शहरं
Join us  
Trending Stories
1
कपडे फाडले; लाथा मारल्या, धमकी दिली, जगतापांनी आयोगाला दिलेल्या तक्रार अर्जात धक्कादायक बाबी समोर
2
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
3
प्रेमाच्या जाळ्यात अडकवून बनवले तरुणींचे अश्लील व्हिडीओ; ७ आरोपींची पोलिसांनी काढली धिंड
4
ऑपरेशन सिंदूर: सैन्याने IPS अधिकाऱ्याचा सन्मान का केला? पाकिस्तानचा रहीम यार खान एअरबेस जवळच होता...
5
बुलेट ट्रेनचं देशातील पहिलं रेल्वे स्टेशन बांधून तयार, या दोन स्थानकांदरम्यान धावणार पहिली ट्रेन
6
कोसळल्या धारा...! केरळमध्ये मान्सून दाखल झाला; महाराष्ट्रात कधी पोहोचणार...
7
Nuclear Weapon : ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचं नुकसान झालं? पाकचं परराष्ट्र मंत्रालय म्हणतंय... 
8
"काळजी करू नका…’’ पुंछमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात नुकसान झेलणाऱ्या पीडितांना राहुल गांधींनी दिला धीर
9
Corona Virus : मास्क लावायला हवा का, बूस्टर डोसची गरज आहे का, कोरोनाचा JN.1 व्हेरिएंट किती संसर्गजन्य?
10
'सन ऑफ सरदार' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५४ व्या वर्षी निधन; उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास
11
पोर्शे प्रकरणातील डॉ. अजय तावरेचा आणखी एक कारनामा; रुबी हॉलच्या किडनी रॅकेटमध्ये सहआरोपी
12
अरे देवा! तरुणाला चष्मा न लावणं पडलं महागात; ५०० रुपयांऐवजी गमावले तब्बल ९० हजार
13
ट्रम्पच्या 'त्या' निर्णयामुळे बेल्जियमच्या भावी राजकुमारीचे शिक्षण धोक्यात; कोण आहे एलिझाबेथ?
14
Hit And Run : विक्रोळीत भरधाव वेगाने येणारा टँकर दुचाकीवर धडकला; बाईकस्वाराचा जागीच मृत्यू, चालक फरार
15
'हयगय केली जाणार नाही', IG जालिंदर सुपेकरांचं नाव चर्चेत, अजित पवारांचा कारवाईचा इशारा
16
कोरोना का वाढतोय? लसीचा प्रभाव संपला की अन्य काही...; २०१९ मध्ये जेव्हा पहिल्यांदा आलेला तेव्हा... 
17
Jyoti Malhotra : "ती गुप्तहेर नाही, फक्त एक..."; पाकिस्तानी बहीण हिरा बतूलने घेतली ज्योती मल्होत्राची बाजू
18
१०० ते १५० लोक, ६१ लॅपटॉप, ४१ मोबाईल, पुण्यात बनावट कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा; सायबर फसवणुकीचे मोठे रॅकेट उघड
19
काळरात्र! सर्पदंशाने दोन सख्या भावंडांचा झोपेतच मृत्यू, कोयाळ गाव हादरलं
20
Operation Sindoor : चार वार अन् शत्रू झाला लाचार! भारताची अशी एअर स्ट्राईक जिने पाकिस्तानला गुडघ्यावर आणलं 

कोरोनाकाळात क्षयरोग प्रसाराला लगाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:26 IST

जिल्ह्यात पूर्वी क्षयरोगाचे प्रमाण अधिक होते. दरम्यान राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत ते अजूनही जास्तच आहे. परंतु कोरोना काळात आवश्यक ...

जिल्ह्यात पूर्वी क्षयरोगाचे प्रमाण अधिक होते. दरम्यान राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत ते अजूनही जास्तच आहे. परंतु कोरोना काळात आवश्यक ती खबरदारी प्रत्येकांकडूनच घेतली गेल्याने या काळात रोगाचा प्रसार पूर्वीपेक्षा कमी झाला. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी औषधोपचारांची काळजी घेतल्याने क्षयरोग बरा होण्याचे प्रमाणही वाढले.

क्षयरोग रूग्णांचे निदान करून याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आरोग्य विभागातर्फे प्रयत्न केले जात आहेत. जे क्षय रूग्ण उपचार घेत आहेत, त्यांना नि:क्षय पोषण योजनेतून दर महिन्याला ५०० रूपये देण्यात येतात. या रूग्णांना औषधे शासनाकडून मोफत मिळतात. रूग्णांना औषधोपचारासह सकस आहार मिळावा, यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ रूग्णांना उपचार सुरू असेपर्यंत दिला जातो. क्षयरोग अर्थात टीबीच्या रूग्णांना पौष्टिक आणि आरोग्याला लाभदायक आहार घेता यावा यासाठी क्षयरोग कार्यालयाकडून प्रति महिना पोषण आहार भत्ता म्हणून ५०० रुपये दिले जातात. मात्र अनेक रूग्णांनी बँक खाते क्रमांक न दिल्याने हा भत्ता त्यांना मिळत नाही.

नगर जिल्ह्यात सध्या २,१४७ क्षयरोग्यांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी १,६६८ जणांना प्रति महिना ५०० रूपये पोषण भत्ता दिला जातो. इतरांचे बँक खाते उपलब्ध नसल्याने त्यांना भत्ता मिळत नसल्याचे क्षयरोग कार्यालयाचे म्हणणे आहे.

-------------

जिल्ह्यातील क्षयरोगी - २१४७

५०० रूपये भत्ता किती जणांना मिळतो - १६६८

न मिळणाऱ्यांचे प्रमाण (टक्क्यांत) - २२ टक्के

-----------

टीबीची लक्षणे काय

रात्री येणारा ताप, १५ दिवसांपेक्षा जास्त कालावधीपर्यंत खोकला, छातीत दुखणे, खोकल्यातून रक्त पडणे, वजन कमी होणे, भूक कमी होणे ही टीबीची लक्षणे आहेत. यातील कोणतेही लक्षण आढळून आले तर लगेचच थुंकीची तपासणी करणे आवश्यक आहे.

----------------

जास्तीत जास्त २८ महिन्यांत टीबीमुक्त

टीबीच्या रूग्णांचे वेळीच निदान झाले तर तो रूग्ण सहा महिन्यात पूर्णपणे बरा होण्याची शक्यता अधिक आहे. एमडीआर टीबी नियंत्रणात आणण्यासाठी सुमारे २८ महिन्यांचा कालावधी लागतो.

--------------

कोरोनाच्या काळात क्षयरोग हवेतून पसरण्याचे प्रमाण कमी झाले. कारण अनेकांनी मास्क, तसेच सुरक्षित अंतर राखल्याने हवेतून संसर्ग कमी झाला. परिणामी इतर वर्षांपेक्षा कोरोनाकाळात क्षयरोगी कमी आढळले.

- डाॅ. एस. डी. पोटे, जिल्हा क्षयरोग अधिकारी