शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
2
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
3
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
4
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
5
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
6
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
7
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
8
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
9
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
10
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
11
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
12
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
13
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
14
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
15
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
16
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
17
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
18
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
19
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
20
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!

‘साकळाई’च्या सर्व्हेचा निघाला आदेश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 18:38 IST

साकळाई उपसा सिंचन योजनेचे तातडीने सर्व्हेक्षण होवून योजनेचा समावेश ‘सुप्रमा’ध्ये करण्यातबाबतचा आदेश मंगळवारी कुकडी सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता यांनी जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता यांना दिला आहे.

अहमदनगर : नगर-श्रीगोंदा तालुक्यातील दुष्काळी भागातील ३५ गावांना वरदान ठरणा-या साकळाई उपसा सिंचन योजनेचे तातडीने सर्व्हेक्षण होवून योजनेचा समावेश ‘सुप्रमा’ध्ये करण्यातबाबतचा आदेश मंगळवारी कुकडी सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता यांनी जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता यांना दिला आहे. याबाबत मंगळवारी मंत्रालयात जलसंपदामंत्री गिरीष महाजन, साकळाई कृती समिती सदस्य, अभिनेत्री दीपाली सय्यद यांची बैठक झाली.गेल्या वर्षभरापासून साकळाई उपसा सिंचन योजना मार्गी लागावी यासाठी योजनेतील लाभधारक शेतक-यांनी लढा उभारला आहे. त्यासाठी गावोगावी जावून जनजागृती अभियान राबविले. ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले. लोकसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाळकीमध्ये जाहीर सभेत विधानसभा निवडणुकीपूर्वी साकळाई उपसा सिंचन योजनेला प्रशासकीय मंजुरी दिली जाईल, असे स्पष्ट केले होते. लोकसभा निकालानंतरही साकळाईबाबत सरकारस्तरावर हालचाली न झाल्याने साकळाई कृती समिती व अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी पुन्हा गावोगावी जावून जनजागृती अभियान राबविले. दरम्यान क्रांती दिनी जिल्हा परिषदेच्या आवारात अभिनेत्री सय्यद यांनी आमरण उपोषण केले. साकळाई योजनेबाबत मंत्रालयात बैठक घेवून मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याने त्यांनी उपोषण मागे घेतले. मंगळवारी (दि.३)पुन्हा मंत्रालयात गिरीष महाजन यांनी अभिनेत्री सय्यद व साकळाई कृती समितीचे सदस्य यांची बैठक घेतली. साकळाई उपसा सिंचन योजनेसाठीचा प्रस्ताव महामंडळाकडून शासनास सादर करण्यात आला होता. बैठकीत मंत्र्यांनी पाणी उपलब्धतेच्या अधीन राहून सर्वेक्षणाचे काम हाती घेण्याचे निर्देश दिलेले आहेत. सर्वेक्षणाला २.३४ कोटी खर्च अपेक्षित आहे. यामध्ये समांतर पाईपलाईनचे सर्वेक्षण व संकल्पन करणे, मुख्य रायझींग मेन, पंप हाऊस व लाभक्षेत्राचे सर्वेक्षण करण्यासाठीच्या बाबींचा समावेश आहे.पाणी उपलब्ध झाल्यासच साकळाईचा विचार२९ आॅगस्ट रोजी मंत्रालयातील नियामक मंडळाच्या बैठकीनंतर झालेल्या चर्चेनुसार दुस-या कृष्णा पाणी तंटा लवादानुसार कुकडी खो-यामध्ये अतिरिक्त तीन टीएमसी पाण्याची तरतूद आहे. मात्र लवादाचा अंतिम निवाडा झालेला नाही. हे पाणी उपलब्ध झाले, तर या अतिरिक्त पाण्याचा वापर साकळाई प्रकल्पासाठी करता येईल, अशी चर्चा झाली. कुकडी डाव्या कालव्याला समांतर पाईपलाईनद्वारे अथवा एक्सप्रेस कॅनॉलद्वारे विसापूर धरणात पाणी आणणे.कुकडी घोड नदीमधून पावसाळ्यामध्ये घोड धरण (चिंचणी) येथे सोडणे. ते पाणी घोड धरणातून नदीपात्रात विसापूरसाठी, साकळाईसाठी उचलणे, अशा बाबींवर चर्चा झाली.

टॅग्स :DamधरणAhmednagarअहमदनगर