शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

नगरचे ‘कास पठार’ रंगीबेरंगी फुलांनी फुलले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 11:19 IST

नगरचे कास पठार म्हणून ओळखल्या जाणाºया तालुक्यातील अकोळनेर येथे नवरात्रोत्सव, दसरा-दिवाळी या सणांना सुंगधीत करण्यासाठी रंगी-बेरंगी फुलांचे मळे बहरले आहेत. झेंडू, शेवंती याचबरोबर अस्टर, जर्बिरा यासारखी फुले सणासुदीसाठी सज्ज झाले आहेत. मात्र समाधानकारक पाऊस नसल्याने यंदा फुलांचे उत्पादन ३० ते ४० टक्क्यांनी घटणार असल्याने  फुलांच्या भावात तेजी राहणार आहे.

योगेश गुंड अहमदनगर  : नगरचे कास पठार म्हणून ओळखल्या जाणा-या तालुक्यातील अकोळनेर येथे नवरात्रोत्सव, दसरा-दिवाळी या सणांना सुंगधीत करण्यासाठी रंगी-बेरंगी फुलांचे मळे बहरले आहेत. झेंडू, शेवंती याचबरोबर अस्टर, जर्बिरा यासारखी फुले सणासुदीसाठी सज्ज झाले आहेत. मात्र समाधानकारक पाऊस नसल्याने यंदा फुलांचे उत्पादन ३० ते ४० टक्क्यांनी घटणार असल्याने  फुलांच्या भावात तेजी राहणार आहे. येथील फुलांना देशभरातील बाजारातून मागणी असते.नवरात्र उत्सव आणि दसरा, दिवाळी या सणांना फुलांची मोठी मागणी असते. त्यात झेंडू आणि शेवंती तर चांगलीच भाव खाऊन जाते. या फुलांचे नगरमधील मुख्य आगार असणा-या अकोळनेर येथे फुलांचे मळे या सणांसाठी सज्ज झाले आहेत. अकोळनेरबरोबरच कामरगाव, भोरवाडी, चास, पारनेर तालुक्यातील गोरेगाव, सुपा, हंगा या ठिकाणी नगर जिल्ह्यात सर्वात जास्त फुलांचे उत्पादन घेतले जाते. जिरायती जमीन आणि कमी पाण्यावर येणारी शेती म्हणून या भागात फुलशेती केली जाते.एकट्या अकोळनेर गावातच जवळपास १०० एकर क्षेत्रावर शेवंतीची लागवड करण्यात आली आहे. यावर्षी झेंडूचे उत्पादन काहीसे कमी झाले आहे. शेवंतीमध्ये यावर्षी मारीगोल्ड या नव्या प्रकारच्या शेवंतीची लागवड वाढली आहे. याबरोबरच रतलाम, राजा, गोल्डन, पेपरव्हाईट, चांदणी, भाग्यश्री, पूजा  व्हाईट, सानिया यलो, ऐश्वर्या यासारखे शेवंतीचे प्रकार आहेत. साधारण मार्च  महिन्यात शेवंतीची लागवड करण्यात येते. यावर्षी पाऊस लांबल्याने फुलांच्या उत्पादनात ४० टक्के घटीची शक्यता आहे.पावसावरच बाजारभावाचे गणित यंदा कमी  पावसामुळे झेंडू-शेवंती या फुलांचे उत्पादन कमी होई. आवक घटणार असून त्याचा परिणाम फुलांच्या भाववाढीत होणार आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा भाव चार पटीने वाढणार आहेत. शेवंतीचा भाव सध्या प्रती किलो २०० रूपये असला तरी सणासुदीत जास्त होईल, असा अंदाज आहे. झेंडूच्या भावाची अशीच स्थिती राहणार आहे.  झेंडू ७० रूपये प्रतिकिलो विकला जात आहे. चांगला पाऊस झाला तर ग्राहक व शेतकरी या दोघांना भाव परवडतील. पाऊस न झाल्यास  शेतक-यांची सगळी आर्थिक गणिते बिघडणार आहेत.विकतचे पाणी घेऊन फुले जगविलीयावर्षी दुष्काळी स्थितीमुळे फुलांच्या उत्पादनात घट होणार आहे. शेतक-यांनी पदरमोड करून टॅँकरने पाणी देऊन फुले जगविली. एक एकर फुल शेतीसाठी आम्ही विकतचे १० हजार लिटर पाणी घेऊन देत आहोत. आमच्याकडे शेवंतीची १० हजार रोपांची लागवड केली. मात्र पावसाने दगा दिल्याने त्यातील ७ हजार रोपे आम्ही काढून टाकली. फुलांची वाढ चांगली झाल्याने आता पावसाची गरज आहे, असे अकोळनेरचे फूल उत्पादक तुळशीदास जाधव यांनी सांगितले.     

टॅग्स :FarmerशेतकरीAhmednagarअहमदनगर