शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

को-२६५ उसाच्या लागवडीवर बंदी; श्रीरामपूर येथील शेतकरी संघटनांनी घेतली हरकत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 15:16 IST

शेतक-यांसाठी वरदान ठरणारी को-२६५ ही जात या धोरणात बसत नसल्याने लागवडीची नोंद घेणे बंद करण्यात आले आहे. त्यास शेतकरी संघटनांनी विरोध दर्शविला आहे.

श्रीरामपूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी साखरेचा अधिक उतारा देणा-या उसाच्या जातींना प्रोत्साहन देण्याचे धोरण अवलंबले आहे. सुमारे ५० ते ८० टक्के उसाचे फड व्यापणारी व शेतक-यांसाठी वरदान ठरणारी को-२६५ ही जात या धोरणात बसत नसल्याने लागवडीची नोंद घेणे बंद करण्यात आले आहे. त्यास शेतकरी संघटनांनी विरोध दर्शविला आहे.राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पाडेगाव ऊस संशोधन केंद्राने विकसित केलेल्या या जातीने शेतक-यांच्या प्रपंचाला मोठा हातभार लावला. जास्त फुटवे व उत्तम दर्जाचा खोडवा मिळत असल्याने ते अल्पावधीतच शेतक-यांच्या पसंतीला उतरले. वजनाच्या बाबत त्याने आजवरच्या उसाच्या सर्वच जातींना मागे टाकले. सन २००८-०९ च्या दरम्यान ८६०३२ हा जास्त साखर उता-याचा वाण लोकरी माव्याला बळी पडला. त्या वेळी को-२६५ हे वाण मात्र त्यास प्रतिकारक्षम ठरले. या अनुभवातून वाणाने लागवडीचा उच्चांक गाठला. जिल्ह्यातील अनेक कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात या एकाच वाणाची लागवड सुमारे ५० ते ६० टक्के क्षेत्रावर आहे. अशोक कारखान्याच्या क्षेत्रात या जातीची लागवड तब्बल ८० टक्के क्षेत्रावर करण्यात आली आहे.दरम्यान, साखर कारखान्यांनी लवकर परिपक्व होणा-या १०००१, ८००५, ३६३२, ८६०३२ या जातींशिवाय इतर उसाच्या नोंदी घेतल्या जाणार नसल्याने फर्मान बजावले आाहे. पुढील हंगामाकरिता (सन २०१८-१९) याच उसाचे गाळप केले जाणार असून शेतक-यांनी जानेवारीनंतर शिफारस केलेल्या वरील जातींच्याच उसाची लागवड करावी असे सूचविण्यात आले आहे.साखरेचे उत्पादन वाढविण्याकरिता गुणवत्तेचा ऊस निर्माण केला जावा असा तर्क कारखानदारांकडून मांडला जात आहे. राज्य ऊस दर नियंत्रण मंडळ उता-यावर आधारित दर देत असल्याने त्याचा थेट लाभ शेतक-यांना मिळणार आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

कारखान्यांचे महसुली उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने उता-याला महत्त्व आहे. शेतक-यांनीदेखील मानसिकता बदलायला हवी. त्यात सर्वांचेच हित जोडलेले आहे.-भास्करराव खंडागळे, साखर उद्योगातील तज्ज्ञ

को-२६५ ने साखर उद्योगाला तारण्याचे काम केले आहे. आजपर्यंत सर्वाधिक साखर उत्पादन देणारे हे वाण आहे. हे वाण शेतक-यांकडे उपलब्ध असताना त्याच्या लागवडीवरील बंदी उठवावी अशी आमची मागणी आहे.-सुरेश ताके, शेतकरी संघटना

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूर