शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

संगणकीय सात-बाराचे तीनतेरा

By admin | Updated: June 11, 2014 00:17 IST

कुळधरण : राज्याच्या महसूल विभागात ई-गव्हर्नन्सचा बोलबाला आहे. अचुकता, तत्परता साधत कामात गतिमानता आणण्यासाठी शेतकऱ्यांसाठी उपयुक्त सात-बारा उतारे संगणकावर उपलब्ध करुन देण्यात आले.

कुळधरण : राज्याच्या महसूल विभागात ई-गव्हर्नन्सचा बोलबाला आहे. अचुकता, तत्परता साधत कामात गतिमानता आणण्यासाठी शेतकऱ्यांसाठी उपयुक्त सात-बारा उतारे संगणकावर उपलब्ध करुन देण्यात आले. मात्र प्रत्यक्षात अंमबजावणीबाबत कर्जत तालुक्यातील अनेक तलाठी कार्यालयात या योजनेचे तीन-तेरा वाजले आहेत. संगणकावरील छपाईचे सात-बारा उतारे देण्याचे तहसीलदारांचे एक वर्षापुर्वीचे आदेश आहेत. मात्र तालुक्यातील अनेक भागात आजही हस्तलिखीतातील सात-बारे दिले जातात. कामात गतिमानता नसल्याने शेतकऱ्यांना तासन् तास तलाठी कार्यालयात ताटकळत थांबावे लागते. तलाठ्यांकडे अनेक गावांची सूत्रे असल्याने उतारे मिळविण्यासाठी कार्यालयात शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. ‘शासन आपल्या दारी’चा नारा दिला जात असला तरी शेतकऱ्यांची गैरसोय कमी होताना दिसत नाही. बँकांमध्ये कर्ज प्रकरणे करण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु असते. मात्र कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी शेतकऱ्यांना तलाठ्याच्या दारी हेलपाटे मारावे लागतात. तलाठी मुख्यालयी रहात नसल्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. तहसील प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सर्वसामान्य जनतेचा खोळंबा होत आहे. कोपर्डीचे तलाठी सरोदे यांनी या संदर्भात सांगितले की, शासनाच्या आदेशानुसार आम्ही संगणकाची खरेदी केली आहे. उताऱ्यासाठी आकारलेल्या पंधरा रुपयांतील पाच रुपये शासनाकडे भरावयाचे असून दहा रुपये संगणक खरेदीच्या रकमेच्या वसुलीसाठी ठेवायचे आहेत (वार्ताहर)तर संबंधितांवर कारवाई बारा गावे वगळता तालुक्यातील सर्व गावांचे उतारे संगणकावर उपलब्ध आहेत. संगणकीय उतारे पुरविण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. शेतकऱ्यांची अडवणूक होत असल्यास पाहणी केली जाईल. उताऱ्यांमागे १५ रुपयांपेक्षा अधिक रकमेची आकारणी होत असल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल.- जयसिंग भैसडे, तहसीलदार, कर्जतशेतकऱ्यांची लूटसंगणकावरील उतारा काढण्यासाठी जास्त खर्च येत असल्याचे सांगत काही तलाठी कार्यालयातून उताऱ्यामागे तीस रुपयांची आगाऊ वसुली केली जाते. संगणक घरी असल्याने जादा पैसे देऊनही वेळेत कामे होत नाही. ही दुकानदारी चक्क रविवारीही सुरु असते.