शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवक कैलास गिरवले यांचे पुण्यात निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 09:27 IST

मनसेचे ज्येष्ठ कार्यकर्ते, महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक कैलास रामभाऊ गिरवले (वय ५५) यांचे पुण्यात उपचारादरम्यान सोमवारी रात्री निधन झाले.

अहमदनगर : मनसेचे ज्येष्ठ कार्यकर्ते, महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक कैलास रामभाऊ गिरवले (वय ५५) यांचे पुण्यात उपचारादरम्यान सोमवारी रात्री निधन झाले.

केडगाव येथील हत्याकांडानंतर राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना अटक झाली होती. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर हल्ला झाला. या गुन्ह्यात गिरवले यांना अटक झाली होती. याप्रकरणी गिरवले न्यायालयीन कोठडीत असताना त्यांना  कोतवाली पोलीस ठाण्यातील दुस-या गुन्ह्यात वर्ग करण्यात आले. या गुन्ह्यात त्यांना रविवारी न्यायालयीन कोठडीची मंजुरी मिळाली होती. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली. गिरवले यांना उपचारासाठी प्रथम जिल्हा रूग्णालय व नंतर पुणे येथील ससूण रूग्णालयात दाखल करण्यात आले.

गिरवले यांना रविवारी दिवसभर कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवण्यात आले होते. मात्र सायंकाळी त्यांची प्रकृती ढासळली आणि अधिकच चिंताजनक बनली. गिरवले यांच्याबाबत रविवारी सायंकाळी सोशल मीडियावर चुकीची अफवा पसरली. याबाबत पोलीस प्रशासनाने काल प्रसिद्धी पत्रक काढून गिरवले यांच्यावर ससूण रूग्णालयात उपचार सुरू असून, ते उपचाराला प्रतिसाद देत आहेत. जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले होते. मात्र रात्री उशीरा त्यांचा मृत्यू झाला.

गिरवले यांचा परिचय

कैलास गिरवले हे सुरवातीला भाजपचे कार्यकर्ते होते. त्यानंतर त्यांनी महापालिकेची अपक्ष निवडणूक लढविली होती. तत्कालीन नगरपालिकेत ते दोनवेळा नगरसेवक झाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचेही त्यांनी शहरात नेतृत्व केले. २००८ आणि २०१३ मध्ये मनसेत असताना त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून महापालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अरुण जगताप आणि संग्राम जगताप यांचे ते कट्टर समर्थक होते. महापालिकेतील घोटाळ््यांचा पर्दाफाश करणारे नगरसेवक म्हणून त्यांची सर्वांनाच भीती होती. परखड, स्पष्ट स्वभावामुळे महापालिकेतील कर्मचाºयांवर गिरवले यांचा नेहमीच वचक असायचा. काँग्रेसचे संदीप कोतकर यांना महापौर करण्यात गिरवले यांचा महत्त्वाचा वाटा होता. शिवसेनेच्या बारा नगरसेवकांना सेनेतून बाहेर काढून महानगर विकास आघाडी स्थापन करण्यात गिरवले यांचा पुढाकार होता. याच आघाडीच्या पाठिंब्यामुळे कोतकर महापौर झाले. माळीवाडा येथील कपिलेश्वर मंडळाचे ते संस्थापक अध्यक्ष होते. गणेशोत्सवामध्ये विविध आकर्षक, धार्मिक देखावे, उपक्रम यामध्ये गिरवले नेहमीच आघाडीवर असायचे. जिल्हा फटाका असोसिएशनचे ते पदाधिकारी होते. फटाका विक्रीचा परवाना घेण्यासाठी तत्कालीन प्रांताधिकारी विकास पानसरे यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. त्याची तक्रार गिरवले यांनी केली होती.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMuncipal Corporationनगर पालिकाKedgoan double murderकेडगाव दुहेरी हत्याकांड