शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
3
इकडे पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिली; तिकडे 'बेवफा' सोनम युपीत सापडली...
4
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
5
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
6
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
7
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
8
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
9
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची
10
आऊट देताच महिला अंपायरवर भडकला अश्निन, रागाच्या भरात पॅडवर मारली बॅट!
11
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
12
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
13
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
14
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
15
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
16
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
17
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
18
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
19
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती

संगमनेरकरांच्या खिशाला मीटरची झळ

By admin | Updated: May 3, 2016 23:48 IST

संगमनेर : शहरात नगरपरिषदेने मीटरद्वारे पाणी देण्याचा घेतलेला निर्णय पाणी पट्टीपेक्षा दुपटीने महाग असल्याने नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

नाराजी : पाणी पट्टीपेक्षा दुप्पट दराने पाणीसंगमनेर : शहरात नगरपरिषदेने मीटरद्वारे पाणी देण्याचा घेतलेला निर्णय पाणी पट्टीपेक्षा दुपटीने महाग असल्याने नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. पिण्याच्या पाण्याची बचत व्हावी, अपव्यय टाळावा, या उद्देशाने पालिकेने प्रायोगिक तत्वावर वडजे मळा व मेहेर मळा भागातील पाणी टाकीवर अवलंबून असलेल्या १ हजार ७०० नळधारकांच्या नळांना मीटर बसविण्याची मोहीम हाती घेतली आहे. संपदा एजन्सीमार्फत जवळपास ४० टक्के पूर्ण मीटर बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. पुढच्या टप्प्यात संपूर्ण शहरामधील एकूण १२ हजार ५०० नळांना मीटर बसविले जाणार आहेत. पालिका नळधारकांकडून दरवर्षी १ हजार ७०० रूपये प्रमाणे पाणीपट्टी आकारते. आता मीटर बसविल्यावर १ पैसा लीटर प्रमाणे दर आकारणी करण्याचे पाणी पुरवठा समितीने ठरविले आहे. एका कुटूंबात कमीत कमी ५ माणसे असतील तर त्यांना दररोज सरासरी किमान १ हजार लीटर पाणी लागते. १ पैसा प्रती लीटरनुसार १ हजार लीटर पाण्याला दररोज मीटरद्वारे १० रूपये, दरमहा ३०० तर वर्षाला ३ हजार ६०० रूपयांची आकारणी होईल. म्हणजेच १ हजार ७०० रूपयांऐवजी आता दुपटीपेक्षा जास्त पैसे पाण्यासाठी मोजावे लागणार आहेत. पाण्यासाठी छूपी वाढ होणार असल्याने नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. पालिकेची निवडणूक काही महिन्यांवर येवून ठेपलेली असताना मीटरद्वारे पाण्याचा मुद्दा कळीचा ठरण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी) आम्ही नगरपरिषदेच्या मिटींगमध्ये हा विषय वारंवार निदर्शनास आणून दिला. ही योजना परवडणारी नाही. किमान ४ ते ५ हजार पाणीपट्टी भरावी लागेल. व्यावसायिकांचे तर कंबरडे मोडेल. नागरिकांनीच याला विरोध केला पाहिजे. पूर्वीच्या पाणीपट्टीच्या वरचा निम्मा बोजा शासनाने उचलावा. म्हणजे नागरिकांना त्रास होणार नाही. - कैलास वाकचौरे, नगरसेवक