शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

विधान परिषदेत पक्षीय राजकारण..; काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी अखेर मौन सोडलं

By शेखर पानसरे | Updated: February 5, 2023 22:41 IST

विधान परिषदेच्या निवडणुकीत झालेले राजकारण मला व्यथित करणारे, माझ्या भावना काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना कळविल्या

संगमनेर : आणखी एक राजकारण झाले, मधल्या काळात विधान परिषदेची निवडणूक झाली. खूप राजकारण त्यामध्ये झाले. सत्यजित तांबे खूप चांगल्या मतांनी विजयी झाले. त्यांचे अभिनंदन आपण यानिमित्ताने करतो आहोत. फक्त जे राजकारण झाले, ते मला व्यथित करणारे आहे. ही वस्तुस्थिती आहे. त्याबाबतीत मी माझ्या भावना काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना कळविल्या आहेत. असे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते, माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले.

आमदार थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी (दि.०५) शहरातील‎ जाणता राजा मैदान येथे आनंद,‎ मिलिंद, आदर्श व उत्कर्ष शिंदे‎ यांच्या उपस्थितीत ‘शिंदेशाही‎ बाणा’ या कार्यक्रमाचे आयोजन‎ करण्यात आले होते. त्यावेळी ऑनलाईन पद्धतीने आमदार थोरात यांनी संवाद साधला. ते म्हणाले, हे पक्षीय राजकारण आहे. हे बाहेर फार बोलले पाहिजे असे नाही, या मताचा मी कायम आहे. म्हणून त्याबाबत काय जे आहे. ते मी पक्षश्रेष्ठींना कळविले आहे. पक्ष पातळीवर आणि माझ्या पातळीवर त्यामध्ये आम्ही योग्य निर्णय आणि जे काही करायचे ते योग्य पद्धतीने करू. त्याबाबत आपण काही काळजी करण्याचे कारण आहे, असे मला वाटत नाही. त्यामध्ये आपण पुढे जाऊ. काँग्रेसचा विचार हा आपला विचार आहे. मधल्या काळामध्ये विधान परिषदेचे राजकारण सुरू होते. त्यामध्ये काही बातम्या अशा आल्या की, भारतीय जनता पक्षापर्यंत आपल्याला नेऊन पोहोचवले. एवढेच नाही तर भारतीय जनता पक्षाच्या तिकिटाचे वाटप सुद्धा करून टाकले. काही लोक कशा पद्धतीने गैरसमज पसरविण्याचे काम करत आहेत. हे आपण पाहिलेले आहे. अनेक प्रकारच्या चर्चा त्यांनी घडवून आणलेल्या असल्या तरी काँग्रेसचा विचार हा आपला विचार आहे. आतापर्यंत त्या विचाराने वाटचाल केली, पुढील वाटचाल सुद्धा त्याच विचाराने आपली राहणार आहे. यांची ग्वाही देतो. माझ्या मनातील भावना यानिमित्ताने मी बोलला आहे.

संगमनेर तालुक्यावर सूड उगावावा अशा पद्धतीने हल्ले

मधल्या एक महिन्याच्या काळात खूप राजकारण झाले. राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर सतत संगमनेर तालुक्यावर सूड उगावावा अशा पद्धतीने हल्ले होताना दिसतात. अनेक कार्यकर्त्यांना त्रास दिला कसा देता येईल, असे पाहिले जाते आहे. त्यांना अडचणीत आणले जात आहे. त्यांचे उद्योग, व्यवसाय बंद पाडण्यासाठी नाही त्या प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. विकासाची चाललेली कामे बंद पाडण्याचा प्रयत्न चाललेला दिसतो. खरं म्हणजे सत्ता, सत्ता बदल हे सर्वच पाहिलेले आहे. सत्तेत आपणही राहिलो आहे. परंतू दुर्देवाने हा अनुभव यावेळेस आपण यावेळेस घेतो आहे. परंतु संगमनेर तालुक्याने कायमच संघर्ष केला आहे. संघर्षातून आपण मोठे झालो आहे. निळवंडे करता केलेला असेल संघर्ष, नदीच्या पाण्याचा वाटा मिळण्याकरिता केलेला संघर्ष असेल. प्रत्येक गोष्टीतून संघर्षातून आपण यश मिळविलेले आहे आणि पुढे गेलो आहे. या संघर्षातून आपण बाहेर येऊ आणि नव्या उभारीने उभे राहू, याची मला खात्री आहे. असेही आमदार थोरात म्हणाले.

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातcongressकाँग्रेसSatyajit Tambeसत्यजित तांबे