शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

मोबाइल टाॅवर कंपन्यांविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:20 IST

अहमदनगर : मोबाइल टॉवरची देखभाल व दुरुस्तीचे काम करणाऱ्या कामगारांना कोरोनाच्या संकटकाळात कंपन्यांकडून कोणत्याही आरोग्य सुविधा पुरविल्या ...

अहमदनगर : मोबाइल टॉवरची देखभाल व दुरुस्तीचे काम करणाऱ्या कामगारांना कोरोनाच्या संकटकाळात कंपन्यांकडून कोणत्याही आरोग्य सुविधा पुरविल्या जात नाहीत. शासनाने याबाबत कंपन्यांना आदेश द्यावेत, अशी मागणी मोबाइल टाॅवर असोसिएशनचे अध्यक्ष सदाशिव खेडकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कोरोनाच्या संकट काळात मोबाइल सेवा पुरविण्याचे काम तांत्रिक कामगार करीत आहेत. कोरोनाची लागण झाल्याने काहींना जीव गमवावा लागला आहे. काही कामगार रुग्णालयांत उपचार घेत आहेत. या कामगारांचा कंपन्यांनी आरोग्य विमा उतरवावा तसेच मयतांच्या कुटुंबीयांना मदत द्यावी, या मागणीसाठी कंपनी व्यवस्थापनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. परंतु, कंपन्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने मोबाइल टाॅवर असोसिएशनने सरकारकडे याबाबत तक्रार केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात मोबाइल टॉवर तांत्रिक कामगार संघटनेचे अध्यक्ष सदाशिव खेडकर यांनी म्हटले आहे की, कंपन्यांनी कामगारांचा आरोग्य विमा, अपघाती विमा उतरवावा, कामगारांना संसर्ग झाल्यास वैद्यकीय उपचाराच्या खर्चाची जबाबदारी कंपन्यांनी उचलावी, कोरोनामुळे मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना अर्थिक मदतीची रक्कम जाहीर करावी, कामगारांच्या वेतनात वाढ करावी. यासह इतर मागण्यांसाठी आयडिया, व्होडाफोन, एअरटेल, रिलायन्स जिओ या कंपन्यांकडे कामगारांच्या मागण्यांबाबत वेळोवेळी पाठपुरावा केला. मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. उलटपक्षी कामगारांना दमदाटी करून काम करून घेतले जात असून, सरकारने याबाबत लक्ष घालून संबंधित कंपन्यांना आदेश द्यावेत, अशी मागणी खेडकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.