शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

कोरोनामुळे शुभमंगल ‘सावधान’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:30 IST

अहमदनगर : गेल्या तीन-चार महिन्यांपासून सर्वच मंगल कार्यालयांमध्ये विवाह सोहळ्यांना गर्दी होत आहे. किमान एक हजारांच्यावरच गर्दी होत आहे. ...

अहमदनगर : गेल्या तीन-चार महिन्यांपासून सर्वच मंगल कार्यालयांमध्ये विवाह सोहळ्यांना गर्दी होत आहे. किमान एक हजारांच्यावरच गर्दी होत आहे. बहुतांश ठिकाणी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालनही होत नव्हते. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर विवाह सोहळ्यांना होत असलेली गर्दी रविवारी ओसरलेली पहायला मिळाली. अनेकांनी ५० चा नियम असल्याने लग्नाला येऊच नका, असे सोशल मीडियावरून विशेष आवाहन केले आहे.

अनलॉक झाल्यानंतर विवाह सोहळ्यांसाठी फक्त ५० लोकांनाच परवानगी दिलेली होती. तोच नियम अद्यापही कायमच आहे. मात्र गेल्या तीन ते चार महिन्यांपासून वऱ्हाडी मंडळी, मंगल कार्यालयांचे मालक कोणीही नियमांचे पालन करीत नव्हते. त्यामुळे मोठ्या मंगल कार्यालयात एक हजारांपेक्षा जास्त लोक एकत्र आल्याचे पहायला मिळाले. जेवणावळीसाठीही मोठी गर्दी होती. यामध्ये बहुतांश लोक मास्कही वापरत नसल्याचे आढळून आले होते. दुसरीकडे प्रशासनानेही याकडे दुर्लक्ष केल्याने ही गर्दी वाढत होती. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी गुरुवारी (दि. १८) तातडीने सर्व मंगल कार्यालयांची बैठक घेऊन सूचना केल्या. त्यामध्ये मंगल कार्यालयात एकाच वेळी ५० लोकांना मंगल कार्यालयात थांबता येईल, असा नियम अनिवार्य करण्यात आला. तसेच सामाजिक अंतर, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचेही पालन करण्याची जबाबदारी मंगल कार्यालयांवर टाकण्यात आली. त्यामुळे रविवारी नगर शहर व परिसरात झालेल्या विवाह सोहळ्यांमध्ये गर्दीचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले.

----------

विवाह सोहळ्यातही असा झाला बदल......जेवणाची पंगत लग्नाआधीच सुरू झाली

जेवण झालेले लग्नासाठी थांबले नाहीत

टप्प्याटप्प्याने लोकांची लग्नात उपस्थिती

मंगलाष्टकांची संख्या कमी केल्याने गर्दी ओसरली

नातेवाइकांशिवाय इतरांना घरी जाण्याचे आवाहन

गर्दी टाळण्यासाठी मंगल कार्यालय मालकांचे नियोजन

जेवणानंतर परगावाहून आलेल्यांना लगेच रवाना झाले

----------------

चक्क....लग्नाला न येण्याचे आवाहन

बोल्हेगाव येथील वाकळे आणि नागापूर येथील कातोरे परिवारातील एक विवाह सोहळा नगर-मनमाड रोडवरील एका मंगल कार्यालयात रविवारी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. या लग्नाच्या दोन्ही परिवारांनी मोठ्या प्रमाणावर निमंत्रण पत्रिकांचे वाटप केले होते. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी केवळ लग्न सोहळ्यासाठी केवळ ५० व्यक्तींनाच परवानगी दिल्याने दोन्ही परिवाराने चक्क विवाह सोहळ्यासाठी येऊ नका, अशी पत्रिका छापून सोशल मीडियावर प्रसारित केली. विवाह सोहळा गर्दी न होता केवळ कौटुंबिकस्तरावर होईल, असे दोन्ही परिवाराने जाहीर करून गर्दी टाळली. ही पत्रिका सोशल मीडियावर चांगलीच फिरली.

--

फोटो- २१ कातोरे

-------

लग्नासाठी काय आहे नियम

लग्न समारंभातील गर्दी नियंत्रित करण्यासाठी लग्नसमारंभात एकावेळी ५० पेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. मंगल कार्यालय, लॉन्स, हॉलच्या ठिकाणी मास्कचा वापर न करणाऱ्या व्यक्ती व ५० पेक्षा जास्त व्यक्ती आढळून आल्यास त्याबाबत कारवाई करण्यात यावी, अशा सूचना पोलीस प्रशासन, महापालिका, तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगरपालिका मुख्याध्याकारी यांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

--------