शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
4
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
5
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
6
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
7
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
8
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
9
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
10
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
11
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
12
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
13
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
14
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
15
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
16
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
17
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
18
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
19
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?
20
‘सीसीएमपी’वरून वैद्यकीय क्षेत्रात गोंधळ

कुकडीचे पूर्ण दाबाने पाणी न दिल्यास सामूहिक राजीनामे

By admin | Updated: August 24, 2016 00:45 IST

श्रीगोंदा : कुकडी कालव्यावरील कि. मी. १३२ जोड कालव्यास पूर्ण दाबाने पूर्ण दिवस पाणी न दिल्यास राजीनामा देण्याचा इशारा जोड कालव्यावरील २९ सहकारी पाणी वापर संस्था प्रतिनिधींनी दिला आहे.

श्रीगोंदा : कुकडी कालव्यावरील कि. मी. १३२ जोड कालव्यास पूर्ण दाबाने पूर्ण दिवस पाणी न दिल्यास राजीनामा देण्याचा इशारा जोड कालव्यावरील २९ सहकारी पाणी वापर संस्था प्रतिनिधींनी दिला आहे. या संदर्भात त्यांनी मंगळवारपासून राजीनामा पत्रावर सह्यांची मोहीम हाती घेतली आहे. कुकडी कार्यालयात सोमवारी कुकडीचे कार्यकारी अभियंता सुभाष कोळी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली होती. बैठकीस माजी मंत्री बबनराव पाचपुते हजर होते. यावेळी संस्था प्रतिनिधींनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. बंडू खंडागळे म्हणाले, जोड कालव्यास पूर्ण दाबाने पाणी न देता पाणीपट्टी मात्र पूर्ण आकारली जाते. गेल्या तीन वर्षांपासून पाणी मिळत नाही. शिवाजी जाधव म्हणाले, १६० शेततळ्यांना पाणी न सोडता शेततळ्यांचे पैसे घेतले घेतात, मात्र पाणीपट्टी संस्थेकडून वसूल केली जाते याची चौकशी व्हावी. सुमित बोरूडे म्हणाले, १३२ जोड कालव्यावर शंभर टक्के पाणीपट्टी वसुली होते मात्र दर आवर्तनात अन्याय कसा होतो? हे आवर्तन पूर्ण होण्यासाठी कुकडीत साडेपाच टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. २६ आॅगस्टला कुकडीचा जोड कालवा सोडावा अन्यथा मी शेतकऱ्यांबरोबर राहीन व जोड कालव्याचे गेट उघडणार, अशा इशारा माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी दिला.(तालुका प्रतिनिधी)