शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
5
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
6
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
7
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
8
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
9
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
10
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
11
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
12
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
13
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
14
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
15
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
16
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
17
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
18
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
19
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
20
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध

अहमदनगरमध्ये सावरकर मुद्यावरून काँग्रेस-भाजपमध्ये पुन्हा संघर्ष

By साहेबराव नरसाळे | Updated: April 14, 2023 17:53 IST

आंबेडकर जयंती कार्यक्रमात किरण काळे म्हणाले, आज देशामध्ये परिस्थिती चिघळविण्याचा प्रयत्न काही लोक करीत आहेत.

अहमदनगर : सावरकर मुद्यावरून देशभरात काँग्रेस व भाजपमध्ये जोरदार संघर्ष रंगला होता. मात्र नगरमध्ये प्रथमच सावरकर मुद्यावरून भाजप व काँग्रेसमध्ये सुरू झाला आहे. विनायक सावरकरांपेक्षा छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांचे कार्य महान होते, असे वक्तव्य काँग्रेसचे शहर जिल्हाद्यक्ष किरण काळे यांनी आंबेडकर जयंती कार्यक्रमात केले. त्यानंतर काळे यांच्या वक्तव्याचा निषेध करीत भाजपनेही काळे यांनी माफी मागावी, अन्यथा भाजप स्वस्थ बसणार नाही, असा इशारा भाजपचे ज्येष्ठ नेते वसंत लोढा यांनी दिला. सावरकर विरोधी वक्तव्य केल्यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी गेली. दिल्लीतील शासकीय निवासस्थान सोडावे लागले. आता त्यांची अवस्था ना घर का ना घाट का, अशी झाली आहे. तशीच अवस्था किरण काळे यांचीही होईल, असे लोढा यांनी म्हटले आहे. 

आंबेडकर जयंती कार्यक्रमात किरण काळे म्हणाले, आज देशामध्ये परिस्थिती चिघळविण्याचा प्रयत्न काही लोक करीत आहेत. आपल्या राजकीय अजेंड्यासाठी धार्मिक तेढ निर्माण करण्याचा डाव काही प्रवृत्ती राबवित आहेत. मात्र देशाला स्थिर ठेवण्याची ताकद देशाच्या संविधानामध्ये आहे. महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधानच देशाचे अखंडत्व टिकवू शकते. विनायक सावरकरां पेक्षा छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांचे कार्य महान आहे. डॉ. आंबेडकर यांनी सर्व धर्म समभावाचे संविधान या देशाला दिले नसते तर आज व्यक्ती स्वातंत्र्याची देखील गळचेपी झाली असती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी तमाम शिवप्रेमींना अभिमानाचा, गर्व आहे. जगात असा राजा आजवर झाला नाही. क्रांतीसुर्य महात्मा फुले, सावित्रीमाई फुले यांनी तत्कालीन सामाजिक रूढी परंपरांना छेद देत शिक्षणाची कवाडं खुली केली नसती तर आज बहुजन समाज शिकू शकला नसता. शाहू महाराजांनी देखील समाज सुधारणेच काम केले. छ. शिवाजी महाराज, शाहू, फुले,आंबेडकरांच्या कामाच्या तुलनेत सावरकर यांचे काम अत्यंत छोट्या स्वरूपाचे होते, असे विधान काळे यांनी केले आहे. 

त्यांच्या या वक्तव्यनंतर भाजपचे ज्येष्ठ नेते वसंत लोढा यांनी तात्काळ पत्रक काढून काळे यांनी माफी मागावी, असे म्हंटले. लोढा यांनी पत्रकात म्हटले आहे, स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या प्रखर देशभक्ताबद्दल अक्षेपार्ह वक्तव्य करून शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष किरण काळे यांनी राहुल गांधी यांच्या प्रमाणेच स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमन केला आहे. ज्या सावरकरांनी देशाला स्वातंत्र्य मिवावून देण्यासाठी आयुष्य झिजवत दोनदा काळ्या पाण्याची शिक्षा भोगली अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान भारतीय जनता पार्टी कदापी सहन करणार नाही. कॉग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सावरकरांप्रती अपशब्द वापरल्याने आज राहुल गांधीची काय अवस्था झाली आहे ? खासदारकी गेली, दिल्लीमधील शासकीय घर सोडण्याची नामुष्की त्यांच्यावर आल्याने त्यांची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली आहे. किरण काळे ही राहुल गांधींप्रमणे अक्षेपार्ह वक्त्याव्य करत आहेत. त्यांची ही अवस्था राहुल गांधीं सारखीच होईल. त्यामुळे किरण काळेंनी त्वरित सावरकरांची व जनतेची माफी मागावी. अन्यथा शहर भाजप शांत बसणार नाही, असा इशारा भाजपाचे ज्येष्ठ नेते वसंत लोढा यांनी दिला आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर