शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
2
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
3
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
4
राजा रघुवंशी यांचा मृत्यू, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
5
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
6
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
7
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
8
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या
9
सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू
10
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
11
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
12
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
13
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
14
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
15
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
16
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
17
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
18
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
19
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
20
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे

पोलीस महासंचालकांसह मुख्य सचिवांविरोधात अवमान याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:16 IST

याप्रकरणी संगमनेर तालुक्यातील तिगाव येथील भास्कर कारभारी गायकवाड यांनी ॲड. सुरेंद्र जानराव यांच्यामार्फत संगमनेर जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली ...

याप्रकरणी संगमनेर तालुक्यातील तिगाव येथील भास्कर कारभारी गायकवाड यांनी ॲड. सुरेंद्र जानराव यांच्यामार्फत संगमनेर जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती. जिल्हा न्यायाधीश (क्र. २) भोसले यांच्यासमोर या याचिकेची सुनावणी झाली.

याचिकाकर्ते यांची तिगाव येथे वडिलोपार्जित शेतजमीन व जनावरे आहेत. ते नोकरीनिमित्त पुणे येथे राहतात. नोकरी सांभाळून ते गावाकडील शेती करतात. शेजारी राहणाऱ्या लोकांनी गायकवाड यांच्या शेतीवर कब्जा केल्याच्या प्रकरणात संगमनेर न्यायालयात दिवाणी दावा सुरू आहे. या जमिनीतील गायकवाड यांचा हिस्सा वगळून इतर मिळकतीबाबत हा दावा सुरू आहे. गायकवाड यांनी त्यांच्या हिश्श्याच्या जमिनीत जनावरांसाठी मका पेरला होता. ज्यांच्या विरोधात दावा सुरू आहे, त्या लोकांनी गायकवाड यांच्या शेतातील मका कापून नेला. याबाबत गायकवाड हे संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले. मात्र, त्यांची तक्रार दाखल करून घेतली नाही. त्यानंतर गायकवाड यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनाही निवेदन देऊन दाद मागितली. मात्र, कुणीच त्यांची दखल घेतली नाही. त्यानंतर गायकवाड यांनी ॲड. जानराव यांच्यामार्फत संगमनेर न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेतील प्रतिवादींना नोटीस काढताना न्यायालयाने सुप्रीम कोर्टाने दिलेल्या विविध निकालांचा संदर्भ दिला असल्याचे याचिकाकर्त्यांचे वकील ॲड. जानराव यांनी सांगितले.

----------------------------

कुठल्याही तक्रारदाराची फिर्याद दाखल करून घ्यावी, असे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत. याचिकाकर्ते भास्कर गायकवाड यांच्या शेतातील पीक चोरीबाबत मात्र पोलिसांनी फिर्याद दाखल करून न घेतल्याने त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर न्यायालयाने राज्याचे तत्कालीन पोलीस महासंचालक, राज्याचे मुख्य सचिव, अहमदनगरचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व इतरांविरोधात अवमान याचिका दाखल करून घेत त्यांना नोटीस काढली आहे.

- ॲड. सुरेंद्र जानराव, याचिकाकर्त्याचे वकील