शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
2
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
3
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
4
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
5
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
6
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
7
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
8
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
9
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
10
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
11
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
12
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
13
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
14
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
15
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
16
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
17
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
18
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
19
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
20
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?

आदिवासींच्या सातबारावरील सरकारी शिक्क्याचे संकट टळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:25 IST

कोतूळ : अकोले तालुक्यातील आदिवासी क्षेत्रातील अभयारण्य परिक्षेत्रात खासगी मालकीच्या जमीन सात-बारावर शासनाचे नाव लावण्याचा आदेश दिल्याने मोठी खळबळ ...

कोतूळ : अकोले तालुक्यातील आदिवासी क्षेत्रातील अभयारण्य परिक्षेत्रात खासगी मालकीच्या जमीन सात-बारावर शासनाचे नाव लावण्याचा आदेश दिल्याने मोठी खळबळ उडाली होती. मात्र, माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी वन्य जीव विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन आदिवासींच्या जमिनीवर शासनाचे नाव लावण्याविरोधात भूमिका घेतली. त्यामुळे तूर्तास तरी हे संकट टळले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अकोले तहसीलदारांनी १० जून रोजी नोटिफिकेशन काढून सुमारे दोन हजार एकर जमिनीवर शासनाचे नाव लावण्याबाबत तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना निर्देशित केले होते. अभयारण्य क्षेत्रातील आदिवासी बांधवांनी याबाबत माजी मंत्री मधुकर पिचड व वैभव पिचड यांना अवगत केले. अनेक संघटना आक्रमक झाल्या. वैभव पिचड यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रही दिले दिले. तर माजी मंत्री मधुकर पिचड यांनी वन्यजीव विभागाचे सहाय्यक वनरक्षक (कळसुबाई, हरिश्चंद्र गड) अरुण रणदिवे यांच्यासह तहसीलदार, जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवून आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर वन्यजीवचे रणदिवे, डी. डी. पडवळे यांनी कोणत्याही गावात खासगी सात-बारावर शासनाची व वन्यजीव विभागाची नोंद होणार नसल्याचे महसूल व वन्यजीवच्या संयुक्त बैठकीत स्पष्ट केले.

.........

हा आदेश जून महिन्यात निघालाय. मग चार महिने आदिवासी नेतृत्वाचा बनाव करणारे झोपले होते का? १९८५ ला हा कायदा बंद करण्यासाठी लढाई केली. १९९५ ला तालुक्यातील आदिवासींचे जीप भरून उतारे विधानसभेत नेले. सरकारचा आदेश थांबवला. जर आदिवासींच्या खणालाही हात लावला तर सरकारला हे महागात पडेल. सध्या हे संकट टळले असले तरी यावर लेखी आदेशाची वाट पहावी लागेल.

-मधुकर पिचड, माजी मंत्री, भाजप नेते

130921\img-20210911-wa0171__01.jpg

पिचड फोटो