शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
3
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
4
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
5
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
6
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
7
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
8
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
9
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
10
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
11
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
12
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
13
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
14
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
15
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
16
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
17
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
18
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
19
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
20
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया

को-२६५ उसाच्या लागवडीवर बंदी; श्रीरामपूर येथील शेतकरी संघटनांनी घेतली हरकत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 15:16 IST

शेतक-यांसाठी वरदान ठरणारी को-२६५ ही जात या धोरणात बसत नसल्याने लागवडीची नोंद घेणे बंद करण्यात आले आहे. त्यास शेतकरी संघटनांनी विरोध दर्शविला आहे.

श्रीरामपूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी साखरेचा अधिक उतारा देणा-या उसाच्या जातींना प्रोत्साहन देण्याचे धोरण अवलंबले आहे. सुमारे ५० ते ८० टक्के उसाचे फड व्यापणारी व शेतक-यांसाठी वरदान ठरणारी को-२६५ ही जात या धोरणात बसत नसल्याने लागवडीची नोंद घेणे बंद करण्यात आले आहे. त्यास शेतकरी संघटनांनी विरोध दर्शविला आहे.राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पाडेगाव ऊस संशोधन केंद्राने विकसित केलेल्या या जातीने शेतक-यांच्या प्रपंचाला मोठा हातभार लावला. जास्त फुटवे व उत्तम दर्जाचा खोडवा मिळत असल्याने ते अल्पावधीतच शेतक-यांच्या पसंतीला उतरले. वजनाच्या बाबत त्याने आजवरच्या उसाच्या सर्वच जातींना मागे टाकले. सन २००८-०९ च्या दरम्यान ८६०३२ हा जास्त साखर उता-याचा वाण लोकरी माव्याला बळी पडला. त्या वेळी को-२६५ हे वाण मात्र त्यास प्रतिकारक्षम ठरले. या अनुभवातून वाणाने लागवडीचा उच्चांक गाठला. जिल्ह्यातील अनेक कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात या एकाच वाणाची लागवड सुमारे ५० ते ६० टक्के क्षेत्रावर आहे. अशोक कारखान्याच्या क्षेत्रात या जातीची लागवड तब्बल ८० टक्के क्षेत्रावर करण्यात आली आहे.दरम्यान, साखर कारखान्यांनी लवकर परिपक्व होणा-या १०००१, ८००५, ३६३२, ८६०३२ या जातींशिवाय इतर उसाच्या नोंदी घेतल्या जाणार नसल्याने फर्मान बजावले आाहे. पुढील हंगामाकरिता (सन २०१८-१९) याच उसाचे गाळप केले जाणार असून शेतक-यांनी जानेवारीनंतर शिफारस केलेल्या वरील जातींच्याच उसाची लागवड करावी असे सूचविण्यात आले आहे.साखरेचे उत्पादन वाढविण्याकरिता गुणवत्तेचा ऊस निर्माण केला जावा असा तर्क कारखानदारांकडून मांडला जात आहे. राज्य ऊस दर नियंत्रण मंडळ उता-यावर आधारित दर देत असल्याने त्याचा थेट लाभ शेतक-यांना मिळणार आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

कारखान्यांचे महसुली उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने उता-याला महत्त्व आहे. शेतक-यांनीदेखील मानसिकता बदलायला हवी. त्यात सर्वांचेच हित जोडलेले आहे.-भास्करराव खंडागळे, साखर उद्योगातील तज्ज्ञ

को-२६५ ने साखर उद्योगाला तारण्याचे काम केले आहे. आजपर्यंत सर्वाधिक साखर उत्पादन देणारे हे वाण आहे. हे वाण शेतक-यांकडे उपलब्ध असताना त्याच्या लागवडीवरील बंदी उठवावी अशी आमची मागणी आहे.-सुरेश ताके, शेतकरी संघटना

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूर