शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

सहकारमंत्री जिल्हा बँकांच्या भरतीची माहिती घेणार; सहकार आयुक्तालयातच घोटाळ्याचे मूळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 22:12 IST

ऑनलाइन भरतीतही घोटाळा, या कंपनीबाबत खासदार निलेश लंके, माजी आमदार प्राजक्त तनपुरे, टिळक भोस यांनी सरकारकडे तक्रारी केल्या आहेत. मंत्रालयाने सहकार आयुक्तालयाला चौकशी करण्यास सांगितले. :

अहिल्यानगर : अहमदनगर (अहिल्यानगर) जिल्हा सहकारी बँक व एकूणच जिल्हा बँकांच्या भरतीत काय सुरू आहे याची आपणाला माहिती नाही. याबाबत तपशील जाणून घेऊ, अशी प्रतिक्रिया सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

राज्याच्या सहकार आयुक्तालयाने जिल्हा बँंक भरती प्रक्रियेतील घोटाळे थांबविण्यासाठी ही प्रक्रिया ऑफलाइनऐवजी ऑनलाइन करण्याचे धोरण घेत यासाठी सहा कंपन्यांचे पॅनल गठित केले. मात्र, या पॅनलमध्येच घोटाळा असून, अनुभवाची बोगस प्रमाणपत्रे सादर करून वर्क वेल इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी पॅनलमध्ये समाविष्ट झाली असल्याचे पुरावेच ‘लोकमत’ने उजेडात आणले आहेत. विशेष म्हणजे नामांकित कंपन्यांऐवजी हीच कंपनी बँंकांची लाडकी बनली असून, बँका तिलाच काम देत आहेत. नगर जिल्हा बँंकेने आपल्या ७०० पदांच्या भरतीचे काम या कंपनीला दिले आहे. या कंपनीबाबत खासदार नीलेश लंके, माजी आमदार प्राजक्त तनपुरे, टिळक भोस यांनी सरकारकडे तक्रारी केल्या आहेत. मंत्रालयाने सहकार आयुक्तालयाला चौकशी करण्यास सांगितले. मात्र, सहकार आयुक्तालयाने अनुभव प्रमाणपत्रांची खातरजमा न करता गोलमाल उत्तरे देत कंपनीला पाठीशी घातले आहे. या कंपनीचे प्रमुख अमरावतीचे आहेत.

सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्याशी ‘लोकमत’ने याबाबत संपर्क केला असता ते म्हणाले, या प्रकरणाचा तपशील आपणाला माहीत नाही. याबाबत माहिती घेऊ. सहकार आयुक्त दीपक तावरे यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क साधला असता आपण सहकार विभागाच्या राष्ट्रीय परिषदेत असल्याचे त्यांनी सांगितले. नाशिकचे सहनिबंधक संभाजी निकम म्हणाले, कंपनीची निवड आयुक्तालयातून झाली आहे. त्यामुळे यासंदर्भात आपणाकडे काहीही माहिती नाही.

उमेदवार हवालदिल, राजकीय पक्षांचे मौन

अहमदनगर जिल्हा बँंकेच्या नोकर भरतीत हजारो मुलांनी अर्ज केले आहेत. वर्क वेल कंपनीने परीक्षा अहिल्यानगर जिल्ह्याऐवजी पुणे जिल्ह्यात ठेवली आहे. परीक्षा पुणे जिल्ह्यात का?, याबाबत बँंक व कंपनी यापैकी कुणीही स्पष्टीकरण दिलेले नाही. उमेदवारांना परीक्षेसाठी पुण्यात जावे लागणार आहे. राजकीय पक्षांनीही याबाबत मौन बाळगले आहे.

कंपनी बोगस आढळल्यास पैसे पाण्यात जाणार

कंपनीची चुकीच्या पद्धतीने पॅनलवर नियुक्ती झाल्याने याबाबत पेच निर्माण झाला आहे. कंपनीची निवड कोणत्याही टप्प्यावर अडचणीत येऊ शकते. परीक्षा रद्द झाल्यास मुलांचे परीक्षेसाठीचे पैसे, श्रम वाया जाण्याची शक्यता आहे. राज्यभर हा घोळ होण्याची शक्यता आहे.

नियुक्तीसाठी भाव फुटले?

जिल्हा बँकेत भरती होण्यासाठी निवडीचा भाव काय, याची चर्चा सुरू झाली आहे. काही दलाल आमिष दाखवत असल्याचीही चर्चा आहे. भरतीच्या नावाने कुणी पैसे मागत असेल तर उमेदवारांनी काय खबरदारी घ्यावी, भरती पारदर्शक कशी होणार, याबाबत बँकेचे प्रशासन, संचालक, भरती करणारी कंपनी यापैकी कुणीही जनजागरण करताना अथवा पत्रकार परिषद घेताना दिसत नाही.