शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
2
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
3
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
4
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
5
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
6
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....
7
देशी ‘कमांडो डॉग्स’ करणार भारतीय सीमेची संरक्षण; रामपूर-मुधोळ हाउंड BSF पथकात दाखल
8
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
9
किडनी फेल नाही तर 'या' कारणामुळे झालं सतीश शाहांचं निधन, राजेश कुमारचा खुलासा
10
७ सीटर Kia Carens CNG मध्ये झाली लॉन्च; जाणून घ्या फिचर्स अन् किंमत, Ertiga ला देणार टक्कर
11
Video: ७ महिन्याच्या गर्भवतीनं उचललं तब्बल १४५ किलो वजन; कसा अन् कुणी केला हा पराक्रम?
12
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणीचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला, मृत्यू नेमका कशामुळे?
13
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
14
अस्थिर बाजारात 'सुझलॉन'ची मोठी झेप! तिमाही निकालापूर्वीच भाव वाढला; दुसऱ्यांदा मल्टीबॅगर ठरणार?
15
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
16
‘त्यांनी आपल्या २ मुली पळवल्या तर तुम्ही त्यांच्या १० जणीं घेऊन या’, भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान  
17
अर्जुन तेंडुलकर चमकला; पण 'या' गोलंदाजाने दिला त्रास! रन काढू दिलीच नाही, विकेटही घेतली...
18
महागडे मोबाइल अन् मोठे टीव्हीच हवेत; या दिवाळीत 'प्रीमियम' खरेदीचा नवा पॅटर्न समोर
19
कोण आहे रंजना प्रकाश देसाई?; ज्यांना ८ व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदाची मिळाली जबाबदारी
20
रणबीरच्या 'रामायण'मध्ये विवेक ओबेरॉयचीही भूमिका, अभिनेत्याने दान केलं मानधन; म्हणाला...

दिवसा ढगाळ वातावरण.. रात्री निरभ्र चांदणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:25 IST

तिसगाव : पाथर्डी तालुक्यातील तिसगावसह पश्चिम भागातील सव्वीस गावांच्या परिसरात सोळा दिवसांपासून पाऊस रुसला आहे. दिवसा ढगाळ वातावरण, रात्री ...

तिसगाव : पाथर्डी तालुक्यातील तिसगावसह पश्चिम भागातील सव्वीस गावांच्या परिसरात सोळा दिवसांपासून पाऊस रुसला आहे. दिवसा ढगाळ वातावरण, रात्री वारे, निरभ्र चांदणे असे विषम वातावरण आहे. त्यामुळे खरिपातील कपाशी, बाजरी, तूर, भुईमूग पिकांची वाढ खुंटली आहे.

अशा वातावरणामुळे पिकांवर रोग, किडींचा प्रादुर्भावही होत आहे.

शेतकरी भगवान मरकड म्हणाले, डाळिंबावर तेल्याचे अस्मानी संकट कोसळल्याने गर्भगिरी पट्ट्यात उत्पादक शेतकरी हतबल झाले आहेत. या वर्षी ६ जूनलाच पावसाचे आगमन झाले. कमी-अधिक दिवसांच्या अंतराने नऊ वेळेस पाऊस कमी-अधिक बरसला. गत महिन्यातील १८ जुलै अखेर एकूण २५४ मिलीमीटर पाऊस झाला. त्यानंतर पंधरवडा उलटला. नक्षत्रेही बदलली. पाऊस मात्र आला नाही. असे वास्तव चित्र परिसरात प्रथमच अनुभवास येत असल्याने बळीराजा हबकून गेला आहे.

सुसरे, सोमठाणे गाव परिसर तूर, कपाशीचे आगर म्हणून ओळखले जाते. पाऊस, अनुकूल हवामान नसल्याने कपाशी, तूर पीक केवळ वीतभर वाढले आहे. फळशेतीचा बहर फुलण्यासाठी पाऊस गरजेचा असल्याची खंत नवनाथ जगताप यांनी व्यक्त केली.

जवखेडे, आडगाव, कोपरे या बागायती पट्ट्यांत ऊस लागवडीखालील क्षेत्रालाही मोठ्या पावसाची आस लागली आहे. खरीप पिकांनी माना टाकल्यात, असे अमोल गवळी, पोपटराव कराळे म्हणाले.

दिवस - रात्रीच्या विषम हवामानाने शेतीपिके व उत्पादकांचा पुरता बेरंग झाला आहे. पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतित आहे.