शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
3
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
4
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
5
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
6
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
7
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
8
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
9
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
10
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
11
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
12
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
13
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
14
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
15
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
16
फायद्याची गोष्ट! स्टील-अ‍ॅल्युमिनियम की लोखंड? स्वयंपाकासाठी कोणती भांडी सर्वात बेस्ट?
17
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
18
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
19
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
20
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश

कोल्हार-अहमदनगर मार्गाच्या नुतनीकरणाला ठेकेदाराचा ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 09:50 IST

नगर-मनमाड महामार्गावरील कोल्हार ते नगर या मार्गाच्या नुतनीकरणासाठी ठेकेदाराने बांधकाम विभागाला ठेंगा दाखवित नुतनीकरणाचा आदेशच झुगारला आहे. मे अखेरपर्यंत या मार्गाचे नुतनीकरण करा अन्यथा टोल वसुलीच्या नुकसानीपोटी सरकारकडून मिळणारी भरपाई विसरा, असा सज्जड इशारा सार्वजनिक बांधकाम विभागाने सुप्रीम इन्फ्रा या ठेकेदार कंपनीला दिला आहे.

ठळक मुद्देआदेश झुगारलाबांधकाम विभागाने दिली मे पर्यंतची डेडलाइन

अहमदनगर : नगर-मनमाड महामार्गावरील कोल्हार ते नगर या मार्गाच्या नुतनीकरणासाठी ठेकेदाराने बांधकाम विभागाला ठेंगा दाखवित नुतनीकरणाचा आदेशच झुगारला आहे. मे अखेरपर्यंत या मार्गाचे नुतनीकरण करा अन्यथा टोल वसुलीच्या नुकसानीपोटी सरकारकडून मिळणारी भरपाई विसरा, असा सज्जड इशारा सार्वजनिक बांधकाम विभागाने सुप्रीम इन्फ्रा या ठेकेदार कंपनीला दिला आहे.कोपरगाव ते नगर हा सुमारे १२० किलोमीटर लांबीच्या मार्गाचे सुप्रीम इन्फ्रा या कंपनीला बांधा, वापरा व हस्तांतरित करा या तत्वावर देण्यात आले होते. या मार्गाच्या नुतनीकरणाची, देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी ठेकेदार कंपनीवरच आहे़ त्यामुळे कोपरगाव ते नगर या मार्गापैकी कोल्हार ते नगर या मार्गाचे नुतनीकरणाचे काम २०१६-१७ व २०१७-१८ पूर्ण होणे अपेक्षित होते़ हे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने वारंवार सुप्रिम इन्फ्रा कंपनीला आदेश दिले़ ते आदेश पाळले नाहीत म्हणून नोटिसा बजावल्या़ तरीही ठेकेदार कंपनीने अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत या मार्गाचे नुतनीकरण केले आहे. अखेरीस ठेकेदार कंपनीला सरकारकडून टोल वसुलीतील नुकसानीबाबत मिळणारी भरपाईची रक्कम थांबविण्याचा आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांनी काढला. त्यानंतर सुप्रिम इन्फ्रा या ठेकेदार कंपनीने कोल्हार ते नगर या एकूण ५५ किलोमीटरपैकी अवघे ८ किलोमीटर अंतराचेच नुतनीकरण केले व त्यापुढील कामही ८ जानेवारी २०१८ पासून थांबविले आहे. आता बांधकाम विभागाने या मार्गाच्या दुरुस्तीसाठी ठेकेदार कंपनीला मे अखेरपर्यंतच् ाी मुदत दिली आहे.ठेकेदाराची कोर्टात धावनगर-मनमाड महामार्गावर टोल वसुली सुरु आहे़ २०१५ पासून सरकारने टोल वसुलीत कार, जीप यांना वगळले आहे. त्या नुकसानीपोटी सरकारकडून सुप्रिम इन्फ्रा या ठेकेदार कंपनीला नुकसान भरपाई दिली जाते़ मात्र, कोल्हार ते नगर या ५५ किलोमीटर लांबीच्या मार्गाचे नुतनीकरण सुप्रिम इन्फ्रा ही ठेकेदार कंपनी करीत नाही. त्यामुळे बांधकाम सचिवांनी सप्टेंबर २०१७ पासून सुप्रिम इन्फ्रा कंपनीला सरकारकडून मिळणारी नुकसान भरपाई देण्याचे थांबविले आहे. त्याविरोधात ठेकेदार कंपनीने मुंबई उच्चन्यायालयात धाव घेतली आहे....अन्यथा पुन्हा टेंडरकोल्हार ते नगर या मार्गावरील खड्डे दुरुस्त करुन सर्व ५५ किलोमीटर लांबीच्या मार्गावर एक इंच जाडीचा डांबरी थर, साईडपट्ट्या, गटार अशी कामे नुतनीकरणात करण्यात येणार आहेत. या कामासाठी सुमारे २० कोटी रुपये अपेक्षित आहेत़ सुप्रिम कंपनीने हे नुतनीकरण न केल्यास त्यांना टोल वसुलीत होणा-या नुकसानी पोटी मिळणारी भरपाई दिली जाणार नाही. पुन्हा टेंडर काढून दुस-या ठेकेदारामार्फत हे काम पूर्ण करण्यात येईल, असे कार्यकारी अभियंता एस. आर. वर्पे यांनी सांगितले़

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरhighwayमहामार्ग