शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

पढेगाव येथे कोळसा भट्टीवरील मजुरांच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 19:50 IST

तालुक्यातील पढेगाव येथे कोळशाच्या भट्टीवर काम करणा-या दोघा मजुरांच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत रवींद्र याच्या वडिलांनी सोमवारी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दोघांचेही मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले.

श्रीरामपूर : तालुक्यातील पढेगाव येथे कोळशाच्या भट्टीवर काम करणा-या दोघा मजुरांच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत रवींद्र याच्या वडिलांनी सोमवारी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दोघांचेही मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले.शनिवारी रात्री भट्टीजवळ झोपलेले रवींद्र सखाराम घोगरे व संतोष शिवा वाघमारे हे मजूर मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली होती. योगेश रोहिदास पवार या ठेकेदारने काटवनातील लाकडांची भट्टी लावून कोळसा पाडण्यासाठी या दोघांना काम दिले होते. त्यानेच घटनेची माहिती तालुका पोलिसांना कळविली होती. पोलिसांनी मजुरांच्या कुटुंबीयांशी (रा. गायचोल, पोस्ट चणेरा, ता. रोहा) संपर्क साधत मृतदेह शवागृहात ठेवले. पढेगाव येथे आरोग्य केंद्रात प्राथमिक तपासणीनंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले होते.सोमवारी शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. धुरामुळे गुदमरल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे कुटुंबीयांनी ठेकेदाराविरोधात फिर्याद देण्याचा निर्णय घेतला.मयत संतोष याने घटनेच्या आदल्या दिवशीच खुशाल असल्याचे फोनवरून कळविले होते. त्याचबरोबर ठेकेदाराकडे कोळशाच्या भट्टीची शासकीय परवानगी आहे काय याबाबतही विचारणा केली होती, असे फिर्यादी सखाराम घोगरे यांनी म्हटले आहे. ठेकेदार परवानगीविनाच व्यवसाय चालवत होता व त्याने मजुरांच्या सुरक्षितेविषयी कुठलीही खबरदारी न घेतली नाही. त्यामुळे दोघांच्याही मृत्यूस तो दोषी असल्याचे घोगरे यांनी म्हटले आहे. ठेकेदार पवार यास अटक करण्यात आली आहे.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूर