्युमुखी पडले. पंचनामे करताना आजचे किमान बाजारमूल्य गृहीत धरले जावे, अशी अपेक्षाही राजळे यांनी व्यक्त केली.

सरपंच तथा कानिफनाथ देवस्थानचे अध्यक्ष संजय मरकड, कोषाध्यक्ष राधाकिसन मरकड, विश्वस्त डॉ. विलास मढीकर, अशोक महाराज मरकड, माजी सरपंच देविदास मरकड, विस्तार अधिकारी प्रशांत तोरवणे, उपसरपंच रवींद्र आरोळे, वन कर्मचारी विष्णू मरकड आदींसह ग्रामस्थ हजर होते.