शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
Iran-Israel Conflict: इस्त्रायल आकाराने लहान, लोकसंख्या अन् सैन्यातही इराणच्या मागे, तरीही युद्धात कसे पुढे? हे आहे कारण
3
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
4
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
5
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
6
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
7
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
8
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
9
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
10
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
11
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?
12
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
13
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
14
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
15
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
16
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
17
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
18
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
19
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
20
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!

अहमदनगरमध्ये सावरकर मुद्यावरून काँग्रेस-भाजपमध्ये पुन्हा संघर्ष

By साहेबराव नरसाळे | Updated: April 14, 2023 17:53 IST

आंबेडकर जयंती कार्यक्रमात किरण काळे म्हणाले, आज देशामध्ये परिस्थिती चिघळविण्याचा प्रयत्न काही लोक करीत आहेत.

अहमदनगर : सावरकर मुद्यावरून देशभरात काँग्रेस व भाजपमध्ये जोरदार संघर्ष रंगला होता. मात्र नगरमध्ये प्रथमच सावरकर मुद्यावरून भाजप व काँग्रेसमध्ये सुरू झाला आहे. विनायक सावरकरांपेक्षा छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांचे कार्य महान होते, असे वक्तव्य काँग्रेसचे शहर जिल्हाद्यक्ष किरण काळे यांनी आंबेडकर जयंती कार्यक्रमात केले. त्यानंतर काळे यांच्या वक्तव्याचा निषेध करीत भाजपनेही काळे यांनी माफी मागावी, अन्यथा भाजप स्वस्थ बसणार नाही, असा इशारा भाजपचे ज्येष्ठ नेते वसंत लोढा यांनी दिला. सावरकर विरोधी वक्तव्य केल्यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी गेली. दिल्लीतील शासकीय निवासस्थान सोडावे लागले. आता त्यांची अवस्था ना घर का ना घाट का, अशी झाली आहे. तशीच अवस्था किरण काळे यांचीही होईल, असे लोढा यांनी म्हटले आहे. 

आंबेडकर जयंती कार्यक्रमात किरण काळे म्हणाले, आज देशामध्ये परिस्थिती चिघळविण्याचा प्रयत्न काही लोक करीत आहेत. आपल्या राजकीय अजेंड्यासाठी धार्मिक तेढ निर्माण करण्याचा डाव काही प्रवृत्ती राबवित आहेत. मात्र देशाला स्थिर ठेवण्याची ताकद देशाच्या संविधानामध्ये आहे. महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधानच देशाचे अखंडत्व टिकवू शकते. विनायक सावरकरां पेक्षा छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांचे कार्य महान आहे. डॉ. आंबेडकर यांनी सर्व धर्म समभावाचे संविधान या देशाला दिले नसते तर आज व्यक्ती स्वातंत्र्याची देखील गळचेपी झाली असती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी तमाम शिवप्रेमींना अभिमानाचा, गर्व आहे. जगात असा राजा आजवर झाला नाही. क्रांतीसुर्य महात्मा फुले, सावित्रीमाई फुले यांनी तत्कालीन सामाजिक रूढी परंपरांना छेद देत शिक्षणाची कवाडं खुली केली नसती तर आज बहुजन समाज शिकू शकला नसता. शाहू महाराजांनी देखील समाज सुधारणेच काम केले. छ. शिवाजी महाराज, शाहू, फुले,आंबेडकरांच्या कामाच्या तुलनेत सावरकर यांचे काम अत्यंत छोट्या स्वरूपाचे होते, असे विधान काळे यांनी केले आहे. 

त्यांच्या या वक्तव्यनंतर भाजपचे ज्येष्ठ नेते वसंत लोढा यांनी तात्काळ पत्रक काढून काळे यांनी माफी मागावी, असे म्हंटले. लोढा यांनी पत्रकात म्हटले आहे, स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या प्रखर देशभक्ताबद्दल अक्षेपार्ह वक्तव्य करून शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष किरण काळे यांनी राहुल गांधी यांच्या प्रमाणेच स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमन केला आहे. ज्या सावरकरांनी देशाला स्वातंत्र्य मिवावून देण्यासाठी आयुष्य झिजवत दोनदा काळ्या पाण्याची शिक्षा भोगली अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान भारतीय जनता पार्टी कदापी सहन करणार नाही. कॉग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सावरकरांप्रती अपशब्द वापरल्याने आज राहुल गांधीची काय अवस्था झाली आहे ? खासदारकी गेली, दिल्लीमधील शासकीय घर सोडण्याची नामुष्की त्यांच्यावर आल्याने त्यांची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली आहे. किरण काळे ही राहुल गांधींप्रमणे अक्षेपार्ह वक्त्याव्य करत आहेत. त्यांची ही अवस्था राहुल गांधीं सारखीच होईल. त्यामुळे किरण काळेंनी त्वरित सावरकरांची व जनतेची माफी मागावी. अन्यथा शहर भाजप शांत बसणार नाही, असा इशारा भाजपाचे ज्येष्ठ नेते वसंत लोढा यांनी दिला आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर