शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

विधान परिषदेत पक्षीय राजकारण..; काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी अखेर मौन सोडलं

By शेखर पानसरे | Updated: February 5, 2023 22:41 IST

विधान परिषदेच्या निवडणुकीत झालेले राजकारण मला व्यथित करणारे, माझ्या भावना काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना कळविल्या

संगमनेर : आणखी एक राजकारण झाले, मधल्या काळात विधान परिषदेची निवडणूक झाली. खूप राजकारण त्यामध्ये झाले. सत्यजित तांबे खूप चांगल्या मतांनी विजयी झाले. त्यांचे अभिनंदन आपण यानिमित्ताने करतो आहोत. फक्त जे राजकारण झाले, ते मला व्यथित करणारे आहे. ही वस्तुस्थिती आहे. त्याबाबतीत मी माझ्या भावना काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना कळविल्या आहेत. असे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते, माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले.

आमदार थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी (दि.०५) शहरातील‎ जाणता राजा मैदान येथे आनंद,‎ मिलिंद, आदर्श व उत्कर्ष शिंदे‎ यांच्या उपस्थितीत ‘शिंदेशाही‎ बाणा’ या कार्यक्रमाचे आयोजन‎ करण्यात आले होते. त्यावेळी ऑनलाईन पद्धतीने आमदार थोरात यांनी संवाद साधला. ते म्हणाले, हे पक्षीय राजकारण आहे. हे बाहेर फार बोलले पाहिजे असे नाही, या मताचा मी कायम आहे. म्हणून त्याबाबत काय जे आहे. ते मी पक्षश्रेष्ठींना कळविले आहे. पक्ष पातळीवर आणि माझ्या पातळीवर त्यामध्ये आम्ही योग्य निर्णय आणि जे काही करायचे ते योग्य पद्धतीने करू. त्याबाबत आपण काही काळजी करण्याचे कारण आहे, असे मला वाटत नाही. त्यामध्ये आपण पुढे जाऊ. काँग्रेसचा विचार हा आपला विचार आहे. मधल्या काळामध्ये विधान परिषदेचे राजकारण सुरू होते. त्यामध्ये काही बातम्या अशा आल्या की, भारतीय जनता पक्षापर्यंत आपल्याला नेऊन पोहोचवले. एवढेच नाही तर भारतीय जनता पक्षाच्या तिकिटाचे वाटप सुद्धा करून टाकले. काही लोक कशा पद्धतीने गैरसमज पसरविण्याचे काम करत आहेत. हे आपण पाहिलेले आहे. अनेक प्रकारच्या चर्चा त्यांनी घडवून आणलेल्या असल्या तरी काँग्रेसचा विचार हा आपला विचार आहे. आतापर्यंत त्या विचाराने वाटचाल केली, पुढील वाटचाल सुद्धा त्याच विचाराने आपली राहणार आहे. यांची ग्वाही देतो. माझ्या मनातील भावना यानिमित्ताने मी बोलला आहे.

संगमनेर तालुक्यावर सूड उगावावा अशा पद्धतीने हल्ले

मधल्या एक महिन्याच्या काळात खूप राजकारण झाले. राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर सतत संगमनेर तालुक्यावर सूड उगावावा अशा पद्धतीने हल्ले होताना दिसतात. अनेक कार्यकर्त्यांना त्रास दिला कसा देता येईल, असे पाहिले जाते आहे. त्यांना अडचणीत आणले जात आहे. त्यांचे उद्योग, व्यवसाय बंद पाडण्यासाठी नाही त्या प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. विकासाची चाललेली कामे बंद पाडण्याचा प्रयत्न चाललेला दिसतो. खरं म्हणजे सत्ता, सत्ता बदल हे सर्वच पाहिलेले आहे. सत्तेत आपणही राहिलो आहे. परंतू दुर्देवाने हा अनुभव यावेळेस आपण यावेळेस घेतो आहे. परंतु संगमनेर तालुक्याने कायमच संघर्ष केला आहे. संघर्षातून आपण मोठे झालो आहे. निळवंडे करता केलेला असेल संघर्ष, नदीच्या पाण्याचा वाटा मिळण्याकरिता केलेला संघर्ष असेल. प्रत्येक गोष्टीतून संघर्षातून आपण यश मिळविलेले आहे आणि पुढे गेलो आहे. या संघर्षातून आपण बाहेर येऊ आणि नव्या उभारीने उभे राहू, याची मला खात्री आहे. असेही आमदार थोरात म्हणाले.

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातcongressकाँग्रेसSatyajit Tambeसत्यजित तांबे