शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:36 IST

अहमदनगर : जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायतींपैकी निम्म्यापेक्षा जास्त ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता संपूर्ण जिल्ह्यात लागू ...

अहमदनगर : जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायतींपैकी निम्म्यापेक्षा जास्त ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता संपूर्ण जिल्ह्यात लागू झाली आहे. त्यामध्ये नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्राचाही समावेश आहे. मात्र, महापालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू करायची की नाही ? याबाबत जिल्हा प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागवले आहे.

जिल्ह्यातील एकूण १३१८ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी ७६७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. जिल्ह्यात निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतीची संख्या ६६७ इतकी आहे. ही संख्या निम्म्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसार संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामध्ये नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्राचाही समावेश आहे. नगरपालिका क्षेत्र आणि ग्रामपंचायत क्षेत्र यामध्ये फारसे अंतर नसते. त्यामुळे नगपपालिका क्षेत्राशी संबंधित विकास कामांचा, कार्यक्रमांचा मतदारांवर प्रभाव निर्माण होऊ शकतो. शेजारील गावांचाच नगरपालिका हद्दीत समावेश होतो. या गावांच्या लगतच अनेक ग्रामपंचायती असतात. त्यामुळे आचारसंहितीची अंमलबजावणी संपूर्ण जिल्ह्यात आहे.

-------------

एकूण संख्येपैकी निम्म्यापेक्षा जास्त ग्रामपंचायतींची निवडणूक असेल तर संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता लागू केली जाते. त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यात सगळीकडे आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. महानगरपालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू करायची की नाही, याबाबत राज्य निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागवले आहे. हे मार्गदर्शन राज्यासाठीही उपयुक्त राहील.

-ऊर्मिला पाटील, उपजिल्हाधिकारी, महसूल

-----------

सव्वामहिना आचारसंहिता

११ डिसेंबरला निवडणूक जाहीर झाली. त्या दिवसापासून ते १८ जानेवारीपर्यंत आचारसंहिता असेल. या कालावधीत मतदारांवर प्रभाव पडेल, अशी कोणतीही कृती खासदार, आमदार, स्थानिक संस्थांमधील लोकप्रतिनिधी यांना करता येणार नाही. जी विकास कामे अर्धवट किंवा प्रगतिपथावर आहेत, अशी कामे आचारसंहिता काळातही करता येतील. कोविडसंबंधित किंवा अत्यावश्यक कामांना आचारसंहितेमधून वगळण्यात आले आहे.