शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

सहकारमंत्री जिल्हा बँकांच्या भरतीची माहिती घेणार; सहकार आयुक्तालयातच घोटाळ्याचे मूळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 22:12 IST

ऑनलाइन भरतीतही घोटाळा, या कंपनीबाबत खासदार निलेश लंके, माजी आमदार प्राजक्त तनपुरे, टिळक भोस यांनी सरकारकडे तक्रारी केल्या आहेत. मंत्रालयाने सहकार आयुक्तालयाला चौकशी करण्यास सांगितले. :

अहिल्यानगर : अहमदनगर (अहिल्यानगर) जिल्हा सहकारी बँक व एकूणच जिल्हा बँकांच्या भरतीत काय सुरू आहे याची आपणाला माहिती नाही. याबाबत तपशील जाणून घेऊ, अशी प्रतिक्रिया सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

राज्याच्या सहकार आयुक्तालयाने जिल्हा बँंक भरती प्रक्रियेतील घोटाळे थांबविण्यासाठी ही प्रक्रिया ऑफलाइनऐवजी ऑनलाइन करण्याचे धोरण घेत यासाठी सहा कंपन्यांचे पॅनल गठित केले. मात्र, या पॅनलमध्येच घोटाळा असून, अनुभवाची बोगस प्रमाणपत्रे सादर करून वर्क वेल इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी पॅनलमध्ये समाविष्ट झाली असल्याचे पुरावेच ‘लोकमत’ने उजेडात आणले आहेत. विशेष म्हणजे नामांकित कंपन्यांऐवजी हीच कंपनी बँंकांची लाडकी बनली असून, बँका तिलाच काम देत आहेत. नगर जिल्हा बँंकेने आपल्या ७०० पदांच्या भरतीचे काम या कंपनीला दिले आहे. या कंपनीबाबत खासदार नीलेश लंके, माजी आमदार प्राजक्त तनपुरे, टिळक भोस यांनी सरकारकडे तक्रारी केल्या आहेत. मंत्रालयाने सहकार आयुक्तालयाला चौकशी करण्यास सांगितले. मात्र, सहकार आयुक्तालयाने अनुभव प्रमाणपत्रांची खातरजमा न करता गोलमाल उत्तरे देत कंपनीला पाठीशी घातले आहे. या कंपनीचे प्रमुख अमरावतीचे आहेत.

सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्याशी ‘लोकमत’ने याबाबत संपर्क केला असता ते म्हणाले, या प्रकरणाचा तपशील आपणाला माहीत नाही. याबाबत माहिती घेऊ. सहकार आयुक्त दीपक तावरे यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क साधला असता आपण सहकार विभागाच्या राष्ट्रीय परिषदेत असल्याचे त्यांनी सांगितले. नाशिकचे सहनिबंधक संभाजी निकम म्हणाले, कंपनीची निवड आयुक्तालयातून झाली आहे. त्यामुळे यासंदर्भात आपणाकडे काहीही माहिती नाही.

उमेदवार हवालदिल, राजकीय पक्षांचे मौन

अहमदनगर जिल्हा बँंकेच्या नोकर भरतीत हजारो मुलांनी अर्ज केले आहेत. वर्क वेल कंपनीने परीक्षा अहिल्यानगर जिल्ह्याऐवजी पुणे जिल्ह्यात ठेवली आहे. परीक्षा पुणे जिल्ह्यात का?, याबाबत बँंक व कंपनी यापैकी कुणीही स्पष्टीकरण दिलेले नाही. उमेदवारांना परीक्षेसाठी पुण्यात जावे लागणार आहे. राजकीय पक्षांनीही याबाबत मौन बाळगले आहे.

कंपनी बोगस आढळल्यास पैसे पाण्यात जाणार

कंपनीची चुकीच्या पद्धतीने पॅनलवर नियुक्ती झाल्याने याबाबत पेच निर्माण झाला आहे. कंपनीची निवड कोणत्याही टप्प्यावर अडचणीत येऊ शकते. परीक्षा रद्द झाल्यास मुलांचे परीक्षेसाठीचे पैसे, श्रम वाया जाण्याची शक्यता आहे. राज्यभर हा घोळ होण्याची शक्यता आहे.

नियुक्तीसाठी भाव फुटले?

जिल्हा बँकेत भरती होण्यासाठी निवडीचा भाव काय, याची चर्चा सुरू झाली आहे. काही दलाल आमिष दाखवत असल्याचीही चर्चा आहे. भरतीच्या नावाने कुणी पैसे मागत असेल तर उमेदवारांनी काय खबरदारी घ्यावी, भरती पारदर्शक कशी होणार, याबाबत बँकेचे प्रशासन, संचालक, भरती करणारी कंपनी यापैकी कुणीही जनजागरण करताना अथवा पत्रकार परिषद घेताना दिसत नाही.