शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

काँग्रेस नेते स्वत:ला मिरवून घेतात

By admin | Updated: June 10, 2014 00:13 IST

संगमनेर : काँग्रेसचा मोठा पराभव होवून पक्ष नव्याने उदयास येईल, असे भाकीत आपण तीन वर्षांपूर्वी लिहून ठेवले होते. कारण काँग्रेसची नेतेमंडळी स्वत:लाच

संगमनेर : काँग्रेसचा मोठा पराभव होवून पक्ष नव्याने उदयास येईल, असे भाकीत आपण तीन वर्षांपूर्वी लिहून ठेवले होते. कारण काँग्रेसची नेतेमंडळी स्वत:लाच मिरवून घेत असल्याने पक्षाचे नामोनिशाण मिटत चालले आहे, अशी खंत माजी मंत्री बी. जे. खताळ यांनी व्यक्त केली. तालुक्यातील झोळे येथे आयोजित ‘मित्रगौरव’ सोहळ्यात ते बोलत होते. शासनाचा सांस्कृतीक पुरस्कारप्राप्त रघुवीर खेडकर व पत्रकारितेत पी.एच.डी. प्राप्त करणारे डॉ. संतोष खेडलेकर यांचा गौरव खताळ यांच्या हस्ते झाला. खताळ म्हणाले, पूर्वी महात्मा गांधींच्या विचाराची काँग्रेस होती. पक्षासाठी स्वर्गीय इंदिरा गांधी व राजीव गांधी यांनी बलिदान दिले. मात्र, त्यांनाच आजच्या पक्षातील नेते विसरले आहेत. शासनाच्या प्रत्येक योजना, विकासकामे, विकासनिधी हा पक्षाच्या माध्यमातून मिळत असताना स्वत:च्या नावाचा डिंगोरा पिटला जातो. सध्या व्यक्तीकेंद्रीत राजकारण होत आहे. काँग्रेसच्या दृष्टीने हे घातक आहे. सरड्याप्रमाणे रंग बदलणारे राजकारणी अस्तित्वात आल्याने पक्ष धोक्यात आला आहे. देशाच्या संसदेत राजकीय ‘तमाशा’ सुरू आहे. यामुळे पक्षाला एक प्रकारे तिलांजली मिळत आहे. काही वर्तमानपत्रेही अशा नेत्यांची चाकरी करू लागल्याने चुकीचा प्रचार होत असल्याचे खताळ यांनी सांगितले. प्रास्ताविक व स्वागत अण्णासाहेब काळे यांनी केले. बाजार समितीचे सभापती अनिल देशमुख, किसन हासे व प्रा. डॉ. संजय दळवी यांची मनोगते झाली. सूत्रसंचालन दिनकर साळवे यांनी करून जिजाबा हासे यांनी आभार मानले. कार्यक्रमास संगमनेर इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष डी. बी. राठी, राजेंद्रसिंह चौहान, डॉ. प्रसाद रसाळ, देवीदास गोरे, शिवराम बिडवे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)