शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

परतीच्या पावसाने कपाशी, तूर पाण्यात; बाजरीचे झाले भुसकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 12:31 IST

यंदा शेतक-यांनी दुष्काळावर मात करीत खरिपाची पिके घेतली. मात्र गेल्या दहा-पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतातील पिके बरबाद झाली.

लोकमत बांधावर/ संजय सुपेकर । बोधेगाव : यंदा शेतक-यांनी दुष्काळावर मात करीत खरिपाची पिके घेतली. मात्र गेल्या दहा-पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतातील पिके बरबाद झाली. शेतात उसनवारी करून केलेला खर्च वाया गेल्याने शेतकरी पूर्णपणे खचला आहे. अशा अस्मानी संकटामुळे यंदा शेतक-यांची अवस्था ‘घर जाळून कोळशाचे धंदे’ अशी झाल्याचे विदारक चित्र आहे. बोधेगावसह (ता.शेवगाव) परिसरातील बालमटाकळी, लाडजळगाव, चापडगाव, चेडेचांदगाव, सोनविहीर, हातगाव, मुंगी, गदेवाडी, ठाकुर पिंपळगाव आदींसह तालुक्यातील बहुतांशी गावात अतिवृष्टीमुळे पिके मातीमोल झाली आहेत. बोधेगाव येथील ‘लोकमत’ प्रतिनिधीने  बोधेगाव, चेडे चांदगाव तसेच लाडजळगाव याठिकाणी भेट देऊन पिकांची पाहणी केली. त्यावेळी पिकांची अतिशय विदारक अवस्था झालेली दिसून आली. बोधेगाव येथील बंकट कणसे, इसाक शेख यांच्या शेतातील कपाशी आजही गुडघाभर पाण्यात तरंगत आहे. तर नामदेव गर्जे यांची चाळीस ते पन्नास हजार रुपये खर्चून हातातोंडाशी आलेली एकरभर मका जास्त पावसामुळे पूर्णपणे जळून गेली आहे. अभय चव्हाण यांच्या सोंगणी केलेल्या बाजरीचे भिजल्याने कुजून भुसकट झाले आहे. लाडजळगाव येथील महादेव पाटील या वयस्कर शेतक-याचे दीड हेक्टर कपाशी पीक पाण्यात गेले आहे. तर बाजरीला क-हे फुटले आहेत. चेडेचांदगाव येथील संदीप चेडे यांच्या शेतातील वेचणीला आलेल्या कापसाला कोंब फुटले असल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अशीच परिस्थिती परिसरातील अनेकांच्या शेतात झाली असल्याचे गोवर्धन ढेसले, मयूर हुंडेकरी, ज्ञानदेव घोरतळे, सुनील गर्जे, राजेंद्र घोरतळे, बाबासाहेब तांबे यांनी सांगितले. गावपातळीवर तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांच्या माध्यमातून थेट बांधावर जाऊन नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. आजपर्यंत तालुक्यातील एकूण ५० हजार ४०४ हेक्टरपैकी ६ हजार २०० हेक्टरचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. उर्वरित पंचनामे आठ दिवसात पूर्ण होतील. तालुक्यात सर्वाधिक बाजरी व त्या खालोखाल कपाशी पिकांचे अतोनात नुकसान झालेले आढळून येत आहे, असे शेवगाव तालुका कृषी अधिकारी किरण मोरे यांनी सांगितले.   

टॅग्स :ShevgaonशेवगावCrop Insuranceपीक विमा