शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

बीओटीची कामे वेळेत पूर्ण करा, अन्यथा टक्केवारीचे पेव फुटेल; पालकमंत्री विखेंचा विरोधकांना टोला

By चंद्रकांत शेळके | Updated: July 1, 2023 21:19 IST

राज्यात सर्वप्रथम नगर जिल्हा परिषदेने कचरा संकलनासाठी इलेक्ट्रिक घंटागाडीचा देण्याचा निर्णय घेतला असून खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या संकल्पनेतून हा प्रयोग राबवण्यात येत आहे.

चंद्रकांत शेळके 

अहमदनगर : शासकीय कामे करण्यासाठी पूर्वीच्या सरकारमध्ये टक्केवारीचे गणित चालायचे. परंतु शिंदे-फडणवीस सरकारमध्ये हा प्रकार बंद झाला. जिल्हा परिषद प्रशासनाने प्राथमिक शाळांच्या जागा बीओटी तत्त्वावर विकसित करत त्याठिकाणी व्यापारी संकुल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या आधी ही व्यापारी संकुले पूर्ण करा. निवडणुकीनंतर यात पुन्हा टक्केवारीचे पेव फुटण्याची शक्यता आहे, असा टोला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधकांना लगावला.

१४ व्या वित्त आयोगाच्या निधीअंतर्गत स्वच्छ भारत अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामपंचायतींना कचरा संकलनासाठी व वाहतुकीसाठी तीनचाकी विद्युत घंटागाड्यांचे शनिवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. त्याप्रसंगी मंत्री विखे बोलत होते. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी समर्थ शेवाळे, राहुल शेळके, सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे आदी उपस्थित होते. विखे पाटील म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांपाठोपाठ पशुपालकांचाही एक रुपयात विमा उतरवण्यात येणार आहे. सरकारने महात्मा जोतिबा आरोग्य विमा योजनेचे कवच पाच लाखांपर्यंत वाढवले आहे. केवळ आधार दाखवून जनतेला आरोग्य विम्याचा लाभ मिळणार आहे.

राज्यात सर्वप्रथम नगर जिल्हा परिषदेने कचरा संकलनासाठी इलेक्ट्रिक घंटागाडीचा देण्याचा निर्णय घेतला असून खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या संकल्पनेतून हा प्रयोग राबवण्यात येत आहे. ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी बचत गटाच्या वतीने त्यांना स्टॉल आणि पिठाची गिरणी देण्यात आलेली आहे. जलजीवन मिशनअंतर्गत पाणी योजनांसाठी एकट्या नगर जिल्ह्याला ४ हजार कोटींचा निधी मिळाला आहे. यामुळे पुढील २५ वर्षांची गरज ओळखून जलजीवन योजनेची कामे पूर्ण करा, असे मंत्री विखे म्हणाले.

१७७ विद्युत घंटागाड्यांची खरेदी

१४ व्या वित्त आयोग योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एकूण १७७ विद्युत घंटागाड्या खरेदी करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ७५ विद्युत घंटागाड्यांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यामध्ये राहुरी तालुक्यासाठी १०, शेवगाव ८, पाथर्डी १०, जामखेड ४, कर्जत ८, श्रीगोंदा १२, पारनेर १०, तर नगर तालुक्यासाठी १३ घंटागाड्यांचे वितरण करण्यात आले.

यापुढे एक रुपयाचाही निधी मागे जाणार नाही

सध्या जिल्ह्यात काही लोक एकत्र येऊन आमच्या विचाराला विरोध करत आहेत. यापूर्वीच्या सरकारमध्ये टक्केवारीच्या घोळात जिल्हा नियोजन समितीचा ५० ते ६० कोटींचा निधी अखर्चित राहत होता. मात्र, आम्ही योग्य नियोजन केल्यामुळे हा आकडा १० कोटींपर्यंत खाली आला आहे. भविष्यात विकास कामांचा एक रुपयाचाही निधी परत जाणार नाही, असे खासदार सुजय विखे पाटील म्हणाले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील