शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

सहकार विभागानेच ठरवली जिल्हा बँकेची भरती वैध; भरतीत अनियमितता असल्याचा होता अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 16:29 IST

ज्या सहकार विभागाने नगर जिल्हा सहकारी बँकेच्या भरतीत अनियमितता झाली असा अहवाल दिला होता त्याच सहकार विभागाने ही भरती वैध असल्याचा नवा अहवाल आता दिला आहे. त्यानुसार बँकेने उर्वरित ६० उमेदवारांनाही नियुक्ती देण्यास सुरुवात केली आहे.  

सुधीर लंके ।  अहमदनगर : ज्या सहकार विभागाने नगर जिल्हा सहकारी बँकेच्या भरतीत अनियमितता झाली असा अहवाल दिला होता. त्याच सहकार विभागाने ही भरती वैध असल्याचा नवा अहवाल आता दिला आहे. त्यानुसार बँकेने उर्वरित ६० उमेदवारांनाही नियुक्ती देण्यास सुरुवात केली आहे.  जिल्हा बँकेत लिपिक, ज्युनिअर आॅफिसर, प्रथम व द्वितीय श्रेणी अधिकारी या पदांच्या ४६५ जागांसाठी जून २०१७ मध्ये भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. मात्र, या भरतीत अनियमितता असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला होता. अधिकारी व पदाधिका-यांची मुलेच गुणवत्ता यादीत असल्याची बाब ‘लोकमत’ने प्रकाशित करताच सहकार विभागाने या भरतीला स्थगिती दिली. त्यानंतर सहकार विभागाने राम कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय चौकशी समिती गठीत केली. या समितीने भरतीमध्ये गंभीर प्रकारची अनियमितता असल्याचा अहवाल दिल्याने ही भरती प्रक्रिया रद्द करण्याचा आदेश नाशिकच्या विभागीय सहनिबंधकांनी ३० एप्रिल २०१८ रोजी काढला.  त्यानंतर भरतीत निवड यादीत आलेल्या अनेक उमेदवारांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. न्यायालयाने ६४ उमेदवारांच्या भरती प्रक्रियेची फेरचौकशी करा असा आदेश गत ५ एप्रिलला दिला होता.  त्यामुळे बँकेने उर्वरित उमेदवारांना नियुक्ती पत्रे दिली. त्यानंतर सहकार विभागाच्या तीन सदस्यीय समितीने गत सहा महिने या ६४ उमेदवारांच्या भरती प्रक्रियेची पुन्हा चौकशी केली. त्या चौकशी अहवालाचा तपशील अद्याप ‘लोकमत’च्या हाती आलेला नाही. हा अहवाल सादर झाल्यानंतर नाशिक येथील विभागीय सहनिबंधकांनी या ६४ पैकी ६० उमेदवारांची निवड वैध ठरवली असल्याचे समजते. बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या वृतास दुजोरा दिला.  त्यानुसार बँकेने या उमेदवारांना नियुक्ती देण्यास सुरुवात केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ‘ती’ अनियमितता गेली कोठे?सहकार विभागाने या भरतीची प्रारंभी जी चौकशी केली त्यामध्ये अनेक प्रकारच्या गंभीर अनियमितता नोंदविल्या होत्या. ज्या ‘नायबर’ संस्थेमार्फत ही भरती प्रक्रिया राबविण्यात आली त्या संस्थेने नियमानुसार कामकाज केलेले नाही. परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करताना चित्रीकरण करण्यात आलेले नाही, काही उमेदवारांच्या उत्तरपत्रिका संशयास्पद दिसतात, नायबरने या भरती प्रक्रियेत बँकेच्या परस्पर काही निर्णय घेतले असे अनेक गंभीर आक्षेप होते. या सर्व आक्षेपांचे काय झाले? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. नवीन समितीने हे आक्षेप विचारात घेतले का? की केवळ काही विशिष्ट मुद्यावर चौकशी केली असाही प्रश्न आहे. राज्यात भाजपचे सरकार असताना या भरतीत अनियमितता झाली व त्याच सरकारच्या काळात ही भरती रद्द झाली. आता महाविकास आघाडीचे सरकार असताना सहकार विभागानेच आपला पूर्वीचा अहवाल चुकीचा ठरवत भरती वैध ठरवली आहे. अण्णा हजारे यांच्या भूमिकेकडे लक्ष या भरती प्रक्रियेबाबत सुरुवातीपासून केवळ ‘लोकमत’ने पाठपुरावा केला. अण्णा हजारे यांनीही भरतीतील अनियमिततेबाबत शासनाकडे तक्रार केली होती. ‘लोकमत’ व हजारे यांच्या तक्रारींची दखल घेऊनच सहकार विभागाने भरतीची चौकशी केली व अनियमितता असल्याचा अहवाल देत भरती रद्दही केली. मात्र, आता असे काय घडले की ते सर्व आक्षेप गळून पडले? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत हजारे हे काय भूमिका घेणार? याबाबतही उत्सुकता आहे. 

न्यायालयाच्या आदेशानुसार ६४ उमेदवारांच्या भरतीबाबत सहकार विभागाने फेरचौकशी केली. या फेरचौकशीनंतर सहकार विभागाने बँकेला जो आदेश दिला त्यात ६० उमेदवारांना पात्र ठरविले आहे. त्यानुसार त्यांना नियुक्ती देण्यात आली आहे, असे अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर यांनी सांगितले.

...    चौकशी समितीने अहवालात ज्या शिफारशी केल्या होत्या त्यानुसार आपण आदेश केला आहे. काय आदेश केला ते प्रत्यक्ष आदेश पाहूनच सांगता येईल. गुरुवारी याबाबत माहिती देऊ, असे नाशिक विभागाचे प्रभारी सहनिबंधक वसंत पाटील यांनी सांगितले.     

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रAhmednagarअहमदनगरLabourकामगार