शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगरमध्ये सावरकर मुद्यावरून काँग्रेस-भाजपमध्ये पुन्हा संघर्ष

By साहेबराव नरसाळे | Updated: April 14, 2023 17:53 IST

आंबेडकर जयंती कार्यक्रमात किरण काळे म्हणाले, आज देशामध्ये परिस्थिती चिघळविण्याचा प्रयत्न काही लोक करीत आहेत.

अहमदनगर : सावरकर मुद्यावरून देशभरात काँग्रेस व भाजपमध्ये जोरदार संघर्ष रंगला होता. मात्र नगरमध्ये प्रथमच सावरकर मुद्यावरून भाजप व काँग्रेसमध्ये सुरू झाला आहे. विनायक सावरकरांपेक्षा छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांचे कार्य महान होते, असे वक्तव्य काँग्रेसचे शहर जिल्हाद्यक्ष किरण काळे यांनी आंबेडकर जयंती कार्यक्रमात केले. त्यानंतर काळे यांच्या वक्तव्याचा निषेध करीत भाजपनेही काळे यांनी माफी मागावी, अन्यथा भाजप स्वस्थ बसणार नाही, असा इशारा भाजपचे ज्येष्ठ नेते वसंत लोढा यांनी दिला. सावरकर विरोधी वक्तव्य केल्यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी गेली. दिल्लीतील शासकीय निवासस्थान सोडावे लागले. आता त्यांची अवस्था ना घर का ना घाट का, अशी झाली आहे. तशीच अवस्था किरण काळे यांचीही होईल, असे लोढा यांनी म्हटले आहे. 

आंबेडकर जयंती कार्यक्रमात किरण काळे म्हणाले, आज देशामध्ये परिस्थिती चिघळविण्याचा प्रयत्न काही लोक करीत आहेत. आपल्या राजकीय अजेंड्यासाठी धार्मिक तेढ निर्माण करण्याचा डाव काही प्रवृत्ती राबवित आहेत. मात्र देशाला स्थिर ठेवण्याची ताकद देशाच्या संविधानामध्ये आहे. महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधानच देशाचे अखंडत्व टिकवू शकते. विनायक सावरकरां पेक्षा छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांचे कार्य महान आहे. डॉ. आंबेडकर यांनी सर्व धर्म समभावाचे संविधान या देशाला दिले नसते तर आज व्यक्ती स्वातंत्र्याची देखील गळचेपी झाली असती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी तमाम शिवप्रेमींना अभिमानाचा, गर्व आहे. जगात असा राजा आजवर झाला नाही. क्रांतीसुर्य महात्मा फुले, सावित्रीमाई फुले यांनी तत्कालीन सामाजिक रूढी परंपरांना छेद देत शिक्षणाची कवाडं खुली केली नसती तर आज बहुजन समाज शिकू शकला नसता. शाहू महाराजांनी देखील समाज सुधारणेच काम केले. छ. शिवाजी महाराज, शाहू, फुले,आंबेडकरांच्या कामाच्या तुलनेत सावरकर यांचे काम अत्यंत छोट्या स्वरूपाचे होते, असे विधान काळे यांनी केले आहे. 

त्यांच्या या वक्तव्यनंतर भाजपचे ज्येष्ठ नेते वसंत लोढा यांनी तात्काळ पत्रक काढून काळे यांनी माफी मागावी, असे म्हंटले. लोढा यांनी पत्रकात म्हटले आहे, स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या प्रखर देशभक्ताबद्दल अक्षेपार्ह वक्तव्य करून शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष किरण काळे यांनी राहुल गांधी यांच्या प्रमाणेच स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमन केला आहे. ज्या सावरकरांनी देशाला स्वातंत्र्य मिवावून देण्यासाठी आयुष्य झिजवत दोनदा काळ्या पाण्याची शिक्षा भोगली अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान भारतीय जनता पार्टी कदापी सहन करणार नाही. कॉग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सावरकरांप्रती अपशब्द वापरल्याने आज राहुल गांधीची काय अवस्था झाली आहे ? खासदारकी गेली, दिल्लीमधील शासकीय घर सोडण्याची नामुष्की त्यांच्यावर आल्याने त्यांची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली आहे. किरण काळे ही राहुल गांधींप्रमणे अक्षेपार्ह वक्त्याव्य करत आहेत. त्यांची ही अवस्था राहुल गांधीं सारखीच होईल. त्यामुळे किरण काळेंनी त्वरित सावरकरांची व जनतेची माफी मागावी. अन्यथा शहर भाजप शांत बसणार नाही, असा इशारा भाजपाचे ज्येष्ठ नेते वसंत लोढा यांनी दिला आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर