शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

रसवंतीगृह चालकांवर कोरोनामुळे उपासमारीची वेळ : दीड वर्षापासून रोजगार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 16:45 IST

राहुरी ते शनिशिंगणापूर व नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गावर शेकडो रसवंतीगृह गेल्या दीड वर्षापासून बंद पडल्यामुळे शेकडो कुटुंबांवर उपासमारीची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर या व्यावसायिकांचे नुकसान होत आहे.

राहुरी : राहुरी ते शनिशिंगणापूर व नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गावर शेकडो रसवंतीगृह गेल्या दीड वर्षापासून बंद पडल्यामुळे शेकडो कुटुंबांवर उपासमारीची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर या व्यावसायिकांचे नुकसान होत आहे.

राहुरी ते शनिशिंगणापूर या मार्गावर मोठ्या प्रमाणावर रसवंतीगृह आहे. मात्र, कोरोनामुळे रसवंतीगृह बंद करावे लागले आहे. त्यामुळे शेतकरी व युवक यांच्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. या रसवंतीगृहाचे वैशिष्ट्य म्हणजे बैल आणि बैलांच्या चरख्याच्या साह्याने उसाचा रस काढला जातो. पुणे, मुंबई तसेच देशाबाहेरील पर्यटकांना उसाचा रस खूप भावतो. यंत्रापेक्षा लाकडी चरख्याच्या साहाय्याने काढलेला ऊसरस आरोग्यदायी आहे, असे मानले जाते. त्यामुळे लाकडी रसवंतीवर काढलेल्या उसाच्या रसाला ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. कोरोनामुळे वाहतूक बंद आहे. त्यामुळे रसवंतीगृह बंद पडल्यामुळे अनेक शेतकरी व युवक यांचा व्यवसाय रसवंतीगृहांवर अवलंबून होता. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

नगर-मनमाड रोडवरही ठिकठिकाणी रसवंतीगृह सुरू झाले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रसवंतीगृहांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध झाला होता. मात्र, शनिशिंगणापूर व शिर्डी या ठिकाणी भाविक येण्याचे प्रमाण घटल्याने त्याशिवाय लॉकडाऊन असल्याने बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. रोजगाराची साधनेही बुडाली आहे.

लॉकडाऊन नको रे बाबा अशी म्हणण्याची वेळ शेतकरी व व्यापारीवर्गावर आली आहे. पंधरा वर्षांपासून मी रसवंतीचा व्यवसाय करत आहे. कोरोनाचे सावट आल्याने पंधरा वर्षांत पहिल्यांदाच रसवंतीगृह बंद आहे. त्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. काम करण्याची इच्छा असूनदेखील कोरोनासारख्या महामारीमुळे दुसरीकडे कोठेही रोजगार उपलब्ध होत नाही.

- सचिन निक्रड, रसवंतीचालक, राहुरी खुर्द

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी