शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

महापालिकेत भ्रष्टाचारमुक्त अभियान : अनिल राठोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 18:24 IST

भाजपची सत्ता असलेल्या अहमदनगर महापालिकेत आता शिवसेनाच भ्रष्टाचारमुक्त अभियान राबविणार आहे.

अहमदनगर : भाजपची सत्ता असलेल्या अहमदनगर महापालिकेत आता शिवसेनाच भ्रष्टाचारमुक्त अभियान राबविणार आहे. महापालिकेत सध्या सुरू असलेल्या भ्रष्टाचाराला आणि भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांनाही महापौरांचा पाठिंबा असल्याचा आरोप शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी केला आहे.शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त उपनेते राठोड यांनी बुधवारी पत्रकारांना पक्षकार्याची माहिती दिली. यावेळी त्यांनी महापालिकेतील भ्रष्टाचारावर हल्लाबोल केला. पदाधिकारी, नगरसेवकांना दर पाच वर्षाला निवडणुकीची परीक्षा द्यावी लागते. मात्र गेल्या ५० वर्षांपासून तेच अधिकारी महापालिकेत काम करीत आहेत. विकास कामांबाबत आंदोलने करणाºया, माहितीच्या अधिकारात माहिती मागविणाºया राजकीय कार्यकर्ते, नगरसेवकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम महापालिकेतील अधिकारी करीत आहेत. त्यांनी केलेला भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणल्यामुळे आणि इतरांच्या दबावाखाली अधिकारी पोलीस ठाण्यात फिर्यादी दाखल करीत आहेत. राजकीय नेत्यांकडून दमदाटी होत असल्याचे महापालिकेचे अधिकारी सांगत आहेत. केवळ शिवसेनेच्या विरोधात तक्रार करण्याचे काम महापालिकेतील अभियंते करीत आहेत. आयुक्तांवर धूर फवारणी करणाऱ्यांवर तसेच इतर पक्षाच्या विरोधात तक्रारी दाखल करण्याचे धाडस अभियंते दाखवित नाहीत. शहरात उच्चशिक्षित अभियंते बेकार आहेत, मात्र महापालिकेत तांत्रिक जागा भरल्या जात नाहीत. काही अभियंते कमरेला बंदूक लावून काम करीत आहेत. त्यामुळे कोणाची दहशत आहे, हे सांगण्याची गरज नाही, असा सवाल राठोड यांच्यासह शहर प्रमुख दिलीप सातपुते, संभाजी कदम, भगवान फुलसौंदर यांनी केला.जे स्वच्छ आणि परदर्शकपणे काम करतात त्यांना भ्रष्टाचाराबद्दल बोलायला भिती वाटत नाही. भ्रष्टाचारमुक्त महापालिका करण्याचे अभियान फक्त शिवसेनाच राबवू शकते. अभियंत्यांच्या संपत्तीची चौकशी झाली पाहिजे, त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे पुरावे हाती आल्यानंतर सविस्तरपणे माध्यमांना सांगितले जाईल, असे राठोड म्हणाले.बल्लाळ पुन्हा नगररचना विभागातमहापौर बाबासाहेब वाकळे हेच सध्या नगररचना विभाग चालवित आहेत. एका राजकीय पक्षाच्या नेत्याच्या सांगण्यानुसार महापौरांनी त्यांच्या आदेशाने बल्लाळ यांनी नगररचना विभागात बदली केली.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAhmednagar Municipal Electionअहमदनगर महानगरपालिका निवडणूक